शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर रिलायन्सचे भूत

By admin | Updated: May 27, 2017 02:03 IST

पालघर जिल्हातून रिलायन्स गॅस पाईप लाईनचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे.

वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : पालघर जिल्हातून रिलायन्स गॅस पाईप लाईनचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. दरम्यान, या प्रकल्पांमुळे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचा व काही ठिकाणी उभ्या संसाराची विल्हेवाट लागणार आहे. शिवाय कंपनी कडून अवघा साठ हजार रुपये प्रति गुंठा एवढा मोबदला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अक्षरश: लूट सुरु असल्याने संतापाचे वातावरण आहे.पालघर व ठाणे हे शेतीप्रधान जिल्हे आहेत. भात हे येथील मुख्य पीक आहे. वाडा व मुरबाड येथील कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. वाडा कोलम या भाताच्या वाणाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भात पिकाबरोबर येथील शेतकरी कडधान्य, फळबागा, फुलशेती व फळशेती अशी विविध उत्पादने घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरिनर्वाह करीत आहेत. असे असताना विकासाच्या नावाखाली या जिल्ह्यातून अनेक प्रकल्प यापूर्वी सुद्धा गेले आहेत. यापूर्वी उच्च दाबाची विद्युत वाहिनी, गेल गॅस वाहिनी, रिलायन्स गॅस वाहिनी तसेच अनेक धरणे उभी राहीली असून या प्रकल्प उभारणीत येथील शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनीचा बळी पडला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये रिलायन्स गॅस वाहिनी, मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग, पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन, डहाणू येथे वाढवण बंदर असे अनेक प्रकल्प होऊ घातले आहे. सध्या रिलायन्स गॅस वाहिनी व मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग यापैकी रिलायन्स गॅस वाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या प्रकाराचा येथील श्रमिक शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. मात्र, भाजपा सरकारने या भांडवलदार कंपन्यांना परवानग्या दिल्या असल्याने गोरगरीब शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात आहेत.मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग येथून जात असून तो १२० किलो मीटर अंतराचा आहे. या महामार्गात अनेक घरे, जमिनी जात असून अनेक जण बेघर होणार आहेत. शिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत असल्याने या रस्त्याचा उपयोग स्थानिकांसाठी होणार नाही. गेल्या सहा वर्षांपासून या रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे.