शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

ओखीच्या तडाख्यामुळे ठाण्यात २०१० नंतर विक्रमी पावसाची नोंद, सात वर्षात दुसऱ्यांदा झाला असा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:05 IST

ओखीच्या तडाख्यामुळे ठाण्यालाही रात्री पासून पाऊस सुरु झाला आहे. परंतु या पावसाने २०१० नंतर सात वर्षात दुसºयांदा विक्रमी पावसाची नोंद केली आहे.

ठळक मुद्दे२०१० ला झाला होता ३७५७ मीमी पाऊससतर्कतेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज

ठाणे : ओखीच्या तडाख्यामुळे ठाण्यासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे आधीच गारठा आणि त्यात पाऊस यामुळे ठाणेकर मात्र आणखीनच गारठून गेले आहेत. असे असले तरी २०१० नंतरचा दुसऱ्या  क्रमांकाच्या पावसाची नोंद मात्र या ओखीमुळे झाली आहे. २०१० मध्ये ठाण्यात ३७५७ मीमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदा आतापर्यंत ३६२४ मीमी पावसाची नोंद झाली आहे.ओखीमुळे ठाण्यात सोमवारी सांयकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री आणि पहाटे पावसाचा जोर काहीसा वाढलेला दिसून आला. रात्रीपासून आतापर्यंत शहरात १४ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर रात्री ठाणे आपत्ती विभागाला १२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यात आगीच्या दोन, शॉक सर्किटची एक, वृक्ष पडल्याची एक, फांद्या पडल्याच्या दोन आणि इतर ६ अशा तक्रारी आल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. परंतु, दुपारी १२.४३ ला ४.३५ मीटरची भरती असल्याने खाडीला मात्र उधाण आले होते. कोपरीतील खाडीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याचे दिसून आले. याशिवाय ओखी वादळामुळे जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगर पालिकांना ठाणे महापालिकेने पत्र पाठवून या काळात होणाऱ्या  घटनांची माहिती तत्काळ ठाणे आपत्ती विभागाला द्यावी जेणे करून धोका टाळण्यासाठी मदत होईल, असे सांगण्यात आले आहे. तसेच, सतर्कतेच्या सुचनादेखील दिल्या आहेत.दरम्यान सोमवारी रात्रीपासून संध्याकाळपर्यंत १४ मीमी पावसाची नोंद झाली आहे. २०१० नंतर अधिक पावसाची नोंद यंदा झाली आहे. २०१० मध्ये ३७५७ मीमी पाऊस झाला होता. त्यानंतर यंदा ३६२४ मीमी पावसाची नोंद ठाण्यात झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाRainपाऊस