शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अपुऱ्या शववाहिकेमुळे मृतांच्या नातेवाईकांना करावी लागते प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 23:32 IST

ठाण्यात कोरोनाग्रस्तांसाठी दोनच वाहने

ठाणे : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृतदेहांची वाहतूक खासगी रुग्णवाहिका करत नाहीत. त्यात करोनामुळे होणाºया मृत्यूंचे प्रमाण वाढल्याने ठाण्यातील नागरिकांना महापालिकेच्या ४ शववाहिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे या शवाहिकांसाठी लागणारे कर्मचारीही अपुरे असून या कसोटीच्या काळात जेथे १५ कर्मचाऱ्यांची गरज आहे तेथे फक्त १० कर्मचाºयांच्या जीवावर काम केले जात असल्याने अनेकवेळा मृतांच्या नातेवाईकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. महापालिकेने शववाहिका वाढवाव्यात, अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे मयत व्यक्तीची अंत्ययात्रा काढणे शक्य नाही. शिवाय अंत्यसंस्कारासाठी केवळ ५ ते दहा लोकांची उपस्थित राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. गर्दी टाळण्यासाठी नागरिक अंत्ययात्रा काढण्याऐवजी शववाहिकेलाच बोलवले जाते. पण महापालिकेच्या हद्दीत केवळ चार शववाहिका अन दहाच कर्मचारी असल्याने अनेकदा मयताच्या नातेवाईककांना शववाहिका उपलब्ध होईपर्यंत वाट पाहावी लागत आहे.

शहरात ७५ कोरोना मृत्यू

च्शहरात आतापर्यंत करोनामुळे ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजारहून अधिक करोनाबाधित आहेत. या भीषण परिस्थितीत महापालिकेकडे अपुºया रुग्णवाहिका आणि शववाहिका आहेत. चार शववाहिकेमधील २ शववाहिकामध्ये कोव्हिड तर दोन शववाहिकेत नॉन कोव्हिड मृतदेह नेले जात आहेत.

च्दररोज सुमारे दहाहून अधिक मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात येतात. त्यामुळे या करोनाच्या काळात महापालिकेने टीएमटी बसेसमध्ये बदल करून त्यांचा शववाहिका म्हणून उपयोग करÞण्याचा विचार करावा, अशी मागणी मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे