शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

१२० कोटी वसुलीचे लक्ष्य गाठणार; उल्हासनगर पालिकेतर्फे नागरिकांकरिता अभय योजना लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:39 IST

महापालिका आयुक्तांनी ५ फेब्रु्रवारीपासून अभय योजना लागू करून त्याचा लाभ एक लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना होणार आहे.

उल्हासनगर : महापालिका आयुक्तांनी ५ फेब्रु्रवारीपासून अभय योजना लागू करून त्याचा लाभ एक लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना होणार आहे. त्यापेक्षा जास्त मालमत्ता थकबाकीधारकांना फक्त दोन वर्षांचे थकीत मालमत्ताकरावरील विलंब शुल्क माफ होणार आहे. तर, इतरांचे लोकन्यायालयाच्या तडजोडीनंतर निर्णय घेतले जातील, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, १२० कोटींचे लक्ष्य पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.उल्हासनगर महापालिका आर्थिक संकटात सापडली असून त्यातून बाहेर काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी अभय योजना लागू केली.

आयुक्त देशमुख यांनी महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, उपायुक्त मदन सोंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अभय योजनेची घोषणा केली. एक लाखापेक्षा कमी मालमत्ताकराची थकबाकी असलेल्यांना अभय योजनेचा लाभ मिळणार असून १२० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अभय योजनेच्या जनजागृतीसाठी रिक्षातून प्रचार, भित्तीपत्रके, बॅनर आदींचा उपयोग करणार आहे. पालिका मालमत्ताकर विभागाची एकूण थकबाकी ४०० कोटी असून त्यापैकी १९५ कोटी विलंब शुल्क आहे.

महापालिकेने अभय योजनेंतर्गत १२० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले असून एक लाखापेक्षा कमी मालमत्ताकर थकबाकी असलेल्यांना ५ ते २४ फेब्रुवारीदरम्यान एकूण मालमत्ताकरावरील सरसकट विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. २५ ते ७ मार्चदरम्यान ७५ टक्के, ८ ते १६ मार्चदरम्यान ५० टक्के व १७ ते २३ मार्चदरम्यान २५ टक्के विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले असून एका लाखापेक्षा जास्त थकीत मालमत्ताकरधारकांना २०१८-१९ व २०१९-२० वर्षांच्या थकबाकीवरील विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. अभय योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार असून मोठ्या मालमत्ताकर थकबाकीधारकांवर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

आर्थिक डोलारा सावरण्यासाठी योजना

महापालिकेचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी अभय योजना लागू केली असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. एक लाखापेक्षा कमी मालमत्ताकर थकबाकीधारकांना योजनेचा फायदा होणार आहे. तर, एक लाखापेक्षा जास्त थकीत मालमत्ताधारकांना दोन वर्षांचे विलंब शुल्क माफ होणार असून मालमत्ताकर नियमित व वेळेत दिले नाहीतर मालमत्तेची जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र