शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महागाईमुळे नोंदणी विवाहांना पसंती; वर्षभरात लागले ३३५९ विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 23:15 IST

वाढती महागाई, सोन्याचे गगनाला भिडणारे दर लक्षात घेता आजकाल लग्नसोहळ्यांवरदेखील काहीसे निर्बंध येऊ लागले आहेत.

ठाणे : वाढती महागाई, सोन्याचे गगनाला भिडणारे दर लक्षात घेता आजकाल लग्नसोहळ्यांवरदेखील काहीसे निर्बंध येऊ लागले आहेत. पूर्वी धामधुमीत होणारे लग्न सोहळे आता कमी झाले असून त्यांची जागा आता रजिस्टर मॅरेजने अधिक प्रमाणात घेतल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत तीन हजार ३५९ विवाह अशा पद्धतीने झाल्याची माहिती जिल्हा विवाहनोंदणी कार्यालयाने दिली.

एकीकडे विधिवत मुहूर्त काढून लग्न लावण्यावर पूर्वी भर असायचा. सर्व विधी हे मुहूर्तावर केले जात होते. आजकाल मात्र काडीमुहूर्तावरदेखील लग्नसोहळे उरकले जातात. आपल्याकडे तुळशीविवाह झाला की, लग्नसोहळ्याला सुरुवात होत असते. परंतु, आता बदललेल्या चालीरीतीनुसार मुहूर्ताचीही वाट पाहिली जात नसून नोव्हेंबरमध्ये पाठोपाठ आलेल्या अमावस्येच्या मुहूर्तावर एक, दोन नाही तर तब्बल १८ विवाह पार पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही लग्नसोहळ्यावर केले जाणारे खर्चही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. त्यामुळेच आता नोंदणी विवाहांना पसंती मिळू लागली आहे.

पोेशाखांचा ट्रेण्ड बदलतोय

त्यातच, आता लग्नसोहळ्यासाठी एक वेगळा ट्रेण्डही निर्माण झाला आहे. लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा दिवस. लग्नसराई हा दोन कुटुंबांचा नव्या नात्याचा सोहळा मानण्यात येतो. त्यामुळे वधूवरांसह त्यांच्या नातेवाइकांना मिरवण्याची यातून संधी प्राप्त होते. त्यामुळेच की काय, साखरपुड्यापूर्वी दोन्हीकडची मंडळी खास बस्ता बांधण्यासाठी जात असतात. आताही तो बांधला जातो. परंतु, वधूवरांच्या कपड्यांचा ट्रेण्ड बदलला आहे. वधूही पैठणीकडे पाठ फिरवून चनियाचोळीला पसंती देत आहेत. वर सुटबूट टाळून शेरवानीकडे वळले आहेत. वर पाश्चिमात्य पद्धतीच्या पेशवाई, पटियाळा यांना पसंती देत आहेत.

मेकअपचा चेहरामोहरा व हेअरस्टाइल

कालानुरूप लग्नातील वधूवरांचा पोशाख स्मार्ट झाला असतानाच हेअरस्टाइल, मेकअप आणि ज्वेलरीमध्येही स्मार्ट ट्रेण्ड्स आले आहेत. पूर्वी चापून-चोपून केस बांधणाऱ्या वधूला नवनवीन आलेल्या हेअरस्टाइल पसंतीस उतरत आहेत. त्यातल्या त्यात मेसी लुकवाल्या स्टाइलकडे वधंूचा अधिक कल दिसत आहे.

जेवणाचा मेनू पिझ्झासह चायनीजचा साज

लग्न म्हटले की, जेवण आलेच. पूर्वी वरणभात, पापड, लोणचे एखाद-दोन भाज्या,मिठाई किंवा कोशिंबिरीने थाळी सजली जायची. आता मेनूही बदलले आहेत. पनीर मख्खनवाला, पिझ्झा, गार्लिक टोस्ट, केक, डेझर्टची, चायनीजची मागणी वाढली आहे.

टॅग्स :thaneठाणेGoldसोनं