शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

समग्र शिक्षा अभियानाचा निधी कमी केल्याने शाळांच्या विकासाची पाटी कोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:48 IST

ठाणे : जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानाद्वारे ग्रामीण भागातील शाळांना संजीवनी मिळाली आहे. त्याद्वारे नवी शाळागृहे, शाळांभोवती संरक्षक भिंत, नवी ...

ठाणे : जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानाद्वारे ग्रामीण भागातील शाळांना संजीवनी मिळाली आहे. त्याद्वारे नवी शाळागृहे, शाळांभोवती संरक्षक भिंत, नवी शौचालये, आदींसाठी निधी उपलब्ध होत असे. परंतु, आता केंद्र शासनाने या अभियानाऐवजी २०१८ पासून ‘समग्र शिक्षा अभियान’ सुरू केले आहे. मात्र, या अभियानापासून या शाळांच्या निधीत केंद्र सरकारने कपात केल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास करण्यात अडचणी येत आहेत. याकडे लक्ष केंद्रित करून समग्र शिक्षा अभियानाच्या निधीत भरघोस वाढ करावी, असे साकडे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, यांनी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना घातले आहे.

रविवारी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी पाटील ठाण्यात आले होते. यावेळी पवार यांनी ‘समग्र शिक्षा अभियान’ला फारसा निधी मिळत नसल्याचे वास्तव लक्षात आणून दिले. या अभियानाच्या निधीत केंद्राने कपात केल्यामुळे शाळांची आवश्यक कामे करणे शक्य होत नाही. प्रसंगी जिल्हा परिषद स्वनिधी वापरून ती करावी लागत आहेत. या कामांसाठी सरकारने भरीव मदत मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शिक्षकांनी कोरोनाच्या काळात उत्तम पद्धतीने काम केले. शिक्षकांना कोणतीही अडचण भेडसावू नये, यासाठी जिल्हा परिषदेने एक वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणीही पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे सध्या लावून धरली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त विजेत्यांना रोख रक्कम वा वस्तू देण्यासाठी पुढील वर्षी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यासाठी पवार यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.