शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दोन हजारांच्या नोटांना पतसंस्थांचा नकार; महामुंबईत गर्दी नाही, फारशा नोटा नसल्याचा ग्राहकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 09:03 IST

आधीच्या नोटाबंदीत चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने अनेक ठिकाणी पतसंस्थांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याचे दिसून आले. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्याची सुरुवात मंगळवारपासून झाली असली तरी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमधील बँकांमध्ये त्यासाठी अजिबात गर्दी झाली नाही. 

आमच्याकडे फारशा नोटाच नसल्याचा ग्राहकांचा दावा होता आणि नोटा बदलून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिल्यानेही गर्दी नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आधीच्या नोटाबंदीत चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने अनेक ठिकाणी पतसंस्थांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याचे दिसून आले. 

ठाणेकर निवांतठाणे जिल्ह्यातील बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी २०१६ मध्ये जशा रांगा लागल्या होत्या, तसे चित्र आता नाही. ठाणे शहरातील बँकांत सुमारे ५० ग्राहकांनी दिवसभरात नोटा जमा केल्या. डोंबिवली व कल्याणमध्ये तर तेवढ्या संख्येनेही ग्राहक बँकेत नव्हते. बँकांनी ज्येष्ठांसाठी वेगळा कक्ष केला आहे. संख्या पाहून मंडप घालण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले असले, तरी बहुतांश बँकांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही.

पतसंस्थांचा नकाररायगड जिल्ह्यातील बँकांतही फारशी गर्दी नव्हती. मात्र, यापूर्वीच्या नोटाबंदीत पतसंस्थांना चौकशीला सामोरे जावे लागल्याने तेथे या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे दिसून आले. पतसंस्थांच्या महासंघाने मात्र नोटा स्वीकारा; पण त्याचा तपशील ठेवावा, असे पत्रक काढले आहे.

नवी मुंबईत आलबेलनोटा बदलण्यासाठी पुरावे मागण्यात येत नसल्याने नवी मुंबईत कोठेही अवास्तव गर्दी नाही. शिवाय दुकाने, हॉटेलमध्येही २००० ची नोट स्वीकारण्यात येत आहे. पेट्रोल पंप आणि काही बारमध्ये अशा नोटा देणाऱ्यांचे प्रमाण किरकोळ स्वरूपात वाढले आहे.

पालघरमध्ये गर्दी नाहीनोटा बदलण्याच्या पहिल्या दिवशी वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात दुपारपर्यंत अल्प प्रतिसाद होता. कुठेही रांगा दिसून आल्या नाहीत.

टॅग्स :Note BanनोटाबंदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक