शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मनसेने वाचला तक्रारींचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:27 IST

आयुक्तांचे शिष्टमंडळाला केवळ तोंडी आश्वासन

मीरा रोड : शहरातील वाढती बेकायदा बांधकामे, मेट्रोच्या कामामुळे छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर असलेली पामची सुमारे ६५० झाडे तोडण्याची भीती, नवघर आरोग्य केंद्राचे न झालेले उद्घाटन, शहरातील खड्डे, फेरीवाले, तक्रारींना न दिली जाणारी उत्तरे अशा विविध विषयांवर मनसेच्या शिष्टमंडळाने मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी केवळ तक्रारी दूर करण्याचे तोंडी आश्वासन शिष्टमंडळाला दिले.मीरा-भार्इंदर मनसेचे शहर संघटक हेमंत सावंत आणि दिनेश कनावजे, शशी मेंडन, रमाकांत माळी, चंद्रशेखर गजरे, विशाल चव्हाण, मनोज कोतवाल, कविता वायंगणकर, वैशाली येरु णकर, कुमकुम पाटण, गुणाजी मिस्त्री, दत्ता परब, सचिन मोरे, विनोद चव्हाण, धीरज पाटील, अरविंद जैन, योगेश साळवे आदी पदाधिकारी नुकतेच आयुक्त बालाजी खतगावकर यांना भेटले. शहरातील वाढत्या बेकायदा बांधकामांसह प्रभाग समिती ६ मध्ये सर्वात जास्त बांधकामे होत असल्याचा सूर मनसेने लावला. यासंबंधात सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक याबाबत बोलावण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसेच शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आयुक्तांनी रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवू तसेच अन्य फेरीवाल्यांसाठी मार्केट बांधत असून ते झाल्यानंतर स्थलांतर करण्यात येईल, असे सांगितले. शहरातील खड्डे दोन दिवसांत बुजवले जातील. नवघर आरोग्य केंद्र १० दिवसांत सुरू करू, असेही आयुक्त खतगावकर म्हणाले.आयुक्तांना आम्ही लेखी निवेदन दिले आहे. त्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. लेखी उत्तरही आयुक्त देणार आहेत. कार्यवाही नाही केली तर आठ दिवसांनी आम्ही पुन्हा आयुक्तांना भेटणार असून वेळ पडल्यास आंदोलन करू, असे हेमंत सावंत म्हणाले.झाडे तोडण्यास विरोधमेट्रोच्या कामामुळे काशिमीरानाका ते सावरकर चौक (गोल्डन नेस्ट) पर्यंतच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गातील दुभाजकांमध्ये असलेली पाम आदी साडेसहाशे झाडे तोडण्यास मनसेने विरोध केला. त्यावर आयुक्तांनी ही झाडे आवश्यकतेनुसार दुसरे उद्यान, रस्ते येथे लावली जातील, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMNSमनसे