शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

ठाणे जिल्ह्यात यंदा खरीपाच्या भाताचे हेक्टरी ३९ क्विंटल विक्रमी उत्पादन!

By सुरेश लोखंडे | Updated: December 6, 2022 18:18 IST

जिल्ह्यातील बळीराजा यंदा सुखावला आहे. गेल्या काही विर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ३९ क्ंिवटल ४२ किलो भाताचे विक्रमी उत्पादन झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील बळीराजा यंदा सुखावला आहे. गेल्या काही विर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ३९ क्ंिवटल ४२ किलो भाताचे विक्रमी उत्पादन झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे भात उत्पादनाच्या विक्रमी व भरघोस उत्पादन वाढीमुळे जिल्ह्यातील बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात यंदा ५५ हजार ६०३ हेक्टर शेतीत भात पिकांची लागवड झाली होती. त्यावर यंदाच्या वर्षी सरासरीच्या ११२ टक्के एवढा मुबलक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या खरीप हंगामातील भातासाठी १० हजार ८४२.१६ मे.टन खताचा वापर शेतकºयांनी केलेला आहे. या हंगामात संकरित वाणाची ७६८.४७ क्विंटल व सुधारित वाणाची १० हजार ३१७ क्विंटल बियाण्याचा वापर शेतकºयांनी केलेला आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत भात पिकाच्या कापण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकºयांची मेहनत, सुधारित व संकरित जाती व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, निसगार्ची साथ, भात पिकावरील किड, रोग सर्वेक्षणावरील प्रभावी अंमलबजावणी आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची जोड असल्याने चालू वर्षी भाताच्या उत्पन्नात २३ टक्के वाढ झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात हेक्टरी ३९ क्विंटल ४२ किलो विक्रमी भाताचे उत्पादन हाती आल्याचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी लोकमतला सांगितले.