शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

शेतक-यांच्या आत्महत्या थांबवणार, पाक व्याप्त काश्मीरसाठीही प्रयत्न करणार - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:53 IST

शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अ‍ॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या...

सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अ‍ॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या शेतक-यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली असून टप्प्याटप्प्याने त्याचा लाभ शेतकºयांना होईल. त्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.ठाणे जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचार दौºयात शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका चौक सभेत ते बोलत होते. शेतकºयांप्रमाणेच दलितांच्या महामंडळांची सुमारे ८०० कोटींची कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासन विचार करत असल्याचे त्यांनी सूतोवाच केले. शेतीच्या सिंचनक्षमतेत वाढ करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला. यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन परिणामी देशाचा विकास साधता येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने नितीन गडकरी यांना नद्या जोडण्याची, तर मला माणसे जोडण्याची जबाबदारी दिल्याचे त्यांनी हास्यविनोद करत स्पष्ट केले.आमच्या मतांवर आम्ही पडतो... पण, ताबडतोब उभे राहतो. पडून राहण्याची सवय आम्हाला नाही... असा विनोद करून ते पुढे म्हणाले की, दलितांचे मतदान निर्णायक ठरत असल्याने आमच्या पाठिंब्यावर पक्षाचे उमेदवार निवडून येत असल्याचे त्यांनी काही उदाहरणे देऊन पटवून दिले. ‘देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत, तसे उद्धवजीही मित्र... पण, या दोघांतील बरे नाही चित्र’ असे यमक साधून या चौक सभेतील उपस्थितांना आठवलेंनी कविताही ऐकवल्या. अपोझिशनवाले मुसलमानों को भडकाते है... वो आपको लढाने का काम करते है... लेकिन हम आपको बढाने का काम करते है... असेही यमक जुळवून शेर ऐकवून त्यांनी मोदी सरकार मुसलमानांच्या हिताचे असल्याचे पटवून दिले.संविधान बदलतील त्यांना आम्ही बदलणारजीएसटीमुळे थोडा त्रास झाला. पण, त्यासाठी चांगल्या दोन सुधारणा झाल्या आहेत. आगामी या बजेटमध्ये त्यांचा समावेश होईल. नोटाबंदीचा थोडा त्रास झाला. दलितांचे आरक्षण जाणार, असे सांगून विरोधक दलितांमध्ये भीती घालत आहेत. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्याचे सांगतात.पण, जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यात आहे. बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे... संविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान झाल्याचे मोदी यांनी सभागृहात सांगून संविधान बदलता येणार नसल्याची ग्वाही दिल्याचे आठवले म्हणाले. या वेळी व्यासपीठावर आ. नरेंद्र पवार उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेFarmerशेतकरी