शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

जुन्या ठाण्याची २९ वर्षांनी आठवण, टीडीआरसाठी महासभेत मांडली लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:36 IST

जुन्या ठाण्याच्या विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळावा, यासाठी रस्त्यांची रुंदी ९ मीटरपेक्षा कमी करावी, अशी प्रस्तावाची सूचना भाजपाने मांडली आहे.

ठाणे : जुन्या ठाण्याच्या विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळावा, यासाठी रस्त्यांची रुंदी ९ मीटरपेक्षा कमी करावी, अशी प्रस्तावाची सूचना भाजपाने मांडली आहे. असे असताना आता मागील विधानसभा निवडणुकीपासून पिछाडीवर पडलेल्या शिवसेनेलादेखील आता या परिसराच्या विकासाची तब्बल २९ वर्षांनंतर आठवण झाली आहे. त्यानुसार, शिवसेना यासंदर्भात थेट लक्षवेधी सूचना शुक्रवारी होणाऱ्या महासभेत मांडणार आहे. त्यामुळे महासभेत भाजपाच्या प्रस्तावाच्या सूचनेवर चर्चा होणार की, शिवसेनेच्या लक्षवेधीवर चर्चा होणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.मागील कित्येक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असणाºया शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा पुनर्वसनाचा मार्ग समूह विकास योजनेच्या अर्थात क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मोकळा होणार असला, तरी जुन्या ठाण्यावर मात्र ही टांगती तलवार कायम आहे. आताच्या डीसी रूलप्रमाणे ९ मीटरपेक्षा कमी रु ंदी असलेल्या रस्त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळणे अशक्य आहे. त्यामुळे जुन्या ठाण्यातील अनेक इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न रखडला आहे. ठाणे शहरातील म्हणजेच ठाणे पूर्व ते माजिवडा सेक्टर १ ते ३ हे भाग जुने ठाणे म्हणून ओळखले जातात. या भागातील बहुतांश इमारती अधिकृत तसेच ग्रामपंचायत आणि नगरपालिका काळातील आहेत. त्यावेळच्या नियमांप्रमाणे आणि वाहने, होणारी वाहतूक लक्षात घेऊन रस्त्यांची रुंदी घेण्यात आली, त्याचप्रमाणे नियमदेखील करण्यात आले. त्यामुळे एकीकडे रस्त्यांची रुंदी खूप कमी राहिली आहे. तर, दुसरीकडे इमारती जुन्या झाल्यामुळे त्यांचा पुनर्विकासदेखील आवश्यक झाला आहे. आताच्या विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे ९ मी.पेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यांमुळे पुनर्विकासासाठी टीडीआर मिळू शकत नाही. काही ठिकाणी मुख्य रस्त्याच्या जोडरस्त्याला इमारत ५० मी.पेक्षा जास्त अंतरावर असते, त्यामुळे तेथेही टीडीआर उपलब्ध होऊ शकत नाही व पुनर्विकासात अडथळे येतात. त्यामुळे या भागाचा पुनर्विकासासाठी बीएमसी सेस इमारतींच्या पुनर्विकासाप्रमाणे अथवा नवी मुंबईच्या धोरणाप्रमाणे पुनर्विकास करावा, अशा आशयाची लक्षवेधी सूचना आता सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मांडली आहे.दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी याचसंदर्भात प्रस्तावाची सूचना महासभेत मांडली आहे. त्यानंतर, अवघा एक दिवस उलटत नाही, तोच म्हस्के यांनी थेट लक्षवेधी मांडून सर्वांचेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निवडणूक लागण्याआधीच आता जुन्या ठाण्याच्या मुद्यावरून शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष निर्माण झाला आहे.बालेकिल्ला स्वत:कडे ठेवण्यासाठी सेनेचे शर्थीचे प्रयत्न- मागील २९ वर्षे जुन्या ठाण्यावर शिवसेनेचा वरचष्मा होता. परंतु, मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपाचे कमळ फुलले. त्यानंतर, झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतदेखील भाजपाच्या नगरसेवकांची संख्या येथे सहा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही दोनवर आली.त्यामुळे शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला जणू सुरुंगच लागल्याचे दिसून आले. त्यात आता पुन्हा भाजपाने जुन्या ठाण्याकडे लक्ष केंद्रित केले असतानाच हा बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून भाजपाला धोबीपछाड करण्यासाठीच ही लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका