शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

बदलापुरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रंगला भीम महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 00:47 IST

रसिकांचा उत्साह शिगेला; कडूबाई खरात, आदर्श शिंदे यांचे दमदार सादरीकरण, बुद्धवंदनेने कार्यक्रमाचा शुभारंभ

बदलापूर : प्रगतीशील बौद्ध समाज, बदलापूर शहर आणि ग्रामीण यांच्या वतीने आयोजित ‘भीम महोत्सव’ रविवारी बदलापूर शहरात जल्लोषात साजरा झाला. ग्रामीण भागातून आलेल्या कडुबाई खरात आणि गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या खड्या आवाजातील गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तर प्रा. अमोल मिटकरी यांनी ‘संविधान बचाव’साठी केलेल्या आवाहनपर आवेशपूर्ण भाषणालाही प्रेक्षकांनी दाद दिली. या महोत्सवाला हजारोच्या संख्येने बदलापूर उपस्थित होते.प्रवीण राऊत यांच्या पुढाकाराने ‘भीम महोत्सवा’चे आयोजन बदलापूर पश्चिमेकडील घोरपडे मैदानात करण्यात आले होते. बुद्ध वंदनेने या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. कडूबाई खरात यांनी ‘माझ्या नावाचं कुंकू लाविलं रमानं’ आणि ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय’ ही गाणी सादर करून महोत्सव दणाणून सोडला. ग्रामीण भागातील या महिला कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर महोत्सव रंगला तो प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांना. आपल्या खड्या आवाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गाणी सादर केली. ‘गुलामी का तूट गया जाल, भिकारी बन गया मालामाल, ये है मेरे भीम की कमाल’, ‘माझ्या भिमाची पुण्याई’ मुळशी पॅटर्न मधील गाणं ‘जी एस टी च्या फेऱ्यात काळा पैसा होईना गोरा’, ‘नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला’ अशी एकापेक्षा एक गाणी त्यांनी सादर केली. उपस्थित रसिकांच्या मागणीमुळे कार्यक्र माच्या अखेरीस आदर्श शिंदे यांनी भीमा कोरेगावचे त्यांचे प्रसिद्ध गाणे सादर केले. ‘भीत नाही कोणाच्या बापाला, ही भिमाची पोरं’ हे गाणं सादर केले.या महोत्सवाच्या मध्यांतरात अ‍ॅड. संगीता फड यांच्यासह बदलापूरातील सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महोत्सवाचे नियोजन उत्तम असल्याने कोणताही गोंधळ झाला नाही. आनंद घेता आला. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.यावेळी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापुरातील अर्धवट अवस्थेत असलेल्या आंबेडकर स्मारकासाठी पालिका येत्या अर्थसंकल्पात ८ कोटींची तरतूद करणार असल्याचे स्पष्ट केले. हे स्मारक येत्या वर्षभरात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तर राजन घोरपडे यांनी देखील स्मारकाच्या विषयाला धरुनच पालिकेसोबत शासनाच्या निधीचाही वापर या कामासाठी करुन स्मारक आणखी भव्य कसे होईल, याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण राऊत यांनी आंबेडकरी विचाराला एकत्रित करुन बदलापूर शहराच्या विकासासाठी त्याचा योग्य वापर करण्याचे सांगितले. या कार्यक्रमाला राजकीय आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.आंदोलन केले नाही त्यांना आरक्षण- प्रा. अमोल मिटकरीभीम महोत्सवाला संविधान बचाव समितीचे प्रा. अमोल मिटकरी हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात संविधान धोक्यात असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या देशात आपलेच संविधान जाळले जाते. आम्ही बुध्दाचे उपासक आहोत म्हणून शांतता ठेवली आहे.अन्यथा संविधान जाळणाºयांना त्यांची जागा दाखवली असती. आज देश ज्या परिस्थितीतुन पुढे जात आहे ती संविधानासाठी घातक आहे. येत्या तीन महिन्यात आपल्याला संविधान वाचवण्यासाठी प्रखर लढा उभा करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व धोके पत्करून लढत आहोत.या शहरात विचाराचे उपासक आहेत हे पाहून मनाला समाधान झाले असेही मिटकरी म्हणाले. सरकारवर टीका करताना ते पुढे म्हणाले ज्याच्या घरी शस्त्र साठा सापडतो त्यांना एका दिवसात जामीन मिळतो. आणि मनुवादाचे समर्थकांना पुरस्कार मिळतो. कालचा सूर्य त्यांचा होता तर उद्याचा सूर्य हा बहुजनांचा असेल त्या साठी जागे रहा,आणि जागे व्हा, असे कळकळीचे आवाहन मिटकरी यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले.

टॅग्स :badlapurबदलापूर