शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

मध्यमवर्गीयांना आधार आता रेशन दुकानांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 00:56 IST

अन्नधान्याच्या किमती महागल्यास आपल्या घरात किमान गहू आणि तांदूळ असावा, या विचाराने केशरी कार्डधारक मिळेल ते धान्य पदरात पाडून घेताना दिसत आहेत.

ठाणे : मॉल्स आणि सुपरमार्केटमध्ये जीवनाश्यक वस्तू, अन्नधान्याच्या खरेदीसाठी जाणे स्टेटस सिम्बॉल मानणाऱ्या मध्यमवर्गीयांना सध्याच्या लॉकडाउनच्या काळात रेशन दुकानांचा आधार वाटू लागला आहे. अन्नधान्याच्या किमती महागल्यास आपल्या घरात किमान गहू आणि तांदूळ असावा, या विचाराने केशरी कार्डधारक मिळेल ते धान्य पदरात पाडून घेताना दिसत आहेत. काल-परवापर्यंत अनेक केशरी कार्डधारक रेशन दुकानाच्या रांगेत उभे राहणे टाळत होते.शहरांतील रेशनदुकानांमधून धान्य मिळावे, यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा नियमांतर्गत समावेश न झालेल्या व केशरी कार्डधारकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ५९ हजारांपेक्षा जास्त व एक लाखांपर्यंत असणाºया एपील (केशरी) कार्डधारकांना गहू आठ रुपये प्रति किलो, गहू, व तांदूळ रुपये १२ रुपये प्रति किलोने मिळणार आहे. मे आणि जूनसाठी प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ, असे पाच किलो धान्य दिले जात आहे. प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेतील कार्डधारकांना एप्रिलचे धान्य तसेच प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ दिला जात आहे.होलसेल बाजारपेठेमध्ये जे धान्य मिळेल ते खरेदी करून विकण्यासाठी रिटेल दुकानदारांची धडपड सुरू आहे. खुल्या बाजारात गहू सरासरी २८ ते ४० पर्यंत, तांदूळ ४५ ते ७० पर्यंत प्रति किलो विविध प्रत-वाणानुसार उपलब्ध आहे. तर, चणाडाळ ८० ते ९० रुपये, मूग डाळ १४० रुपये, तूरडाळ १००-११०, मसूरडाळ ७० ते ७५, साखर ४० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर, रेशनवर उपलब्धतेनुसार तूरडाळ ५५ रुपये, चणाडाळ ४५ रुपये प्रति किलोने मिळते. रेशनवरील धान्य स्वस्त असल्याने मध्यमवर्गीय ते खरेदी करत आहेत.‘माझ्याकडील गहू व तांदूळ संपला आहे. सर्व माल थेट दुकानात येत नाही. वाशी एपीएमसीतून तो आणावा लागतो. वाहतूक खर्च वाढला आहे. काही वस्तू मिळत नसल्याने त्या महागल्या आहेत,’ असे दुकानदार विजय गुप्ता म्हणाले.>... असेही पुण्यकर्महातावर पोट असलेल्यांना सध्या मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या परीने मदत करण्यासाठी काही मध्यमवर्गीय पुढे सरसावले आहेत. काहींनी आपले रेशनवरील धान्य घेऊन ते घरेलू कामगार, वाहनचालक, सोसायटीतील सुरक्षारक्षक, कचरा नेण्यासाठी येणारे कामगार, लॉण्ड्री व्यावसायिक यांना दिले आहे. रेशनकार्डवरील धान्य वाया जाण्यापेक्षा ते गरजूंना मिळावे, हीच यामागची भूमिका असल्याचे एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस