शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सब घोडे बारा टक्के..! राजकीय नाट्याचा ठाण्यातील साहित्यिकांनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 01:34 IST

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शनिवारी सकाळी घडलेलं राजकीय नाट्य दिवसभर सर्वत्र चर्चिलं गेलं. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर भाष्य करत होते.

- स्नेहा पावसकरठाणे : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शनिवारी सकाळी घडलेलं राजकीय नाट्य दिवसभर सर्वत्र चर्चिलं गेलं. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर भाष्य करत होते. ठाण्यातील साहित्य क्षेत्रातील मंडळीनीही यावर आपल्या भाषेत शेरेबाजी केली आहे. आजचं हे एकूणच राजकीय नाट्य पाहून १९५२ साली विंदांनी लिहिलेली ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या राजकारणालाही लागू पडते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे.महाराष्टÑाच्या राजकारणात शुक्रवारी सकाळीच भूकंप झाला आणि त्याचे पडसाद अवघ्या काही मिनिटात सोशल मिडीयावरून उमटले. कवी महेश केळुसकर यांनी फेसबूकवर ‘काकांनी पावसात भिजवलेला ओला लंगोट वाळायच्या आत पुतण्याच्या ढुंगणाला खाज सुटली..., ताणता राजा’ अशा शब्दात पोस्ट शेअर केल्या. आज महाराष्टÑात जे काही घडलं ते मतदारांच्या आकलनापलीकडे चाललयं. विंदांनी लिहिलेली कविता आजही लागू पडते. पण विंदा असे म्हणाले होते की, ही कविता जेव्हा कालबाह्यहोईल तेव्हा मला आनंद होईल. पण विंदांना आनंद होईल असा क्षण येईल असे दिसत नाही, असेही केळुसकर म्हणाले.दुसरीकडे आजचा सगळा प्रकार म्हणजे सगळ्या प्राण्यांनाही लाजवेल असाच आहे. नीती, नियम, तत्त्व हे सगळं या राजकीय मंडळीनी सोडून दिलं आहे. तसेच आता कोणाचेही सरकार आले तरी, सर्व पक्षांच्याबाबत महाराष्टÑाच्या जनतेने अविश्वासाचा ठराव मूकपणे संमत केलेला आहे, हे नक्की अशा शब्दात कवी अशोक बागवे यांनी या राजकीय घडामोडीचा निषेध व्यक्त केला.अरूण म्हात्रे यांनी अशाप्रकारच्या सत्तास्थापनेतून लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवल्याचे म्हटले आहे. लोकांना गृहीत धरल जातं, परंतु आजच्या घडामोडींनंतर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे. अशा अभद्र पद्धतीनेही काही होऊ शकतं, हे आता लोकांना कळलंय. हा प्रकार म्हणजे जनतेचा विश्वासघात झालायं, असे म्हणत त्यांनी नाराजी दर्शवली.ज्येष्ठ लेखक, नाटककार अशोक समेळ यांनी तर दिवसभरात घडलेल्या घटना म्हणजे एखाद्या नाटकाप्रमाणे वाटते आणि हे नाटक अजून संपलेलं नाही. ते सुरू राहणार आहे. मुळातच मला या राजकीय घडामोडींवर आधारित एक नाटक लिहावसं वाटतंय, असे मत अशोक समेळ यांनी व्यक्त केले. मात्र गनिमी कावा हा शिवरायांनीही रात्रीच्या काळोखातच केला आणि आता भाजपनेही रात्रीच्या काळोखातच केला. बाकी कोणी कोणासोबत जावून सरकार स्थापन करावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे, असेही अशोक समेळ म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019