शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Covid 19 : गृह विलीगकरणातील रुग्णांचा अलगीकरण केंद्रात दाखल होण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 18:55 IST

राज्य शासनाकडून १८ जिल्ह्यांत गृह विलगीकरण बंद. रुग्णांचा अलगीकरण केंद्रात जाण्यास नकार

ठळक मुद्देराज्य शासनाकडून १८ जिल्ह्यांत गृह विलगीकरण बंद. रुग्णांचा अलगीकरण केंद्रात जाण्यास नकार

अजित मांडके

ठाणे  :  राज्य शासनाने १८ जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद केले आहे. त्यानंतर आता ठाणो महापालिकेने देखील गृह विलीगकरणातील रुग्णांना अलगीकरण केंद्रात दाखल व्हावे अशी विनंती करीत आहेत. परंतु हे रुग्ण घरी योग्य प्रकारच्या सोई सुविधा आहेत, काम थांबेल, इंटरनेटची सुविधा मिळणार नाही. घरचे जेवण मिळणार नाही अशी विविध कारणो देऊन अलगीकरण केंद्रात जाण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेची चिंता मात्र वाढू लागली आहे.ठाणे  महापालिका हद्दीत १ लाख २८ हजार कोरोना बाधित रुग्ण आतार्पयत आढळून आले आहेत. त्यातील १ लाख २५ हजार ५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ हजार ९१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या १ हजार ५३७ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरु आहेत. त्यातील ५८२ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणो आढळून आलेली आहेत. तर ७०७ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणो आढळून आलेली नाहीत. तर २४८ रुग्ण गंभीर असून, १६७ आयसीयु आणि ८१ रुग्ण हे वेटींलेटेवर असल्याचे दिसून आले आहे. तर आजही ५४९ रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ५० टक्के रुग्ण हे राज्य शासनाचा आदेश होण्यापूर्वीचे असून उर्वरीत नंतरचे असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.१८ जिल्ह्यांता गृह विलगीकरण बंददरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्यातील १८ जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद केल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने देखील आता गृह विलगीकरण बंद केले आहे. परंतु असे असले तरी ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, असे रुग्ण आजही घरीच उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांनी महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे अशी विनंती महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. परंतु हे रुग्ण जाण्यास तयार नाहीत, आम्ही घरीच बरे होऊ असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. तसेच घरात असलो तरी आमची खोली वेगळी आहे, वॉशरुम वेगळा आहे, तसेच घरच्या घरी जे हवे ते वेळेत खाण्यासही मिळत आहे. अशी काहीशी कारणो सांगितली जात आहेत. 

यापुढेही जाऊन कोरोना झाला असला तरी लक्षणे नसल्याने घरच्या घरी बसून काम करता येत आहे, कामाचे खाडे होत नाहीत, तसेच कामामुळे इतर कोणत्याही गोष्टींचा विचार मनात येत नाही. काम करण्यासाठी इंटरनेट आणि लॅपटॉपची सुविधा देखील उपलब्ध आहे. परंतु अलगीकरण केंद्रात दाखल झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या हाल ते होतीलच शिवाय, तेथे दिवस काढणे देखील कठीण होऊन जाणार आहे. तसेच कपड्यांची बॅग घेऊन पुन्हा घरच्यांपासून वेगळे होऊन घरच्यांही मनात भीती निर्माण होणार आहे. अशी काहीशी कारणे दिली जात असून हे रुग्ण महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल होत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र