शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सब घोडे बारा टक्के..! राजकीय नाट्याचा ठाण्यातील साहित्यिकांनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 01:34 IST

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शनिवारी सकाळी घडलेलं राजकीय नाट्य दिवसभर सर्वत्र चर्चिलं गेलं. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर भाष्य करत होते.

- स्नेहा पावसकरठाणे : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शनिवारी सकाळी घडलेलं राजकीय नाट्य दिवसभर सर्वत्र चर्चिलं गेलं. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर भाष्य करत होते. ठाण्यातील साहित्य क्षेत्रातील मंडळीनीही यावर आपल्या भाषेत शेरेबाजी केली आहे. आजचं हे एकूणच राजकीय नाट्य पाहून १९५२ साली विंदांनी लिहिलेली ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या राजकारणालाही लागू पडते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे.महाराष्टÑाच्या राजकारणात शुक्रवारी सकाळीच भूकंप झाला आणि त्याचे पडसाद अवघ्या काही मिनिटात सोशल मिडीयावरून उमटले. कवी महेश केळुसकर यांनी फेसबूकवर ‘काकांनी पावसात भिजवलेला ओला लंगोट वाळायच्या आत पुतण्याच्या ढुंगणाला खाज सुटली..., ताणता राजा’ अशा शब्दात पोस्ट शेअर केल्या. आज महाराष्टÑात जे काही घडलं ते मतदारांच्या आकलनापलीकडे चाललयं. विंदांनी लिहिलेली कविता आजही लागू पडते. पण विंदा असे म्हणाले होते की, ही कविता जेव्हा कालबाह्यहोईल तेव्हा मला आनंद होईल. पण विंदांना आनंद होईल असा क्षण येईल असे दिसत नाही, असेही केळुसकर म्हणाले.दुसरीकडे आजचा सगळा प्रकार म्हणजे सगळ्या प्राण्यांनाही लाजवेल असाच आहे. नीती, नियम, तत्त्व हे सगळं या राजकीय मंडळीनी सोडून दिलं आहे. तसेच आता कोणाचेही सरकार आले तरी, सर्व पक्षांच्याबाबत महाराष्टÑाच्या जनतेने अविश्वासाचा ठराव मूकपणे संमत केलेला आहे, हे नक्की अशा शब्दात कवी अशोक बागवे यांनी या राजकीय घडामोडीचा निषेध व्यक्त केला.अरूण म्हात्रे यांनी अशाप्रकारच्या सत्तास्थापनेतून लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवल्याचे म्हटले आहे. लोकांना गृहीत धरल जातं, परंतु आजच्या घडामोडींनंतर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे. अशा अभद्र पद्धतीनेही काही होऊ शकतं, हे आता लोकांना कळलंय. हा प्रकार म्हणजे जनतेचा विश्वासघात झालायं, असे म्हणत त्यांनी नाराजी दर्शवली.ज्येष्ठ लेखक, नाटककार अशोक समेळ यांनी तर दिवसभरात घडलेल्या घटना म्हणजे एखाद्या नाटकाप्रमाणे वाटते आणि हे नाटक अजून संपलेलं नाही. ते सुरू राहणार आहे. मुळातच मला या राजकीय घडामोडींवर आधारित एक नाटक लिहावसं वाटतंय, असे मत अशोक समेळ यांनी व्यक्त केले. मात्र गनिमी कावा हा शिवरायांनीही रात्रीच्या काळोखातच केला आणि आता भाजपनेही रात्रीच्या काळोखातच केला. बाकी कोणी कोणासोबत जावून सरकार स्थापन करावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे, असेही अशोक समेळ म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019