शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीमाफी कागदावरच, मात्र नोटिसांबाबत तत्परता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:35 IST

मोहिली, आंबिवलीत दीड कोटींची थकबाकी

कल्याण : मोहिली व आंबिवलीतील मालमत्ताधारकांना केडीएमसी प्रशासनाने मालमत्ता व पाणीबिलाच्या थकबाकीवसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या दोन्ही गावांतील थकबाकीदारांकडून महापालिकेस दीड कोटी रुपये येणे बाकी आहे.

दरम्यान, या दोन्ही गावांतील ग्रामस्थांची मालमत्ता व पाणीबिलाची थकबाकी माफ करण्याचा ठराव दोनदा महासभेत मंजूर झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केलेली नाही. या ठरावाची अंमलबजावणी करून दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोहिली व आंबिवली संघर्ष समितीचे सरचिटणीस सुरेश पाटील, कार्याध्यक्ष शिवाजी गोंधळी, सदस्य मधुकर म्हात्रे, हेमंत पाटील यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. ते म्हणाले, ‘महापालिकेविरोधात आंबिवली, मोहिली, बल्याणी व उंभार्लीचा संघर्ष होता. मात्र, त्यातून बल्याणी आणि उंभार्ली ही गावे बाहेर पडली. मोहिली व आंबिवली या गावांचा संघर्ष कायम राहिला. त्यामुळे या गावांना सोयीसुविधा पुरविल्या गेल्या नाहीत.

परिणामी, तेथील मतदारांनी २००२ ते २०१४ दरम्यान झालेल्या विविध निवडणुकांतील मतदानावर बहिष्कार टाकला. मात्र, २०१५ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना नेत्यांनी ग्रामस्थांना निवडणुकीवर बहिष्कार टाकू नका. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे मतदारांनी बहिष्कार मागे घेतला. परंतु, २०१५ पासून लागू केलेल्या मालमत्ता व पाणीपट्टीकराचा बोजा वाढला आहे. मोहिली व आंबिवलीतील थकबाकीदारांकडून महापालिकेला दीड कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे प्रशासनाने थकबाकीदारांना कर भरा, अन्यथा मालमत्ताजप्तीची कारवाई केली जाईल, अशा नोटिसा पाठविल्या आहेत. २०१९-२० या चालू वर्षातील मालमत्ताकर व पाणीपट्टी भरण्यास नोटीसधारक तयार आहेत.’

२०१६ मध्ये महासभेत नगरसेवक गोरख जाधव यांच्या प्रस्तावानुसार २७ गावांतील विकासासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करावी. थकीत पाणी व मालमत्ताकर माफ करावा, असा ठराव झाला होता. त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये जाधव यांनी २०१६ च्या ठरावाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी २०१८ मध्ये थकीत मालमत्ता व पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याचा ठराव केला. जाधव यांच्या ठरावाच्या अनुषंगाने उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी मांडा परिसरातील, मनसेच्या नगरसेविका तृप्ती भोईर यांनी चिकणघर येथील आणि शिवसेनेच्या नगरसेविका नमिता पाटील यांनी आंबिवली व मोहिलीतील मालमत्ता व पाणीपट्टी २००२ ते २०१५ कालावधीतील माफ करण्याची उपसूचना दिली होती.

सरकारकडे स्मरणपत्र पाठवायचे कोणी?उपसूचनेसह केलेला दुसऱ्या वेळेचा ठराव महापालिकेच्या दफ्तरी धूळखात पडून आहे. प्रशासनाने तो पुढे पाठविला तर सरकारकडून त्यावर कोणतेच उत्तर अद्याप प्राप्त झालेले नसल्यास त्याविषयीचे स्मरणपत्र सरकारदरबारी कोणी पाठवायचे, असा सवाल उपरोक्त सदस्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रkalyanकल्याण