शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पोलिसांच्या ना-हरकत दाखल्याविना धार्मिक स्थळांना परवानगी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 04:58 IST

राज्यात आता मंदिर, मशीद, चर्च वा बौद्धविहारासह अन्य धार्मिक वास्तू उभारायची झाल्यास गृह विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. हे ना-हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय महापालिका, नगरपालिकांसह ग्रामपंचायतींनी कोणत्याही धार्मिक वास्तूंच्या बांधकामास परवानगी देऊ नये, असे नवे आदेश गृह विभागाने ७ मे रोजी काढले आहेत.

- नारायण जाधवठाणे - राज्यात आता मंदिर, मशीद, चर्च वा बौद्धविहारासह अन्य धार्मिक वास्तू उभारायची झाल्यास गृह विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. हे ना-हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय महापालिका, नगरपालिकांसह ग्रामपंचायतींनी कोणत्याही धार्मिक वास्तूंच्या बांधकामास परवानगी देऊ नये, असे नवे आदेश गृह विभागाने ७ मे रोजी काढले आहेत. यामुळे राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामांना आळा बसून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे प्रकार घडणार नाहीत, असा विश्वास गृह विभागाने यामागे व्यक्त केला आहे.मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर माहिती देताना महाराष्ट्र राज्य शासनाने २३ जून २०१४ पर्यंत राज्यात १७,६१४ अनधिकृत धार्मिक स्थळे असून, त्यातील २५८ नियमित करून ३७० बांधकामे तोडल्याची माहिती दिली होती. तर, ३७ धार्मिक स्थळांचे स्थलांतर केल्याचे सांगितले होते. त्यानंतर, राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा चर्चेला होता. त्यानुसार, राज्यातील काही अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. परंतु, त्यानंतरही राज्यात सर्रास अनधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे होत असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न अनेक शहरांत निर्माण झाल्याच्या घटना घडल्या.या सर्व पार्श्वभूमीवर गृह विभागाने आता पोलिसांच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय धार्मिक स्थळांची बांधकामे होऊ नयेत, म्हणून हे नवीन आदेश काढले आहेत.आदेशानुसार धार्मिक स्थळांच्या बांधकाम आराखड्यास तांत्रिक परवानगी देण्यापूर्वी पालिका आयुक्तांनी नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी ते नगरविकास आणि महसूल विभागाकडे पाठवायचे आहेत. तर, नगरविकास आणि महसूल विभागाने त्याची छाननी करून ते गृह विभागाकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी पाठवावेत. गृह विभागाने कायदा व सुव्यवस्था, रहदारीची समस्या निर्माण होणार नाही, याची खातरजमा करूनच ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे. कोणत्याही परिस्थितीत या प्रमाणपत्राशिवाय नव्या धार्मिक स्थळांचे बांधकाम किंवा धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करू नये, असे बजावण्यात आले आहे.

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणेnewsबातम्या