शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

जिल्हा परिषदेच्या आवारात रानभाज्या महाेत्सवात ठाणेकर!

By सुरेश लोखंडे | Updated: August 25, 2023 18:25 IST

रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व शहरी भागात रानभाज्याची विक्री करण्यासाठी या रानभाज्या महोत्सवाचे आयाेजन जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंणेकडून करण्यात आले

ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या आवारात रानभाज्या महोत्सव उत्साहात पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करत या महोत्सवाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन केले. यास शुक्रवारी ठाणेकर गृहिणींनी उत्तम प्रतिसाद दिला.

रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व शहरी भागात रानभाज्याची विक्री करण्यासाठी या रानभाज्या महोत्सवाचे आयाेजन जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंणेकडून करण्यात आले. महोत्सवात भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील ४० स्टॉल लावण्यात आले. या स्टाॅलवर पावसाळ्यातील औषधी व गुणकारी रानभाज्या उपलब्ध असून आघाडा, शेवळा, कुलूची भाजी, भारंग, मायाळू, कपाळफोडी, दिंडा भाजी, करटोली, टाकळा इतर सर्व रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या हाेत्या.उद्घाटनानंतर जिंदल यांनी उमेदच्या महिलांना शुभेच्छा यावेळी दिल्या. ते म्हणाले की निसर्गाने आपल्याला जे दिलंय ते तुम्ही शहरी भागातील लोकांना देताय हे अतिशय महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात तरुण लोकांमध्ये हार्ट ॲटॅकचे प्रमाण वाढत आहे. सर्वांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे कारण रोजच्या जेवणातील पोषण घटक कमी होत आहेत. जीवनशैली बदलत चाललेली आहे. त्यामुळे प्रतिज्ञा करायला हवी की आठवड्यातून एक दिवस रानभाज्या खायला हव्यात.

आरोग्य सुधारण्यासाठी रानभाज्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपला उपक्रम महत्त्वाचं आहे, असेही जिंदल यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमात उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, यांनी मानवाच्या रक्ताच्या पेशी वाढवण्यासाठी रानभाज्या पुर्ण वर्षभरात केवळ पावसाळ्याच्या १-२ महिन्यात उपलब्ध होत असल्याचे सांिगतले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छाया शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) प्रमोद काळे, महिला बालकल्याण विभाग प्रमुख संजय बागुल आदी अधिकार्यांस ठाणेकर या महाेत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते