शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
9
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
10
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
11
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
12
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
13
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
14
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
15
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
16
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
17
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
18
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
19
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
20
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!

समग्र शिक्षा अभियानाचा निधी कमी केल्याने शाळांच्या विकासाची पाटी कोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:48 IST

ठाणे : जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानाद्वारे ग्रामीण भागातील शाळांना संजीवनी मिळाली आहे. त्याद्वारे नवी शाळागृहे, शाळांभोवती संरक्षक भिंत, नवी ...

ठाणे : जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानाद्वारे ग्रामीण भागातील शाळांना संजीवनी मिळाली आहे. त्याद्वारे नवी शाळागृहे, शाळांभोवती संरक्षक भिंत, नवी शौचालये, आदींसाठी निधी उपलब्ध होत असे. परंतु, आता केंद्र शासनाने या अभियानाऐवजी २०१८ पासून ‘समग्र शिक्षा अभियान’ सुरू केले आहे. मात्र, या अभियानापासून या शाळांच्या निधीत केंद्र सरकारने कपात केल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास करण्यात अडचणी येत आहेत. याकडे लक्ष केंद्रित करून समग्र शिक्षा अभियानाच्या निधीत भरघोस वाढ करावी, असे साकडे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, यांनी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना घातले आहे.

रविवारी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी पाटील ठाण्यात आले होते. यावेळी पवार यांनी ‘समग्र शिक्षा अभियान’ला फारसा निधी मिळत नसल्याचे वास्तव लक्षात आणून दिले. या अभियानाच्या निधीत केंद्राने कपात केल्यामुळे शाळांची आवश्यक कामे करणे शक्य होत नाही. प्रसंगी जिल्हा परिषद स्वनिधी वापरून ती करावी लागत आहेत. या कामांसाठी सरकारने भरीव मदत मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शिक्षकांनी कोरोनाच्या काळात उत्तम पद्धतीने काम केले. शिक्षकांना कोणतीही अडचण भेडसावू नये, यासाठी जिल्हा परिषदेने एक वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणीही पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे सध्या लावून धरली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त विजेत्यांना रोख रक्कम वा वस्तू देण्यासाठी पुढील वर्षी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यासाठी पवार यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.