शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळ काढल्याने पाणीसमस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:33 IST

माहुली परिसरातील टंचाई दूर होणार; पाणी साठवण्याची क्षमता वाढणार

वासिंद : माहुली परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील दोन तलावांमधील २४,८६१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे काम नुकतेच करण्यात आले. यामुळे आता या तलावांची पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे.माहुली किल्ल्याच्या कुशीतील माहुली, आवाळे, चांदरोटी, मामणोली, कराडे या पाच महसुली गावांमध्ये आणि त्यातील १८ पाड्यांमध्ये यंदा टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. टँकरचे पाणी ओतता यावे, यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीद्वारे पाच हजार लीटर क्षमतेच्या दोन टाक्या दिल्या गेल्या. मात्र, मुळातच टँकरद्वारे पाणी द्यावे लागू नये, तसेच भूगर्भजल वाढावे, यासाठी या दोन तलावांतील गाळ काढण्याची मागणी माहुली ग्रामपंचायतीने जेएसडब्ल्यू कंपनीकडे केली होती. लोकांना तसेच जनावरांनाही पाणीटंचाई भेडसावते. प्राण्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू नयेत आणि त्यांना पिण्यास पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनक्षेत्रपाल दर्शन ठाकूर यांनी हा प्रस्ताव कंपनीकडे मांडला. जेएसडब्ल्यू कंपनीचे पब्लिक रिलेशन आॅफिसर चिन्मय पालेकर यांनी हे काम कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) म्हणून हाती घेतल्याचे सांगितले.उपसरपंच प्रदीप आगिवले यांनी या तलावाच्या पाझरामुळे परिसरातील विहिरींमध्ये उन्हाळ्यात पाणी टिकेल आणि तलावाच्या आसपास असलेल्या शेतामध्ये भाजीपाल्याचे पीक घेता येईल, असा विश्वास व्यक्त केला. जेएसडब्ल्यू कंपनीने यापूर्वी कसारा येथील टोकरवाडी आणि वासिंदजवळील कातबाव तलावातील ३० हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. यावर्षी २४,८६१ क्युबिक मीटर गाळ काढून तलावांची धारणक्षमता ५४,८५१ क्युबिक मीटरने वाढवली आहे. शहापूर तालुक्यात पडणारा पाऊस अशा रीतीने अडवून जमिनीत जिरवल्यास तालुका टँकरमुक्त होण्यास निश्चितच मदत होईल.