शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसात आमदार बांधावर, शेतकऱ्यांना दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:12 IST

शेतकऱ्यांना दिला दिलासा : भातपिकांची केली पाहणी

भातसानगर : शहापूर तालुक्यात शुक्रवार सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे सुकत चाललेली भातशेतीही पाण्यात गेल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांसाठी आमदार दौलत दरोडा शेतात पोहोचले. तालुक्यातील शेतकºयांचा पिच्छा पाऊस सोडत नाही. सकाळी जणू पावसाळ्यासारखाच किंवा त्याहीपेक्षा अधिक जोराने पाऊस पडत होता. आज शेतातील भातपीक, पेंढा पाण्यावर तरंगल्याचे दृश्य पाहताच शेतकºयांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

मानेखिंड या गावातील मल्हारी परसू सपाट या शेतकºयाने अडीच एकर जागेत भातशेती लावली होती. पावसाळ्यात पोटाला चिमटा घेऊन आपल्या दोन मुले व पत्नीच्या बरोबरीने मुसळधार पडणाºया पावसाची तमा न बाळगता शेतीची लागवड तब्बल दोन महिने केली. आपल्याला चांगला भात आल्यास पुढील सणासुदीला दिवस चांगले घालवता येतील, अशी अपेक्षा धरूनच शेती केली. वर्षभराची मेहनत अशी डोळ्यांदेखत पाण्यात गेल्याचे दु:ख या शेतकºयांना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची ही वेळ अतिशय विदारक आहे.शेतात सोन्यासारखा दाणा डोळ्यांत दिसत असतानाही तो जमिनीवर कोसळला आणि पाण्यात बुडूनच त्याची माती झाली, पण आम्ही काहीच करू शकलो नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.आमदार दौलत दरोडा यांनी या शेतकºयांबरोबरच सापगाव येथील बालशा अंदाडे, किशोर सपाट आदी शेतकºयांची मुसळधार पावसातही शेतात जाऊन भेट घेतली व पाण्यात बुडालेल्या भाताच्या दाण्यांना पुन्हा कोंब आलेल्या भाताची पाहणी केली.शहापूर तालुक्यातील शेतकºयांना हेक्टरी एक लाख रु पये नुकसानभरपाई देण्याची मागणी राज्यपाल यांच्याकडे केली असून ती मिळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, असे दरोडा यांनी सांगितले. तालुक्यात आजच्या इतकी परिस्थिती कधीच नव्हती.पावसामुळे भातपिके तरंगू लागलीभिवंडी : गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांनी कापणी केलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कापणी केलेली भातपिके तरंगू लागली आहेत. त्यामुळे शेवटचा उरलेला घासही गेल्याने शेतकºयांच्या डोळ््यात अश्रू तरळू लागले आहेत. शेतीचे पंचनामे सुरू असताना पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सरकारने भातशेतीच्या नुकसानीचे १०० टक्के नुकसान झाल्याचे जाहीर करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.भिवंडीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतामध्ये सोन्यासारखे आलेले पीक कुजून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी कुटूंब हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील पडघा ,अंबाडी ,खानिवली ,वडवली, अनगाव, कवाड, कुंदे ,दिघाशी ,नांदकर ,बापगांव, मूठवळ, चिंबीपाडा ,कुहे ,धामणे ,खारबांव,पाये, पायगांव, खार्डी,एकसाल, सागांव ,जुनांदुर्खी, टेंभवली ,पालीवली ,गाणे ,फिरिंगपाडा,बासे,मैदे, पाश्चापूर येथे पाऊस झाला. दाभाड येथील शेतकºयांच्या शेतात कापणी करून भारे बांधून ठेवले होते. सायंकाळी उशीर झाल्याने दुसºया दिवशी भाताचे भारे घरी नेण्याचा विचार केला होता. मात्र शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेला घास ही हिरावून घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे . दरम्यान शेतकºयांना आर्थिक मदत उपलब्ध करावी अशी मागणी भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेMLAआमदार