शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 18:21 IST

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना नेते धनंजय बोडारे आदींनी राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार केला.

उल्हासनगर- देशभरात अग्निशमन दलाच्या २५ जणांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. यांपैकी ८ जण हे महाराष्ट्रातील असून यातील ४ राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलातील अधिकारी आहेत. यात महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके, उपअग्निशमन अधिकारी पंकज पवार, स्टेशन अधिकारी संदीप आसेकर व राजेंद्र राजन यांचा समावेश आहे. त्यांना स्वातंत्र दिनानिमित्त राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांच्यावर सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून या दुर्घटनेत अनेकांचे बळी गेले. अशावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, इमारत स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्याना बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. तसेच वालधुनी व उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यातून शेकडो नागरिकांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. याची दखल शासनस्तरावर घेऊन विभागाच्या या चार जणांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाल्याची प्रतिक्रिया अग्निशमन दलाचे प्रमुख व शौर्य पुरस्कार विजेते बाळू नेटके यांनी दिली. 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना नेते धनंजय बोडारे आदींनी राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार केला. महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, सभागृहनेते भारत गंगोत्री, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदींनी शुभेच्छा दिल्या. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी एकाच विभागाच्या चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाले. या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर होताच, सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

अग्निशमन दलात कंत्राटी जवांनाचा भरणा? महापालिका अग्निशमन विभागात वर्षानुवर्षे भरती न झाल्याने, ७० टक्के पेक्षा जास्त जुने अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी महापालिकेने ठेक्याने व कंत्राटी पद्धतीने जवान घेतले. मात्र अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांच्या सकारात्मक कार्यपद्धतीमुळे अग्निशमन दलाची कामगिरी चमकदार व डोळ्यात भरण्या जोगी आहे. महापालिका प्रशासनाने विभागाची अशीच कामगिरी राहण्यासाठी कंत्राटी जवांनाना महापालिका सेवेत कायम करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरFire Brigadeअग्निशमन दल