शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

'खड्डयांमुळे अपघात होतोय, मग आयुक्तांना खडसावणारे पत्र द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 11:11 IST

जागतिक अपघात स्मृती दिनाचे औचित्य * आरटीओ अधिकाऱ्यांना दिला सल्ला

डोंबिवली: शहरातील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात होत असतील तर त्या प्रश्नी माहापालिका आयुक्त, संबधित अधिकारी यांना जबाबदार धरावे, त्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी कडक शब्दांत पत्र लिहून अधिकाऱ्यांना सूचित करावे अशी विनंती माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डेप्यु.आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांना केली. जागतिक रस्ते अपघात स्मृतिदिनानिमित्त अपघातात मयत झालेल्याना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

पश्चिमेकडील रेल्वे स्थानाकासमोर असलेल्या घनश्याम गुप्ते रस्त्यावरील खड्डे पाहून त्यांनी माहापालिका अभियंता अधिकारी महेश गुप्ते यांना रस्ते दुरुस्त होणार आहेत की नाही? असे विचारले, की त्याची तजवीज आम्हाला करावी लागेल असे फोनवर विचारले, त्यावर गुप्ते म्हणाले की त्या ठिकाणच्या कंत्राटदाराने काम अडवून ठेवले आहे, त्यामुळे खड्डे जैसे थे आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण दोन दिवसात त्या।कामाला सुरुवात करतो असे आश्वासन दिले. त्यामुळे शहरातील खड्डयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे स्पष्ट झाले. केडीएमसी अधिकारी कामांकडे कानाडोळा करतात, अनेकदा स्थानिक नगरसेवक पाठपुरावा करतात पण अधिकारी पाठ फिरवतात असे सांगून त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे याना तातडीने कठोर शब्दात पत्र लिहावे असे सांगितले. ससाणे यांनीही रस्त्याची समस्या खरी असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होत असल्याचे म्हंटले. तसेच वाहन चालकांनी जपून वाहन चालवावे असे आवाहन केले. चव्हाण यांनी वाहनचालकांना विमा जरूर काढावा त्यासाठी केंद्र सरकारची अपघात विमा योजना असून दिवसाला 12 ते 15 रुपये स्वतःसाठी काढावे असे आवाहन केले. त्या दरम्यान ससाणे यांनी उपस्थित रिक्षा चालक, कार चालक, दुचाकीस्वार आदींना शून्य अपघाताची शपथ दिली. तसेच आदरांजली वाहून या कार्यक्रमाचे आयोजन शेखर जोशी यांचे कौतुक केले, जोशींनी वाहनचालकांनी आवर्जून रिक्षा बंद ठेवून, वाहने बंद ठेवून तासभर अपघात होणार नाही याची काळजी घेण्यासाठी काढला याबाबद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

वाहतूक कोंडीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना कठोर शासन व्हावे अशी मागणी वाहन चालकांनी यावेळी।केली. तसेच आरटीओ अधिकाऱ्यांनी आवर्जून याठिकाणी यावे कारवाई करावी असेही म्हंटले. अभावानेच कधीतरी आरटीओ अधिकारी कारवाईसाठी येतात त्यामुळे त्याचा धाक येथील वाहनचालकांना नसतो असेही सांगण्यात आले. त्यावर आरटीओ अधिकाऱ्यांनी मात्र कारवाईत सातत्य येईल, पण त्यामुळे वाहन बंद ठेवणे, नागरिकांना वेठीस धरणे असे करू नका असेही कडक शब्दात रिक्षा चालकांना उद्देशून खडसावले, असे सांगताच सर्वत्र हशा पिकला.

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाdombivaliडोंबिवलीAccidentअपघातkdmcकल्याण डोंबिवली महापालिका