शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 14:24 IST

कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. त्यामुळे पादचारी व रेल्वे प्रवाशांना मार्गक्रमण करणो गैरसोयीचे होत आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. त्यामुळे पादचारी व रेल्वे प्रवाशांना मार्गक्रमण करणो गैरसोयीचे होत आहे. या प्रकरणी मनसेच्या पदाधिका-यांनी आज आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन फेरीवाल्यांना स्टेशन परिसरातून हटविण्याची मागणी केली. 

मनसेचे नेते राजू पाटील यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, माजी आमदार प्रकाश भोईर, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, गटनेते प्रकाश भोईर, पदाधिकारी हर्षद पाटील, राहूल कामत आदींनी आयुक्त वेलरासू यांची भेट घेतली. एल्फीस्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावर झालेल्या दुर्घटनेपश्चात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई नगरातील सर्व रेल्वे स्थानकातील फेरीवाले हटविले नाही तर मनसे आंदोलन करणार असा इशारा देत मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. 

त्यानंतर स्टेशन परीसरातील फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरु होती. फेरीवाल्यांना चांगलाच चेप बसला होता. मनसेच्या आंदोलनाची दखल स्थानिक स्वराज्य संस्था, रेल्वे प्रशासन व पोलिसांना घ्यावी लागली होती. ठाणो येथे पार पडलेल्या ठाकरे यांच्या जाहिर सभेत फेरीवाल्यांच्या कारवाईचा पुनर्उच्चर ठाकरे यांनी केला होता. दरम्यान त्यांनी मागच्या महिन्यात आयुक्त वेलरासू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन फेरीवाले हटविण्याची मागणी केली होती. त्यावेळी आयुक्तांनी रेल्वे प्रशासनाशी आमचे बोलणो सुरु असून कारवाई सुरु असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई थंडावली आहे. 

रेल्वे पादचारी पूलावर व स्टेशन परिसरात काही प्रमाणात फेरीवाले पुन्हा बसू लागले आहे. कारवाईची पकड ढिल्ली झाल्याने मनसेचे पदाधिका:यांनी आयुक्तांची भेट घेऊन फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई थंड का झाली आहे असा सवाल उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी येत्या मंगळवारी पोलिस प्रशासनासोबत फेरीवाला कारवाई संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर काय कारवाई केली जाईल हे सांगून असे आयुक्तांनी मनसे पदाधिका-यांना सांगितले. 

मनसे मंगळवारपर्यंत धीर धरण्याची तयारी ठेवली आहे. मंगळवारी आयुक्तांकडून काय सांगितले जाते. त्यानंतर मनसे आंदोलन करणार हे मात्र निश्चीत असल्याचे पदाधिका:यांनी सांगितले. हे आंदोलन खळखट्टय़ाकचेच असणार आहे. आयुक्तांनी दिलेली मंगळवारची डेडलाईन व मनसेही मंगळवार्पयतच वाट पाहिली जाणार आहे असे स्पष्ट केले आहे. 

फेरीवाला प्रकरणी मनसेकडून प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. स्टेशन परिसरात विशिष्ट अंतर सोडले तर त्याच्या आत फेरीवाला नसावा. हा न्यायालयाचा आदेश आहे. या आदेशाची अवमानना महापालिका व रेल्वे प्रशासनाकडूनच केली जात आहे. न्यायालयाच्या अवमानतेप्रकरणी ही याचिकाही मंगळवारनंतरच दाखल करण्यात येईल असे मनसेकडून सांगण्यत आले आहे.