शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 18:21 IST

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना नेते धनंजय बोडारे आदींनी राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार केला.

उल्हासनगर- देशभरात अग्निशमन दलाच्या २५ जणांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. यांपैकी ८ जण हे महाराष्ट्रातील असून यातील ४ राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलातील अधिकारी आहेत. यात महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके, उपअग्निशमन अधिकारी पंकज पवार, स्टेशन अधिकारी संदीप आसेकर व राजेंद्र राजन यांचा समावेश आहे. त्यांना स्वातंत्र दिनानिमित्त राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांच्यावर सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून या दुर्घटनेत अनेकांचे बळी गेले. अशावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, इमारत स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्याना बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. तसेच वालधुनी व उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यातून शेकडो नागरिकांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. याची दखल शासनस्तरावर घेऊन विभागाच्या या चार जणांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाल्याची प्रतिक्रिया अग्निशमन दलाचे प्रमुख व शौर्य पुरस्कार विजेते बाळू नेटके यांनी दिली. 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना नेते धनंजय बोडारे आदींनी राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार केला. महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, सभागृहनेते भारत गंगोत्री, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदींनी शुभेच्छा दिल्या. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी एकाच विभागाच्या चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाले. या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर होताच, सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

अग्निशमन दलात कंत्राटी जवांनाचा भरणा? महापालिका अग्निशमन विभागात वर्षानुवर्षे भरती न झाल्याने, ७० टक्के पेक्षा जास्त जुने अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी महापालिकेने ठेक्याने व कंत्राटी पद्धतीने जवान घेतले. मात्र अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांच्या सकारात्मक कार्यपद्धतीमुळे अग्निशमन दलाची कामगिरी चमकदार व डोळ्यात भरण्या जोगी आहे. महापालिका प्रशासनाने विभागाची अशीच कामगिरी राहण्यासाठी कंत्राटी जवांनाना महापालिका सेवेत कायम करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरFire Brigadeअग्निशमन दल