शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शेतक-यांच्या आत्महत्या थांबवणार, पाक व्याप्त काश्मीरसाठीही प्रयत्न करणार - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:53 IST

शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अ‍ॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या...

सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अ‍ॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या शेतक-यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली असून टप्प्याटप्प्याने त्याचा लाभ शेतकºयांना होईल. त्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.ठाणे जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचार दौºयात शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका चौक सभेत ते बोलत होते. शेतकºयांप्रमाणेच दलितांच्या महामंडळांची सुमारे ८०० कोटींची कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासन विचार करत असल्याचे त्यांनी सूतोवाच केले. शेतीच्या सिंचनक्षमतेत वाढ करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला. यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन परिणामी देशाचा विकास साधता येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने नितीन गडकरी यांना नद्या जोडण्याची, तर मला माणसे जोडण्याची जबाबदारी दिल्याचे त्यांनी हास्यविनोद करत स्पष्ट केले.आमच्या मतांवर आम्ही पडतो... पण, ताबडतोब उभे राहतो. पडून राहण्याची सवय आम्हाला नाही... असा विनोद करून ते पुढे म्हणाले की, दलितांचे मतदान निर्णायक ठरत असल्याने आमच्या पाठिंब्यावर पक्षाचे उमेदवार निवडून येत असल्याचे त्यांनी काही उदाहरणे देऊन पटवून दिले. ‘देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत, तसे उद्धवजीही मित्र... पण, या दोघांतील बरे नाही चित्र’ असे यमक साधून या चौक सभेतील उपस्थितांना आठवलेंनी कविताही ऐकवल्या. अपोझिशनवाले मुसलमानों को भडकाते है... वो आपको लढाने का काम करते है... लेकिन हम आपको बढाने का काम करते है... असेही यमक जुळवून शेर ऐकवून त्यांनी मोदी सरकार मुसलमानांच्या हिताचे असल्याचे पटवून दिले.संविधान बदलतील त्यांना आम्ही बदलणारजीएसटीमुळे थोडा त्रास झाला. पण, त्यासाठी चांगल्या दोन सुधारणा झाल्या आहेत. आगामी या बजेटमध्ये त्यांचा समावेश होईल. नोटाबंदीचा थोडा त्रास झाला. दलितांचे आरक्षण जाणार, असे सांगून विरोधक दलितांमध्ये भीती घालत आहेत. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्याचे सांगतात.पण, जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यात आहे. बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे... संविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान झाल्याचे मोदी यांनी सभागृहात सांगून संविधान बदलता येणार नसल्याची ग्वाही दिल्याचे आठवले म्हणाले. या वेळी व्यासपीठावर आ. नरेंद्र पवार उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेFarmerशेतकरी