शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

मोबाईल क्रमांकाच्या नोंदणीतून मिळवा वीजबील संबंधीत घरबसल्या माहिती; २० लाख १३ हजार ग्राहकांनी केली नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 14:52 IST

उर्वरित ग्राहकांनीही नोंद कराण्याची मुख्य अभियंता अग्रवाल यांचे आवाहन  

डोंबिवली: कल्याण परिमंडळातील २० लाख १३ हजार ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी महावितरणकडे केली असून या ग्राहकांना रिडींग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती 'एसएमएस'द्वारे पाठविण्यात येत आहे. परिमंडलातील उर्वरित ४ लाख ६८ हजार वीज ग्राहकांनीही आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. 

कल्याण परिमंडळात कृषिपंप ग्राहक वगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर असे एकूण २४ लाख ८२ हजार वीज ग्राहक आहेत. यातील जवळपास ८१ टक्के ग्राहक मोबाईल नोंदणीच्या माध्यमातून महावितरणशी जोडले आहेत. या ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रिडींग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा 'एसएमएस' महावितरणकडून पाठविण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तक्रार करण्यासाठीचा टोल फ्री क्रमांक १९१२ हा 'एसएमएस'च्या शेवटी नमूद आहे. या तपशिलाची पडताळणी करून चुकीच्या नोंदीबाबत वेळीच तक्रार करण्याची सुविधा यातून ग्राहकांना मिळते. त्यामुळे बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात. तर वीजबिल तयार झाल्यानंतरही काही तासांमध्ये बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा 'एसएमएस' ग्राहकांना पाठविला जातो. हा 'एसएमएस' बिल भरणा केंद्रावर दाखवून बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. 

'एसएमएस' दाखविणाऱ्या ग्राहकांकडे बिलाची मूळ किंवा दुय्यम प्रत मागू नये, अशी सक्त ताकीद सर्व बिल भरणा केंद्रांना देण्यात आली आहे. याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीज पुरवठा व वीजपुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याबाबत आगाऊ माहिती देणारा 'एसएमएस' ग्राहकांना पाठविण्यात येतो. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीज पुरवठा बंद झाल्याची व हा पुरवठा केंव्हा पूर्ववत होऊ शकेल, याची माहितीही 'एसएमएस'द्वारे ग्राहकांना पाठविण्यात येते.

एखाद्या कारणास्तव मीटरचे रिडींग घेणे अशक्य असल्यास ग्राहकानेच मीटर रिडींग घेऊन महावितरणला सादर करण्याबाबतही 'एसएमएस'द्वारे कळविले जाते. वीज कायदा-२००३ चे कलम ५६ (१) नुसार थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीसही नोंदणीकृत मोबाईलवर 'एसएमएस'द्वारे बजावण्यात येते. तेंव्हा परिमंडळातील उर्वरित ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे तातडीने नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच नोंदणीकृत मोबाईल बंद, चुकीचा असेल किंवा क्रमांक बदलला असल्यास नवीन क्रमांक प्राधान्याने अद्ययावत करावेत, असे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे. 

असा नोंदवा मोबाईल क्रमांक

नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG नंतर स्पेस द्यावा व त्यानंतर आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर 'एसएमएस' पाठवावा. या एका 'एसएमएस'वरून ग्राहकाच्या मोबाईलची नोंदणी होते. याशिवाय महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ किंवा मोबाईल (अ‍ॅप) अँपवरूनही मोबाईलची नोंदणी करता येते.  

टॅग्स :mahavitaranमहावितरणMobileमोबाइलelectricityवीजdombivaliडोंबिवलीthaneठाणे