शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

नाल्यातील गाळ वेळेत काढा, अन्यथा महापालिकेसमोर टाकू कचरा, आव्हाड यांचा महापालिकेला गंभीर इशारा

By अजित मांडके | Updated: June 16, 2023 15:36 IST

आव्हाडांनी टीव्ट करतांना जीपीएस लोकेशनसह फोटो देखील टाकले आहेत. त्यानुसार कळवा, मुंब्य्रात कुठेही नालेसफाई झाली नसल्याचे आयुक्तांना यापूर्वीच सांगितले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहरातील नालेसफाईची कामे योग्य पध्दतीने झाली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु आता कळवा आणि मुंब्य्रात अद्यापही नालेसफाई झाली नसल्याचे विदारक चित्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ट करीत पुढे आणले आहे. पहिल्याच पावसात येथील नाल्यात कचºयाचे ढीग जमा झाले असून वेळीच नाल्यातील गाळ काढा अन्यथा नाल्यातील कचरा वाजत गाजत घेऊन येऊन महापालिका मुख्यालयासमोर टाकला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आव्हाडांनी टीव्ट करतांना जीपीएस लोकेशनसह फोटो देखील टाकले आहेत. त्यानुसार कळवा, मुंब्य्रात कुठेही नालेसफाई झाली नसल्याचे आयुक्तांना यापूर्वीच सांगितले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल झाल्याचे दिसून आले आहे. कळवा पूवेर्तील भास्कर नगर, पौण्डपाडा, वाघोबा नगर या परिसरामध्ये रहिवाशांच्या घरासमोर नाल्यातील कचरा आल्याचे दिसून आले. परंतु त्यानंतरही अद्यापही कार्यवाही झालेली नाही.

उत्कर्ष आर्या नावाचा कोणी ठेकेदार आहे हे माहीत नाही, त्याला कामाचा किती अनुभव आहे हे माहीत नाही, तो काम देखिल करत नाही. एकतर मध्ये हे ठेकेदार आपल्याला बिले मिळणारच आहेत या विश्वासातून २२ ते २५ टक्के बीलो टेंडर टाकतात आणि नंतर त्यांच्या लक्षात येते कि हे टेंडर परवडणारे नाही. हे सगळे महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारच्या सेटिंगने चालते असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे वेळीच हे नाले साफ करून दिले नाही तर एक दिवस हाच कचरा महापालिका मुख्यालयाच्या समोर टाकला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मागील आठ महिने मी सत्ताधाºयांच्या विरोधात भुमीका घेत असल्यानेच माझ्या मतदार संघातील कामे होत नाहीत. विकास कामांसाठी आलेला निधी देखील पुन्हा वळता करण्यात आला आहे. आता नालेसफाईची कामे देखील केली गेलेली नाहीत. परंतु मी जनतेची कामे करत राहणार आहे. तुम्हाला आणखी काय करायचे असेल ते करा.(जितेंद्र आव्हाड - आमदार, राष्ट्रवादी)

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड