शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

मध्यमवर्गीयांना आधार आता रेशन दुकानांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 00:56 IST

अन्नधान्याच्या किमती महागल्यास आपल्या घरात किमान गहू आणि तांदूळ असावा, या विचाराने केशरी कार्डधारक मिळेल ते धान्य पदरात पाडून घेताना दिसत आहेत.

ठाणे : मॉल्स आणि सुपरमार्केटमध्ये जीवनाश्यक वस्तू, अन्नधान्याच्या खरेदीसाठी जाणे स्टेटस सिम्बॉल मानणाऱ्या मध्यमवर्गीयांना सध्याच्या लॉकडाउनच्या काळात रेशन दुकानांचा आधार वाटू लागला आहे. अन्नधान्याच्या किमती महागल्यास आपल्या घरात किमान गहू आणि तांदूळ असावा, या विचाराने केशरी कार्डधारक मिळेल ते धान्य पदरात पाडून घेताना दिसत आहेत. काल-परवापर्यंत अनेक केशरी कार्डधारक रेशन दुकानाच्या रांगेत उभे राहणे टाळत होते.शहरांतील रेशनदुकानांमधून धान्य मिळावे, यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा नियमांतर्गत समावेश न झालेल्या व केशरी कार्डधारकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ५९ हजारांपेक्षा जास्त व एक लाखांपर्यंत असणाºया एपील (केशरी) कार्डधारकांना गहू आठ रुपये प्रति किलो, गहू, व तांदूळ रुपये १२ रुपये प्रति किलोने मिळणार आहे. मे आणि जूनसाठी प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ, असे पाच किलो धान्य दिले जात आहे. प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेतील कार्डधारकांना एप्रिलचे धान्य तसेच प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ दिला जात आहे.होलसेल बाजारपेठेमध्ये जे धान्य मिळेल ते खरेदी करून विकण्यासाठी रिटेल दुकानदारांची धडपड सुरू आहे. खुल्या बाजारात गहू सरासरी २८ ते ४० पर्यंत, तांदूळ ४५ ते ७० पर्यंत प्रति किलो विविध प्रत-वाणानुसार उपलब्ध आहे. तर, चणाडाळ ८० ते ९० रुपये, मूग डाळ १४० रुपये, तूरडाळ १००-११०, मसूरडाळ ७० ते ७५, साखर ४० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर, रेशनवर उपलब्धतेनुसार तूरडाळ ५५ रुपये, चणाडाळ ४५ रुपये प्रति किलोने मिळते. रेशनवरील धान्य स्वस्त असल्याने मध्यमवर्गीय ते खरेदी करत आहेत.‘माझ्याकडील गहू व तांदूळ संपला आहे. सर्व माल थेट दुकानात येत नाही. वाशी एपीएमसीतून तो आणावा लागतो. वाहतूक खर्च वाढला आहे. काही वस्तू मिळत नसल्याने त्या महागल्या आहेत,’ असे दुकानदार विजय गुप्ता म्हणाले.>... असेही पुण्यकर्महातावर पोट असलेल्यांना सध्या मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या परीने मदत करण्यासाठी काही मध्यमवर्गीय पुढे सरसावले आहेत. काहींनी आपले रेशनवरील धान्य घेऊन ते घरेलू कामगार, वाहनचालक, सोसायटीतील सुरक्षारक्षक, कचरा नेण्यासाठी येणारे कामगार, लॉण्ड्री व्यावसायिक यांना दिले आहे. रेशनकार्डवरील धान्य वाया जाण्यापेक्षा ते गरजूंना मिळावे, हीच यामागची भूमिका असल्याचे एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस