शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

थकबाकीमाफी कागदावरच, मात्र नोटिसांबाबत तत्परता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:35 IST

मोहिली, आंबिवलीत दीड कोटींची थकबाकी

कल्याण : मोहिली व आंबिवलीतील मालमत्ताधारकांना केडीएमसी प्रशासनाने मालमत्ता व पाणीबिलाच्या थकबाकीवसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या दोन्ही गावांतील थकबाकीदारांकडून महापालिकेस दीड कोटी रुपये येणे बाकी आहे.

दरम्यान, या दोन्ही गावांतील ग्रामस्थांची मालमत्ता व पाणीबिलाची थकबाकी माफ करण्याचा ठराव दोनदा महासभेत मंजूर झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केलेली नाही. या ठरावाची अंमलबजावणी करून दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोहिली व आंबिवली संघर्ष समितीचे सरचिटणीस सुरेश पाटील, कार्याध्यक्ष शिवाजी गोंधळी, सदस्य मधुकर म्हात्रे, हेमंत पाटील यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. ते म्हणाले, ‘महापालिकेविरोधात आंबिवली, मोहिली, बल्याणी व उंभार्लीचा संघर्ष होता. मात्र, त्यातून बल्याणी आणि उंभार्ली ही गावे बाहेर पडली. मोहिली व आंबिवली या गावांचा संघर्ष कायम राहिला. त्यामुळे या गावांना सोयीसुविधा पुरविल्या गेल्या नाहीत.

परिणामी, तेथील मतदारांनी २००२ ते २०१४ दरम्यान झालेल्या विविध निवडणुकांतील मतदानावर बहिष्कार टाकला. मात्र, २०१५ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना नेत्यांनी ग्रामस्थांना निवडणुकीवर बहिष्कार टाकू नका. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे मतदारांनी बहिष्कार मागे घेतला. परंतु, २०१५ पासून लागू केलेल्या मालमत्ता व पाणीपट्टीकराचा बोजा वाढला आहे. मोहिली व आंबिवलीतील थकबाकीदारांकडून महापालिकेला दीड कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे प्रशासनाने थकबाकीदारांना कर भरा, अन्यथा मालमत्ताजप्तीची कारवाई केली जाईल, अशा नोटिसा पाठविल्या आहेत. २०१९-२० या चालू वर्षातील मालमत्ताकर व पाणीपट्टी भरण्यास नोटीसधारक तयार आहेत.’

२०१६ मध्ये महासभेत नगरसेवक गोरख जाधव यांच्या प्रस्तावानुसार २७ गावांतील विकासासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करावी. थकीत पाणी व मालमत्ताकर माफ करावा, असा ठराव झाला होता. त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये जाधव यांनी २०१६ च्या ठरावाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी २०१८ मध्ये थकीत मालमत्ता व पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याचा ठराव केला. जाधव यांच्या ठरावाच्या अनुषंगाने उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी मांडा परिसरातील, मनसेच्या नगरसेविका तृप्ती भोईर यांनी चिकणघर येथील आणि शिवसेनेच्या नगरसेविका नमिता पाटील यांनी आंबिवली व मोहिलीतील मालमत्ता व पाणीपट्टी २००२ ते २०१५ कालावधीतील माफ करण्याची उपसूचना दिली होती.

सरकारकडे स्मरणपत्र पाठवायचे कोणी?उपसूचनेसह केलेला दुसऱ्या वेळेचा ठराव महापालिकेच्या दफ्तरी धूळखात पडून आहे. प्रशासनाने तो पुढे पाठविला तर सरकारकडून त्यावर कोणतेच उत्तर अद्याप प्राप्त झालेले नसल्यास त्याविषयीचे स्मरणपत्र सरकारदरबारी कोणी पाठवायचे, असा सवाल उपरोक्त सदस्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रkalyanकल्याण