शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

सावरशेतचे पुनर्वसन भुखंडाअभावी रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 17:36 IST

भातसा धरण परिसरात पावसाळ्यात  होणाऱ्या अतिवृष्टीने धरणातील पाण्याची पातली ओलांडली जाऊ नये म्हणून दरवर्षीच्या पावसाळ्यात धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो

शेणवा : भातसा धरणातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि शासकीय नोकर भरतीत समाविष्ट करून घेण्याची मागणी प्रलंबित असताना आता धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या सावरशेत ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी शासनाकडे केली आहे मात्र बुडीत क्षेत्रात नसलेल्या या गावच्या पुनर्वसनासाठी भातसा वसाहतीत भूखंडच उपलब्ध नसल्याने या गावचे पुनर्वसन कोठे करावे असा यक्ष प्रश्न शासनासमोर उभा ठाकला असून भुखंडाअभावी पुनर्वसन रखडण्याच्या शक्यतेने सावरशेत ग्रामस्थ चिंता व्यक्त करीत आहेत.

       भातसा धरण परिसरात पावसाळ्यात  होणाऱ्या अतिवृष्टीने धरणातील पाण्याची पातली ओलांडली जाऊ नये म्हणून दरवर्षीच्या पावसाळ्यात धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो त्यासाठी धरणाचे पाचही दरवाजे उघडले जात असल्याने दळणवळणासाठी असलेल्या एकमेव रस्त्यावरील चोरना नदीवरील पुल पाण्याखाली बुडतो परिणामी ग्रामस्थां समोर उभ्या ठाकणाऱ्या दळण वळणाच्या गंभीर समस्येसह धरणातील पाण्याच्या दबावाने धरणाचे दरवाजे उडाल्यास कोकणातील तिवरे धरणाच्या घटनेच्या पुनरावृत्तीच्या  शक्यतेने प्रचंड दडपनाखाली जीवन व्यतीत करणाऱ्या भातसा धरणाच्या पायथ्याशी पाचशे मीटर अंतरावर वसलेल्या 352 लोकसंख्या असलेल्या  सावरशेतमधील 83 कुटुंबीयांनी  भातसा वसाहतीत पुनर्वसन करण्याची मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे,जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधकाऱ्यांनी सावरशेत हे गाव बुडीत क्षेत्रात आहे का ? किती कुटुंब व लोकसंख्येचे पुनर्वसन करावे लागेल ?भातसा वसाहतीत भूखंड उपलब्ध आहे का ? याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत  दरम्यान सावरशेत बुडीत क्षेत्रात येत नसून या गावच्या पूनर्वसनासाठी भातसा वसाहतीत भुखंडच उपलब्ध नसल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्याने .महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या सावरशेतच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न जिल्हाधिकारी फेटाळून लावण्याची शक्यता वर्तविण्यात येते . 

भातसा धरण क्षेत्राअंतर्गत जलसंपदा विभागाकडे 200.94 एकर जमीन उपलब्ध असून यातील 128 एकर क्षेत्रात भातसा प्रकल्प कार्यालय, कर्मचाऱ्यांसाठी निवास गृह, शाळा, विश्रामगृह,दवाखाना, बँक,बाजारपेठ वसलेली आहे.16.69 एकर क्षेत्र एकलव्य आश्रम शाळेला त्यांच्या मागणीनुसार देण्यात आली आहे.भातसा धरणाच्या बुडीत क्षेत्रात असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 26.68 एकर क्षेत्र आरक्षित आहे. तर 67.34 एकर क्षेत्र पर्यटन विभागाच्या मागणीनुसार प्रस्तावित असल्याने आता भातसा वसाहतीत भुखंडचं शिल्लक नसल्याचे सहाय्यक अभियंता राहुल पारेख यांनी सांगितले असून सावरशेत ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनला आहे

 सावरशेत गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित होताच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावचा पाहणी दौरा केला यावेळी जलसंपदा विभागाने भूखंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडऊ .             पांडुरंग बरोरा,  मा. आमदार, शहापूर विधानसभा