शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

१२० कोटी वसुलीचे लक्ष्य गाठणार; उल्हासनगर पालिकेतर्फे नागरिकांकरिता अभय योजना लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:39 IST

महापालिका आयुक्तांनी ५ फेब्रु्रवारीपासून अभय योजना लागू करून त्याचा लाभ एक लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना होणार आहे.

उल्हासनगर : महापालिका आयुक्तांनी ५ फेब्रु्रवारीपासून अभय योजना लागू करून त्याचा लाभ एक लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना होणार आहे. त्यापेक्षा जास्त मालमत्ता थकबाकीधारकांना फक्त दोन वर्षांचे थकीत मालमत्ताकरावरील विलंब शुल्क माफ होणार आहे. तर, इतरांचे लोकन्यायालयाच्या तडजोडीनंतर निर्णय घेतले जातील, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, १२० कोटींचे लक्ष्य पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.उल्हासनगर महापालिका आर्थिक संकटात सापडली असून त्यातून बाहेर काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी अभय योजना लागू केली.

आयुक्त देशमुख यांनी महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, उपायुक्त मदन सोंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अभय योजनेची घोषणा केली. एक लाखापेक्षा कमी मालमत्ताकराची थकबाकी असलेल्यांना अभय योजनेचा लाभ मिळणार असून १२० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अभय योजनेच्या जनजागृतीसाठी रिक्षातून प्रचार, भित्तीपत्रके, बॅनर आदींचा उपयोग करणार आहे. पालिका मालमत्ताकर विभागाची एकूण थकबाकी ४०० कोटी असून त्यापैकी १९५ कोटी विलंब शुल्क आहे.

महापालिकेने अभय योजनेंतर्गत १२० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले असून एक लाखापेक्षा कमी मालमत्ताकर थकबाकी असलेल्यांना ५ ते २४ फेब्रुवारीदरम्यान एकूण मालमत्ताकरावरील सरसकट विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. २५ ते ७ मार्चदरम्यान ७५ टक्के, ८ ते १६ मार्चदरम्यान ५० टक्के व १७ ते २३ मार्चदरम्यान २५ टक्के विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले असून एका लाखापेक्षा जास्त थकीत मालमत्ताकरधारकांना २०१८-१९ व २०१९-२० वर्षांच्या थकबाकीवरील विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. अभय योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार असून मोठ्या मालमत्ताकर थकबाकीधारकांवर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

आर्थिक डोलारा सावरण्यासाठी योजना

महापालिकेचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी अभय योजना लागू केली असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. एक लाखापेक्षा कमी मालमत्ताकर थकबाकीधारकांना योजनेचा फायदा होणार आहे. तर, एक लाखापेक्षा जास्त थकीत मालमत्ताधारकांना दोन वर्षांचे विलंब शुल्क माफ होणार असून मालमत्ताकर नियमित व वेळेत दिले नाहीतर मालमत्तेची जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र