शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

आव्हाड यांच्या सत्कार सोहळ्यात रंगला पदांचा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 23:42 IST

कार्यकर्त्यांची कानउघाडणी; पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

- नितिन पंडितभिवंडी : भिवंडीतील महापोली येथे रविवारी दुपारी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नागरी सत्कार कार्यक्रमात पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पदांवरुन रंगलेल्या कार्यकर्त्यांच्या नाट्यमय वादावर आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त करत, मला अंधारात ठेऊन काही करू नका, अशा शब्दात कार्यकर्त्यांना समज दिली.राष्ट्रवादीच्या भिवंडी ग्रामिण शाखेच्या वतीने आव्हाड यांचा नागरी सत्कार रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ आणि ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यात व्यासपिठावरच तूतूमैमै सुरु झाली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने सध्या प्रदेश सरचिटणीस पदावर असलेल्या पिसाळांना जिल्हाध्यक्ष पदाचा मोह अनावर झाला आहे. यावरुनच सध्या जिल्हाध्यक्षपदी असलेल्या तिवरे यांच्याशी त्यांची तूतूमैमै सुरु झाली. आव्हाड अध्यक्षीय भाषण करण्यासाठी व्यासपीठावर आले असता, तिवरे यांनी त्यांचे भाषण मध्येच थांबवून माईकचा ताबा घेतला. आपल्या भावना व्यक्त करत त्यांनी पिसाळांवर जाहीर टीका केली. कार्यकर्त्यांच्या या नाराजीनाट्यावर आव्हाड यांनी टीका केली. दुसऱ्याच्या कार्यक्र मात येऊन कशाला घाण करता, अशा शब्दात त्यांनी पिसाळांना समज दिली. जिल्ह्याचे नेते कार्यकर्त्यांना मान देत नाहीत. तुमच्याकडे जे ऐश्वर्य आहे, ते केवळ कार्यकर्त्यांमुळे, अशा शब्दात त्यांनी तिवरेंनाही सुनावले. पदांसाठी भांडू नका, असा सल्ला त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.दरम्यान, सध्या केंद्र शासनाने लागू केलेल्या सीएए , एनआरसी कायद्याला आमचा विरोध आहे आणि पुढेही राहील. मात्र २0१0 च्या एनपीआर कायद्याला आमचे समर्थन आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार दौलत दरोडा, भिवंडी शहर अध्यक्ष भगवान टावरे, महिला अध्यक्षा स्वाती कांबळे, तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, जिल्हा उपाध्यक्ष महादेव चौघुले, जिल्हा सचिव महेंद्र पाटील, अनिल पाटील, कैलास घरत, मोनिका मढवी आदी उपस्थित होते.गणेश नाईकांवर सडकून टिकाअडचणीच्या काळात पक्षाची साथ सोडून गेलेल्या नेत्यांवर जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सडकून टिका केली. मागील पाच वर्षांत राष्ट्रवादी पक्ष जर कुणी बुडविला असेल, तर त्याचे नाव गणेश नाईक आहे, अशी टीकाही त्यांनी नाईकांवर याप्रसंगी केली. राष्ट्रवादी सोडून गेलेले भाजपचे खासदार कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड