शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

भरपावसात आमदार बांधावर, शेतकऱ्यांना दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:12 IST

शेतकऱ्यांना दिला दिलासा : भातपिकांची केली पाहणी

भातसानगर : शहापूर तालुक्यात शुक्रवार सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे सुकत चाललेली भातशेतीही पाण्यात गेल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांसाठी आमदार दौलत दरोडा शेतात पोहोचले. तालुक्यातील शेतकºयांचा पिच्छा पाऊस सोडत नाही. सकाळी जणू पावसाळ्यासारखाच किंवा त्याहीपेक्षा अधिक जोराने पाऊस पडत होता. आज शेतातील भातपीक, पेंढा पाण्यावर तरंगल्याचे दृश्य पाहताच शेतकºयांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

मानेखिंड या गावातील मल्हारी परसू सपाट या शेतकºयाने अडीच एकर जागेत भातशेती लावली होती. पावसाळ्यात पोटाला चिमटा घेऊन आपल्या दोन मुले व पत्नीच्या बरोबरीने मुसळधार पडणाºया पावसाची तमा न बाळगता शेतीची लागवड तब्बल दोन महिने केली. आपल्याला चांगला भात आल्यास पुढील सणासुदीला दिवस चांगले घालवता येतील, अशी अपेक्षा धरूनच शेती केली. वर्षभराची मेहनत अशी डोळ्यांदेखत पाण्यात गेल्याचे दु:ख या शेतकºयांना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची ही वेळ अतिशय विदारक आहे.शेतात सोन्यासारखा दाणा डोळ्यांत दिसत असतानाही तो जमिनीवर कोसळला आणि पाण्यात बुडूनच त्याची माती झाली, पण आम्ही काहीच करू शकलो नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.आमदार दौलत दरोडा यांनी या शेतकºयांबरोबरच सापगाव येथील बालशा अंदाडे, किशोर सपाट आदी शेतकºयांची मुसळधार पावसातही शेतात जाऊन भेट घेतली व पाण्यात बुडालेल्या भाताच्या दाण्यांना पुन्हा कोंब आलेल्या भाताची पाहणी केली.शहापूर तालुक्यातील शेतकºयांना हेक्टरी एक लाख रु पये नुकसानभरपाई देण्याची मागणी राज्यपाल यांच्याकडे केली असून ती मिळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, असे दरोडा यांनी सांगितले. तालुक्यात आजच्या इतकी परिस्थिती कधीच नव्हती.पावसामुळे भातपिके तरंगू लागलीभिवंडी : गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांनी कापणी केलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कापणी केलेली भातपिके तरंगू लागली आहेत. त्यामुळे शेवटचा उरलेला घासही गेल्याने शेतकºयांच्या डोळ््यात अश्रू तरळू लागले आहेत. शेतीचे पंचनामे सुरू असताना पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सरकारने भातशेतीच्या नुकसानीचे १०० टक्के नुकसान झाल्याचे जाहीर करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.भिवंडीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतामध्ये सोन्यासारखे आलेले पीक कुजून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी कुटूंब हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील पडघा ,अंबाडी ,खानिवली ,वडवली, अनगाव, कवाड, कुंदे ,दिघाशी ,नांदकर ,बापगांव, मूठवळ, चिंबीपाडा ,कुहे ,धामणे ,खारबांव,पाये, पायगांव, खार्डी,एकसाल, सागांव ,जुनांदुर्खी, टेंभवली ,पालीवली ,गाणे ,फिरिंगपाडा,बासे,मैदे, पाश्चापूर येथे पाऊस झाला. दाभाड येथील शेतकºयांच्या शेतात कापणी करून भारे बांधून ठेवले होते. सायंकाळी उशीर झाल्याने दुसºया दिवशी भाताचे भारे घरी नेण्याचा विचार केला होता. मात्र शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेला घास ही हिरावून घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे . दरम्यान शेतकºयांना आर्थिक मदत उपलब्ध करावी अशी मागणी भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेMLAआमदार