शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर रिलायन्सचे भूत

By admin | Updated: May 27, 2017 02:03 IST

पालघर जिल्हातून रिलायन्स गॅस पाईप लाईनचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे.

वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : पालघर जिल्हातून रिलायन्स गॅस पाईप लाईनचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. दरम्यान, या प्रकल्पांमुळे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचा व काही ठिकाणी उभ्या संसाराची विल्हेवाट लागणार आहे. शिवाय कंपनी कडून अवघा साठ हजार रुपये प्रति गुंठा एवढा मोबदला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अक्षरश: लूट सुरु असल्याने संतापाचे वातावरण आहे.पालघर व ठाणे हे शेतीप्रधान जिल्हे आहेत. भात हे येथील मुख्य पीक आहे. वाडा व मुरबाड येथील कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. वाडा कोलम या भाताच्या वाणाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भात पिकाबरोबर येथील शेतकरी कडधान्य, फळबागा, फुलशेती व फळशेती अशी विविध उत्पादने घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरिनर्वाह करीत आहेत. असे असताना विकासाच्या नावाखाली या जिल्ह्यातून अनेक प्रकल्प यापूर्वी सुद्धा गेले आहेत. यापूर्वी उच्च दाबाची विद्युत वाहिनी, गेल गॅस वाहिनी, रिलायन्स गॅस वाहिनी तसेच अनेक धरणे उभी राहीली असून या प्रकल्प उभारणीत येथील शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनीचा बळी पडला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये रिलायन्स गॅस वाहिनी, मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग, पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन, डहाणू येथे वाढवण बंदर असे अनेक प्रकल्प होऊ घातले आहे. सध्या रिलायन्स गॅस वाहिनी व मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग यापैकी रिलायन्स गॅस वाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या प्रकाराचा येथील श्रमिक शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. मात्र, भाजपा सरकारने या भांडवलदार कंपन्यांना परवानग्या दिल्या असल्याने गोरगरीब शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात आहेत.मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग येथून जात असून तो १२० किलो मीटर अंतराचा आहे. या महामार्गात अनेक घरे, जमिनी जात असून अनेक जण बेघर होणार आहेत. शिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत असल्याने या रस्त्याचा उपयोग स्थानिकांसाठी होणार नाही. गेल्या सहा वर्षांपासून या रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे.