शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लेखका एव्हढाच वाचक ही प्रतिभावान असतो - संजय जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:39 IST

“टेक्नोलॉजी – तरून पिढी व साहित्य” या विषयावर जाहीर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन “वी नीड यु सोसायटी” या संस्थेने केले होते.

ठळक मुद्देलेखका एव्हढाच वाचक ही प्रतिभावान असतो - संजय जोशीटेक्नोलॉजीचा प्रचंड वेग व वैश्विक स्वरूप अचंबित करणारे विवेक गोविलकर यांनी मांडले टेक्नोलॉजी या विषयातील अन्तरप्रवाह

ठाणे : टेक्नोलॉजी हा शब्द गेली वीस वर्ष तीव्रतेने ऐकायला यायला लागला कारण याच काळात तो सामान्य जनतेच्या वापराचा व त्यामुळे परिचयाचा झाला. ही  टेक्नोलॉजी विकसित करणारा वर्ग हा नैसर्गिक रीत्या युवा वर्ग आहे. त्याचा वापरही हाच वर्ग जास्त करत असतो. टेक्नोलॉजीचा प्रचंड वेग व वैश्विक स्वरूप अचंबित करणारे आहे. 

पूर्वी साम्राज्य विस्तार व संरक्षण या दोन प्रेरणेतून नवनवीन कल्पना व त्याचा वापर केला जात होता. शस्त्र विकसित करण्यात आपली कल्पकता मानवाने विशेषत्वाने वापरली. या आधुनिक टेक्नोलॉजीचे परिणामही सर्वच मानवी  जीवनावर होतच होते. व्यक्ती व समाज जीवनाची गुंतागुंत वाढली. यामुळे याचे विविध भाषेतील साहित्यात पडसाद उमटणे हे ही काल सुसंगतच आहे. या सर्वांची एकत्रित चर्चा मात्र फारशी होताना दिसत नाही. ती होणे हे गरजेचे आहे. कारण उद्याचा समाज टेक्नोलॉजी शिवाय जगू शकत नाही हे जसे खरे तसेच त्याचे चांगले व वाईट दोन्ही परिणाम मानवी जीवनाच्या सर्व बाजूवर होणार. या करता आपण त्याचा आवाका समजून घेऊन त्यावर काय उपाययोजना करायची किंवा करता येईल अशा भूमिकेतून  'टेक्नोलॉजी -तरुण पीढ़ी व साहित्य' या विषयावर जाहीर चर्चा आयोजित करण्यात आली आहे असे प्रस्ताविक संस्थेचे विश्वस्त जयंत कुलकर्णी यांनी केले. लोकजागर उपक्रमात वी निड यू सोसायटी या संस्थेने हा कार्यक्रम संयोजित केला होता.

सुरुवातीला निवेदन करतांना विवेक गोविलकर यांनी या विषयातील अन्तरप्रवाह मांडले. कॉरपोरेट क्षेत्रातील अनुभव व त्यावर आधारलेले साहित्य येत आहे. ही मराठी साहित्यतिल नव्या प्रवाहाची सुरवात आहे. गणेश मतकरी हे म्हणाले, की टेक्नोलॉजी बाबत मी सर्वसाधारण पणे बोलणार आहे. यात कोरपोरेट संस्कृती बाबत बोलणे हे ओघानेच आले. हे क्षेत्र नवे आहे याबाबत कमी लिहिल जाते. जे पुर्वी लिहिल जायचे ते मध्यमवर्ग केंद्रित होत. ८० नंतर ग्रामीण साहित्य नव्याने पुढे आले. नवीन प्रश्न समोर आले. शहरी भागात नवीन आर्थिक बदला नंतर जीवन शैलीत बदल झाले.सर्व जीवनच  ढवळून निघाले. व्यक्तिगत संबंध, कुटुम्ब व्यवस्था यात बाय फोर्स अनेक बदल स्विकारावे लागतात. यात संघर्षही होणे अपरिहार्य होते. याचे पडसाद सहित्यात उमटणे हे ही स्वभाविकच। संजय जोशी यानी लेखका एव्हढाच वाचकही  प्रतिभावान असतो व असला पाहिजे. तरच चांगले साहित्य निर्माण होते. मराठी सहित्यात समकालीन स्थितिला प्रतिसाद देण्याची परंपरा नाही. अनुभवा विना लिहू नये. कॉरपोरेट कथा वा कादंबरी अस काही नसत. तो  अनुभव असल्यामुळे मी जे लिहिल ते कॉरपोरेट पार्श्वभूमीवर आधारित होत. सध्या पीढीतील अन्तर कमी होत आहेत. लहान भाऊ मोठ्या भावाला म्हणतो की आपल्यात अंतर वाढले आहे. तू मागच्या पीढिचा आहेस. इतक्या वेगाने परिस्थिति बदलत आहे. हे समजून न घेता यापुढे लेखन करता येणार नाही. हे लेखकानी व वाचकानीही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

मराठी साहित्यासाठी  कठीण काळ आहे. कारण वाचकाची संख्या कमी होते आहे. असे निरीक्षण मतकरी यांनी नोंदवले. गोविलकर म्हणाले की वाचक संख्या कमी होते आहे हे पण दृष्य माध्यमात जेव्हा सैराट १०० कोटीचा टप्पा पार करतो तेव्हा संवादाचे माध्यम बदलत आहे. त्यात मराठी तगेल हे नक्की. जोशी म्हणाले कायम नकारात्मकता हे खरे नसते. शोषितांचे साहित्य आता थांबले असे नाही तर त्याची परिभाषा बदलली आहे. कारण जीवन शैलीतील बदल तिकड़ेही घडत आहे. आपण प्रतिसाद देण्यात कमी पडतो. अनेक तरुण तरुणी नवे लिखाण करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईtechnologyतंत्रज्ञान