शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हृदयस्पर्शी! तळीये दुर्घटनेत एकटीच बचावलेल्या पूजाला रक्षाबंधनाची भेट; भिवंडीतील भावांनी दिला आधार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:16 IST

एक महिन्यापूर्वी कोकणात पावसाने हाहाकार माजवून अनेकांचे बळी घेतले. त्यानंतर मानवतेच्या दृष्टीने राज्यभरातून शेकडो सामाजिक संघटनांनी कोकणात मदतीचा ओघ सुरू केला.

नितिन पंडीत

भिवंडी - एक महिन्यापूर्वी महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ८४ गावकऱ्यांचा बळी गेला. याच गावातील २३ वर्षीय पूजा कोंडलेकरच्या कुटूंबातील सर्वांचा बळी जाऊन ती एकटीच वाचली आहे. आज तिच्या शिक्षण, पालनपोषणसह विवाहाची जबाबदारी घेऊन भिवंडीतील भावांनी रक्षाबंधनाच्या दिवशी तिच्याकडून राखी बांधून घेतली आहे. आता पूजाला दुःखांच्या डोंगरातून नवीन सुखाची वाट दाखवत भिवंडीतील भावांनी आधार दिल्याने तिच्याशी जिव्हाळ्याचं नवीन भावा बहिणीचे नाते जुळल्याचे पाहावयास मिळाले असून भिवंडीतील तरुण प्रदीप शेट्टी याने पुजाची सर्व जबादारी स्वीकारून रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली आहे.

एक महिन्यापूर्वी कोकणात पावसाने हाहाकार माजवून अनेकांचे बळी घेतले. त्यानंतर मानवतेच्या दृष्टीने राज्यभरातून शेकडो सामाजिक संघटनांनी कोकणात मदतीचा ओघ सुरू केला. तर काहींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. यामध्ये भिवंडीतील साई फाऊंडेशनच्या ५० कार्यकर्त्यांनी चिंपळूणसह आजूबाजूच्या दुर्घटनाग्रस्त गावांना भेटी देत, त्यांना अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्य देऊन मदत केली. शिवाय त्यांच्या घरांची दुरुस्ती व साफसफाई करीत श्रमदानही केले होते. 

महाड तालुक्यातील तळीये गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळला होता. त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही दरडीबरोबर वाहत गेले. अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेली दगडं पडली, झाडे पडली, मातीचा ढिगारा पडला. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. या गावातील ३५  घरेही जमीनदोस्त झाली. त्यामध्ये पूजाचेही घर होते. त्यांनतर २० दिवसांनी साई फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांना गावकऱ्यांनी संपर्क करून मदत मागितली. त्यावेळी पूजाची  व्यथा त्यांच्या समोर आल्याने त्यांनी पूजाशी बहिण भावाचं नातं निर्माण करून तिची संपूर्ण जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरा केला.     

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनbhiwandiभिवंडी