शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

युतीसाठीच रामनामाचा जप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 00:54 IST

साडेचार वर्षे सत्तेत राहून भाजपाचे वाभाडे काढण्यात आले.

डोंबिवली : साडेचार वर्षे सत्तेत राहून भाजपाचे वाभाडे काढण्यात आले. पण, लोकसभा निवडणूक जवळ येताच युती करण्यासाठी काहीतरी कारण असावे, म्हणूनच शिवसेनेने अयोध्या दौरा करून रामनामाचा जप आळवला. हिंदुत्वावर आम्ही एकत्र आलो आहोत, हे त्यांना दाखवायचे आहे. झोपलेल्या कुंभकर्णाला मी जागे करायला आलो आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितले. मग, साडेचार वर्षे तुम्ही झोपले होते का, असे विचारत राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.राष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली शहर जिल्हातर्फे शनिवारी डोंबिवली गोळवली-दावडीमध्ये पक्ष संघटना व बुथ सभा झाली. यावेळीकेंद्र सरकारवर टीका करताना नाईक म्हणाले की, मोदी सरकार हे फेकू सरकार आहे. सत्तेत येण्यापूर्वीची त्यांनी त्यांची भाषणे तपासून पाहावीत. खात्यात १५ लाख सोडा, १५ रु पये तरी आले का, महागाई कमी झाली का, इंधनदरवाढ कमी झाली का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत ६५०० कोटी रु पये दिले का? याचाही विचार सर्वसामान्यांनी करायला हवा. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी आगामी काळात राज्यात मोठी आघाडी घेईल.पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापसांतील हेवेदावे कमी करून मजबूत पक्षबांधणी करून पक्षाला बळकटी देण्याच्या दृष्टीने काम करावे. त्यातूनच आपण महापालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत यश मिळवू, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेश प्रवक्तेमहेश तपासे, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह प्रमोद हिंदुराव, डॉ. वंडार पाटील आदी उपस्थित होते.>महिला राष्ट्रवादीकडून मनुस्मृती, ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्नकल्याण : ‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव’ अशा घोषणा देत प्रतीकात्मक ईव्हीएम मशीन आणि मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रविवारी पश्चिमेतील सहजानंद चौक परिसरात केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्याने त्यांनी ईव्हीएम मशीन आणि मनुस्मृती फाडली. यावेळी महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये झटापटदेखील झाली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीद्वारे ‘संविधान बचाव, देश बचाव’ हा व्यापक कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. याच महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनाबाबत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांत बैठका आयोजित केल्या आहेत. या मुख्य कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने कल्याण जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, विद्या चव्हाण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, आ. ज्योती कलानी, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, माजी नगरसेवक जे.सी. कटारिया, माया कटारिया तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी, फौजिया खान म्हणाल्या की, मशीनमध्ये घोटाळे होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे या पुढील काळात ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे. ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याची शंका नागरिकांना आहे. ईव्हीएमचा शोध ज्या देशाने लावला, तेथेही आता ईव्हीएमवर मतदान घेतले जात नाही. जगातील अनेक प्रगत देशांमध्येदेखील ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेतले जाते. त्यामुळे बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.