शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जव्हार तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:18 IST

जनजीवन विस्कळीत; घर पडल्याच्या ४० घटना

- हुसेन मेमनजव्हार : तालुक्यात पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरू असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील कित्येक रस्ते, मोऱ्या वाहून गेल्याची घटना घडली तर घरे जमीन दोस्त झाली. कित्येक पूल पाण्याखाली जाऊन पुलांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जव्हार तालुक्यात आजही पावसाचा जोर कायम असून संततधार सुरू आहे. १ ते ६ आॅगस्टदरम्यान साखरशेत मंडळात ६८७, जामसर मंडळात ९६०, जव्हार येथे १०४५ मि.मी. तर तालुक्यात २६९२ मि.मी. अशी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जूनपासून आजतागायत ३७६५.६७ मिमी. इतकी नोंद केल्याची माहिती जव्हार अपातकालीन यंत्रणेकडून मिळाली.पावसामुळे खेड्यापाड्यातील जवळपास ४० घरांची छोटी मोठी पडझड झाली असून त्यांचे पंचनामे करण्यात आल्याची नोंद आहे. यामुळे गरीब आदिवासी कुटुंबाचे हाल झाले आहेत. पावसाचा जोरही वाढल्याने कित्येक गावांचा संपर्कही तुटला होता. या प्रलयामुळे कित्येक कुटुंब बेघर झाली आहेत.चौथ्याची वाडी येथील रस्ता दोन दिवसांपूर्वी वाहून गेल्यामुळे ३५ ते ४० गावांचा संर्पक तुटला असून यामुळे हजारो नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत तहसीलदार संतोष शिंदे यांनी बांधकाम विभागाला रस्ता तत्काळ दुरूस्त करून पूर्ववत करण्याचे निर्देश दिले असून बांधकाम विभागाने कामही सुरू केल्याचे सांगितले. बायपास रोडही खचला असून त्या रस्त्याची दुरूस्ती तत्काळ करून रस्ता लवकरात लवकर पूर्ववत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.