शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बाप्पांच्या स्वागताला रस्त्यांतील खड्ड्यांची ‘रांगोळी’

By admin | Updated: September 3, 2016 02:41 IST

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला असतानाही ठाणे जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. काही पालिकांनी खड्ड्यांत तात्पुरती खडी भरण्यास सुरूवात

- टीम लोकमत, ठाणे गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला असतानाही ठाणे जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. काही पालिकांनी खड्ड्यांत तात्पुरती खडी भरण्यास सुरूवात केली आहे. मात्र पावसाच्या सरी आणि वाहनांच्या वर्दळीमुळे ती खडी लगेचच उखडून इतस्तत: पसरत असून गाड्या जाताच ती अंगावर उडत आहे. खड्डे, त्यातील पाणी, चिखल आणि खडीचा दुहेरी धोका निर्माण झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक महापालिकेने केलेली तरतूद पाहता नागरिकांकडून कररूपाने गोळा केलेले कोट्यवधी रूपये पुन्हा खड्ड्यांत जाण्याची शक्यता आहे.ठाण्यातील शहराचा परिसर, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, ग्रामीण भाग, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडीसोबतच मुरबाड-शहापूर तालुक्यातून माहिती घेतली असता सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य कायम असल्याचे दिसून आले. बाप्पाच्या स्वागतासाठी खड्डे असलेले रस्ते सज्ज आहेत. त्यातून कशीबशी वाट काढत मंडळे मूर्ती आणत आहेत. पण डुगडुगणाऱ्या मूर्तींना सावरताना कार्यकर्ते मेटाकुटीला आले आहेत. गणपतीच्या आगमनापूर्वी खड्डे बुजवले जातील असे आश्वासन प्रत्येक पालिकेने दिले होते. मात्र अजूनही खड्डे पुरते बुजवलेले नाहीत. पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरूवात केल्याने खड्डे, त्यात साचलेल्या पाण्याने झालेला चिखल आणि खड्डे भरण्यासाठी टाकलेल्या खडीमुळे निर्माण झालेली नवी अडथळ््यांची शर्यत असे दृष्य जागोजागी आहे.मुलाम्यानंतरही खड्डे कायमठाण्यात मॅरेथॉनच्या मुहूर्तावरखड्ड्यांना मुलामा देण्यात आला. मात्र ते रस्त अवघ्या पाच दिवसांत पुन्हा उखडले असून शहरात विविध ठिकाणी पुन्हा खड्डेच खड्डे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा, असे आदेश देणाऱ्या महापौर आणि स्थायी समिती सभापतींनाच प्रशासनाने केराचीच टोपली दाखवल्याची टीका होऊ लागली आहे. पालिकेच्या दप्तरी शहरात अवघे ११२ खड्डे असले तरी प्रत्यक्षात ही संख्या त्याही पेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचे चित्र प्रत्यक्ष पाहणीत दिसून येते आहे. जेट पॅचरचे तंत्र यंदाही अपयशी ठरले आहे.खडी पुन्हा रस्त्यावरडोंबिवलीतील रस्ते व विविध ठिकाणच्या चौकांत पडलेले खड्डे बुजवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने टाकलेली खडी आता रस्त्यावर इतरत्र पसरली आहे. मोठ्या वाहनांच्या टायरमुळे खडी उडत आहे, तर दुचाकींचे टायर सरकण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोठ्या अपघाताची भीती आहे. या वर्षी खड्ड्यांत पडून तीन महिला व एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाले होते. तर, खड्ड्यांमुळे मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. खडीमुळे वाहनांची चाके सरकत आहेत. ग्रामीण भागातही खड्डे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणारा कल्याण-मुरबाड मार्ग तसेच गोवेली-टिटवाळा, टिटवाळा-खडवली आणि टिटवाळा-उशीद या मार्गावर ५०० हून अधिक खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाही हे खड्डे न बुजवल्याने भक्तांना खड्ड्यातूनच गणेशमूर्ती घरी आणावी लागणार आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.