शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

पोलिसांच्या ना-हरकत दाखल्याविना धार्मिक स्थळांना परवानगी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 04:58 IST

राज्यात आता मंदिर, मशीद, चर्च वा बौद्धविहारासह अन्य धार्मिक वास्तू उभारायची झाल्यास गृह विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. हे ना-हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय महापालिका, नगरपालिकांसह ग्रामपंचायतींनी कोणत्याही धार्मिक वास्तूंच्या बांधकामास परवानगी देऊ नये, असे नवे आदेश गृह विभागाने ७ मे रोजी काढले आहेत.

- नारायण जाधवठाणे - राज्यात आता मंदिर, मशीद, चर्च वा बौद्धविहारासह अन्य धार्मिक वास्तू उभारायची झाल्यास गृह विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. हे ना-हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय महापालिका, नगरपालिकांसह ग्रामपंचायतींनी कोणत्याही धार्मिक वास्तूंच्या बांधकामास परवानगी देऊ नये, असे नवे आदेश गृह विभागाने ७ मे रोजी काढले आहेत. यामुळे राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामांना आळा बसून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे प्रकार घडणार नाहीत, असा विश्वास गृह विभागाने यामागे व्यक्त केला आहे.मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर माहिती देताना महाराष्ट्र राज्य शासनाने २३ जून २०१४ पर्यंत राज्यात १७,६१४ अनधिकृत धार्मिक स्थळे असून, त्यातील २५८ नियमित करून ३७० बांधकामे तोडल्याची माहिती दिली होती. तर, ३७ धार्मिक स्थळांचे स्थलांतर केल्याचे सांगितले होते. त्यानंतर, राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा चर्चेला होता. त्यानुसार, राज्यातील काही अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. परंतु, त्यानंतरही राज्यात सर्रास अनधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे होत असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न अनेक शहरांत निर्माण झाल्याच्या घटना घडल्या.या सर्व पार्श्वभूमीवर गृह विभागाने आता पोलिसांच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय धार्मिक स्थळांची बांधकामे होऊ नयेत, म्हणून हे नवीन आदेश काढले आहेत.आदेशानुसार धार्मिक स्थळांच्या बांधकाम आराखड्यास तांत्रिक परवानगी देण्यापूर्वी पालिका आयुक्तांनी नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी ते नगरविकास आणि महसूल विभागाकडे पाठवायचे आहेत. तर, नगरविकास आणि महसूल विभागाने त्याची छाननी करून ते गृह विभागाकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी पाठवावेत. गृह विभागाने कायदा व सुव्यवस्था, रहदारीची समस्या निर्माण होणार नाही, याची खातरजमा करूनच ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे. कोणत्याही परिस्थितीत या प्रमाणपत्राशिवाय नव्या धार्मिक स्थळांचे बांधकाम किंवा धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करू नये, असे बजावण्यात आले आहे.

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणेnewsबातम्या