शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

Covid 19 : गृह विलीगकरणातील रुग्णांचा अलगीकरण केंद्रात दाखल होण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 18:55 IST

राज्य शासनाकडून १८ जिल्ह्यांत गृह विलगीकरण बंद. रुग्णांचा अलगीकरण केंद्रात जाण्यास नकार

ठळक मुद्देराज्य शासनाकडून १८ जिल्ह्यांत गृह विलगीकरण बंद. रुग्णांचा अलगीकरण केंद्रात जाण्यास नकार

अजित मांडके

ठाणे  :  राज्य शासनाने १८ जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद केले आहे. त्यानंतर आता ठाणो महापालिकेने देखील गृह विलीगकरणातील रुग्णांना अलगीकरण केंद्रात दाखल व्हावे अशी विनंती करीत आहेत. परंतु हे रुग्ण घरी योग्य प्रकारच्या सोई सुविधा आहेत, काम थांबेल, इंटरनेटची सुविधा मिळणार नाही. घरचे जेवण मिळणार नाही अशी विविध कारणो देऊन अलगीकरण केंद्रात जाण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेची चिंता मात्र वाढू लागली आहे.ठाणे  महापालिका हद्दीत १ लाख २८ हजार कोरोना बाधित रुग्ण आतार्पयत आढळून आले आहेत. त्यातील १ लाख २५ हजार ५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ हजार ९१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या १ हजार ५३७ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरु आहेत. त्यातील ५८२ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणो आढळून आलेली आहेत. तर ७०७ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणो आढळून आलेली नाहीत. तर २४८ रुग्ण गंभीर असून, १६७ आयसीयु आणि ८१ रुग्ण हे वेटींलेटेवर असल्याचे दिसून आले आहे. तर आजही ५४९ रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ५० टक्के रुग्ण हे राज्य शासनाचा आदेश होण्यापूर्वीचे असून उर्वरीत नंतरचे असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.१८ जिल्ह्यांता गृह विलगीकरण बंददरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्यातील १८ जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद केल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने देखील आता गृह विलगीकरण बंद केले आहे. परंतु असे असले तरी ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, असे रुग्ण आजही घरीच उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांनी महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे अशी विनंती महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. परंतु हे रुग्ण जाण्यास तयार नाहीत, आम्ही घरीच बरे होऊ असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. तसेच घरात असलो तरी आमची खोली वेगळी आहे, वॉशरुम वेगळा आहे, तसेच घरच्या घरी जे हवे ते वेळेत खाण्यासही मिळत आहे. अशी काहीशी कारणो सांगितली जात आहेत. 

यापुढेही जाऊन कोरोना झाला असला तरी लक्षणे नसल्याने घरच्या घरी बसून काम करता येत आहे, कामाचे खाडे होत नाहीत, तसेच कामामुळे इतर कोणत्याही गोष्टींचा विचार मनात येत नाही. काम करण्यासाठी इंटरनेट आणि लॅपटॉपची सुविधा देखील उपलब्ध आहे. परंतु अलगीकरण केंद्रात दाखल झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या हाल ते होतीलच शिवाय, तेथे दिवस काढणे देखील कठीण होऊन जाणार आहे. तसेच कपड्यांची बॅग घेऊन पुन्हा घरच्यांपासून वेगळे होऊन घरच्यांही मनात भीती निर्माण होणार आहे. अशी काहीशी कारणे दिली जात असून हे रुग्ण महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल होत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र