शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मोबाईल क्रमांकाच्या नोंदणीतून मिळवा वीजबील संबंधीत घरबसल्या माहिती; २० लाख १३ हजार ग्राहकांनी केली नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 14:52 IST

उर्वरित ग्राहकांनीही नोंद कराण्याची मुख्य अभियंता अग्रवाल यांचे आवाहन  

डोंबिवली: कल्याण परिमंडळातील २० लाख १३ हजार ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी महावितरणकडे केली असून या ग्राहकांना रिडींग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती 'एसएमएस'द्वारे पाठविण्यात येत आहे. परिमंडलातील उर्वरित ४ लाख ६८ हजार वीज ग्राहकांनीही आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. 

कल्याण परिमंडळात कृषिपंप ग्राहक वगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर असे एकूण २४ लाख ८२ हजार वीज ग्राहक आहेत. यातील जवळपास ८१ टक्के ग्राहक मोबाईल नोंदणीच्या माध्यमातून महावितरणशी जोडले आहेत. या ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रिडींग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा 'एसएमएस' महावितरणकडून पाठविण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तक्रार करण्यासाठीचा टोल फ्री क्रमांक १९१२ हा 'एसएमएस'च्या शेवटी नमूद आहे. या तपशिलाची पडताळणी करून चुकीच्या नोंदीबाबत वेळीच तक्रार करण्याची सुविधा यातून ग्राहकांना मिळते. त्यामुळे बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात. तर वीजबिल तयार झाल्यानंतरही काही तासांमध्ये बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा 'एसएमएस' ग्राहकांना पाठविला जातो. हा 'एसएमएस' बिल भरणा केंद्रावर दाखवून बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. 

'एसएमएस' दाखविणाऱ्या ग्राहकांकडे बिलाची मूळ किंवा दुय्यम प्रत मागू नये, अशी सक्त ताकीद सर्व बिल भरणा केंद्रांना देण्यात आली आहे. याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीज पुरवठा व वीजपुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याबाबत आगाऊ माहिती देणारा 'एसएमएस' ग्राहकांना पाठविण्यात येतो. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीज पुरवठा बंद झाल्याची व हा पुरवठा केंव्हा पूर्ववत होऊ शकेल, याची माहितीही 'एसएमएस'द्वारे ग्राहकांना पाठविण्यात येते.

एखाद्या कारणास्तव मीटरचे रिडींग घेणे अशक्य असल्यास ग्राहकानेच मीटर रिडींग घेऊन महावितरणला सादर करण्याबाबतही 'एसएमएस'द्वारे कळविले जाते. वीज कायदा-२००३ चे कलम ५६ (१) नुसार थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीसही नोंदणीकृत मोबाईलवर 'एसएमएस'द्वारे बजावण्यात येते. तेंव्हा परिमंडळातील उर्वरित ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे तातडीने नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच नोंदणीकृत मोबाईल बंद, चुकीचा असेल किंवा क्रमांक बदलला असल्यास नवीन क्रमांक प्राधान्याने अद्ययावत करावेत, असे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे. 

असा नोंदवा मोबाईल क्रमांक

नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG नंतर स्पेस द्यावा व त्यानंतर आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर 'एसएमएस' पाठवावा. या एका 'एसएमएस'वरून ग्राहकाच्या मोबाईलची नोंदणी होते. याशिवाय महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ किंवा मोबाईल (अ‍ॅप) अँपवरूनही मोबाईलची नोंदणी करता येते.  

टॅग्स :mahavitaranमहावितरणMobileमोबाइलelectricityवीजdombivaliडोंबिवलीthaneठाणे