शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर रिलायन्सचे भूत

By admin | Updated: May 27, 2017 02:03 IST

पालघर जिल्हातून रिलायन्स गॅस पाईप लाईनचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे.

वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : पालघर जिल्हातून रिलायन्स गॅस पाईप लाईनचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. दरम्यान, या प्रकल्पांमुळे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचा व काही ठिकाणी उभ्या संसाराची विल्हेवाट लागणार आहे. शिवाय कंपनी कडून अवघा साठ हजार रुपये प्रति गुंठा एवढा मोबदला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अक्षरश: लूट सुरु असल्याने संतापाचे वातावरण आहे.पालघर व ठाणे हे शेतीप्रधान जिल्हे आहेत. भात हे येथील मुख्य पीक आहे. वाडा व मुरबाड येथील कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. वाडा कोलम या भाताच्या वाणाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भात पिकाबरोबर येथील शेतकरी कडधान्य, फळबागा, फुलशेती व फळशेती अशी विविध उत्पादने घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरिनर्वाह करीत आहेत. असे असताना विकासाच्या नावाखाली या जिल्ह्यातून अनेक प्रकल्प यापूर्वी सुद्धा गेले आहेत. यापूर्वी उच्च दाबाची विद्युत वाहिनी, गेल गॅस वाहिनी, रिलायन्स गॅस वाहिनी तसेच अनेक धरणे उभी राहीली असून या प्रकल्प उभारणीत येथील शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनीचा बळी पडला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये रिलायन्स गॅस वाहिनी, मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग, पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन, डहाणू येथे वाढवण बंदर असे अनेक प्रकल्प होऊ घातले आहे. सध्या रिलायन्स गॅस वाहिनी व मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग यापैकी रिलायन्स गॅस वाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या प्रकाराचा येथील श्रमिक शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. मात्र, भाजपा सरकारने या भांडवलदार कंपन्यांना परवानग्या दिल्या असल्याने गोरगरीब शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात आहेत.मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग येथून जात असून तो १२० किलो मीटर अंतराचा आहे. या महामार्गात अनेक घरे, जमिनी जात असून अनेक जण बेघर होणार आहेत. शिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत असल्याने या रस्त्याचा उपयोग स्थानिकांसाठी होणार नाही. गेल्या सहा वर्षांपासून या रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे.