शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या आत्महत्या थांबवणार, पाक व्याप्त काश्मीरसाठीही प्रयत्न करणार - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:53 IST

शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अ‍ॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या...

सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अ‍ॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या शेतक-यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली असून टप्प्याटप्प्याने त्याचा लाभ शेतकºयांना होईल. त्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.ठाणे जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचार दौºयात शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका चौक सभेत ते बोलत होते. शेतकºयांप्रमाणेच दलितांच्या महामंडळांची सुमारे ८०० कोटींची कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासन विचार करत असल्याचे त्यांनी सूतोवाच केले. शेतीच्या सिंचनक्षमतेत वाढ करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला. यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन परिणामी देशाचा विकास साधता येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने नितीन गडकरी यांना नद्या जोडण्याची, तर मला माणसे जोडण्याची जबाबदारी दिल्याचे त्यांनी हास्यविनोद करत स्पष्ट केले.आमच्या मतांवर आम्ही पडतो... पण, ताबडतोब उभे राहतो. पडून राहण्याची सवय आम्हाला नाही... असा विनोद करून ते पुढे म्हणाले की, दलितांचे मतदान निर्णायक ठरत असल्याने आमच्या पाठिंब्यावर पक्षाचे उमेदवार निवडून येत असल्याचे त्यांनी काही उदाहरणे देऊन पटवून दिले. ‘देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत, तसे उद्धवजीही मित्र... पण, या दोघांतील बरे नाही चित्र’ असे यमक साधून या चौक सभेतील उपस्थितांना आठवलेंनी कविताही ऐकवल्या. अपोझिशनवाले मुसलमानों को भडकाते है... वो आपको लढाने का काम करते है... लेकिन हम आपको बढाने का काम करते है... असेही यमक जुळवून शेर ऐकवून त्यांनी मोदी सरकार मुसलमानांच्या हिताचे असल्याचे पटवून दिले.संविधान बदलतील त्यांना आम्ही बदलणारजीएसटीमुळे थोडा त्रास झाला. पण, त्यासाठी चांगल्या दोन सुधारणा झाल्या आहेत. आगामी या बजेटमध्ये त्यांचा समावेश होईल. नोटाबंदीचा थोडा त्रास झाला. दलितांचे आरक्षण जाणार, असे सांगून विरोधक दलितांमध्ये भीती घालत आहेत. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्याचे सांगतात.पण, जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यात आहे. बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे... संविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान झाल्याचे मोदी यांनी सभागृहात सांगून संविधान बदलता येणार नसल्याची ग्वाही दिल्याचे आठवले म्हणाले. या वेळी व्यासपीठावर आ. नरेंद्र पवार उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेFarmerशेतकरी