शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

सब घोडे बारा टक्के..! राजकीय नाट्याचा ठाण्यातील साहित्यिकांनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 01:34 IST

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शनिवारी सकाळी घडलेलं राजकीय नाट्य दिवसभर सर्वत्र चर्चिलं गेलं. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर भाष्य करत होते.

- स्नेहा पावसकरठाणे : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शनिवारी सकाळी घडलेलं राजकीय नाट्य दिवसभर सर्वत्र चर्चिलं गेलं. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर भाष्य करत होते. ठाण्यातील साहित्य क्षेत्रातील मंडळीनीही यावर आपल्या भाषेत शेरेबाजी केली आहे. आजचं हे एकूणच राजकीय नाट्य पाहून १९५२ साली विंदांनी लिहिलेली ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या राजकारणालाही लागू पडते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे.महाराष्टÑाच्या राजकारणात शुक्रवारी सकाळीच भूकंप झाला आणि त्याचे पडसाद अवघ्या काही मिनिटात सोशल मिडीयावरून उमटले. कवी महेश केळुसकर यांनी फेसबूकवर ‘काकांनी पावसात भिजवलेला ओला लंगोट वाळायच्या आत पुतण्याच्या ढुंगणाला खाज सुटली..., ताणता राजा’ अशा शब्दात पोस्ट शेअर केल्या. आज महाराष्टÑात जे काही घडलं ते मतदारांच्या आकलनापलीकडे चाललयं. विंदांनी लिहिलेली कविता आजही लागू पडते. पण विंदा असे म्हणाले होते की, ही कविता जेव्हा कालबाह्यहोईल तेव्हा मला आनंद होईल. पण विंदांना आनंद होईल असा क्षण येईल असे दिसत नाही, असेही केळुसकर म्हणाले.दुसरीकडे आजचा सगळा प्रकार म्हणजे सगळ्या प्राण्यांनाही लाजवेल असाच आहे. नीती, नियम, तत्त्व हे सगळं या राजकीय मंडळीनी सोडून दिलं आहे. तसेच आता कोणाचेही सरकार आले तरी, सर्व पक्षांच्याबाबत महाराष्टÑाच्या जनतेने अविश्वासाचा ठराव मूकपणे संमत केलेला आहे, हे नक्की अशा शब्दात कवी अशोक बागवे यांनी या राजकीय घडामोडीचा निषेध व्यक्त केला.अरूण म्हात्रे यांनी अशाप्रकारच्या सत्तास्थापनेतून लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवल्याचे म्हटले आहे. लोकांना गृहीत धरल जातं, परंतु आजच्या घडामोडींनंतर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे. अशा अभद्र पद्धतीनेही काही होऊ शकतं, हे आता लोकांना कळलंय. हा प्रकार म्हणजे जनतेचा विश्वासघात झालायं, असे म्हणत त्यांनी नाराजी दर्शवली.ज्येष्ठ लेखक, नाटककार अशोक समेळ यांनी तर दिवसभरात घडलेल्या घटना म्हणजे एखाद्या नाटकाप्रमाणे वाटते आणि हे नाटक अजून संपलेलं नाही. ते सुरू राहणार आहे. मुळातच मला या राजकीय घडामोडींवर आधारित एक नाटक लिहावसं वाटतंय, असे मत अशोक समेळ यांनी व्यक्त केले. मात्र गनिमी कावा हा शिवरायांनीही रात्रीच्या काळोखातच केला आणि आता भाजपनेही रात्रीच्या काळोखातच केला. बाकी कोणी कोणासोबत जावून सरकार स्थापन करावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे, असेही अशोक समेळ म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019