शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

राज ठाकरे यांची सूचना मान्य, फेरीवाल्यांच्या तक्रारी यापुढे व्हॉटसअ‍ॅपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:41 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाहीर करण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाहीर करण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे केली. या वेळी वेलरासू यांनी त्यांची मागणी मान्य करताना लवकरच नंबर जाहीर केला जाईल, असे आश्वासन दिले.मनसे नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे होत नसल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी शनिवारी वेलरासू यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या प्रसंगी मनसेचे बाळा नांदगावकर, शिरीष पारकर, नितीन सरदेसाई, राजू पाटील, राजेश कदम, मनोज घरत, कौस्तुभ देसाई, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, गटनेते प्रकाश भोईर, नगरसेविका कस्तुरी देसाई, तृप्ती भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मध्य रेल्वे आणि महापालिकेने त्यांच्या हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात ठरवून कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र ठाकरे यांनी वेलरासू यांना दिले. या वेळी मध्य रेल्वेचे पत्र मिळाले असल्याचे वेलरासू यांनी स्पष्ट केले. महापालिका हद्दीतील कारवाई अधिक गतिमान करा, अशी सूचना ठाकरे यांनी केली. या वेळी फेरीवालाविरोधी पथकातील कामगार व अधिकाºयांच्या बदल्या करा. कारवाईनंतर फेरीवाले पुन्हा येऊन बसतात. अधिकारीवर्ग फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो, असे आरोप पदाधिकाºयांनी या वेळी केले. फेरीवाल्यांविरोधातील दंडाची रक्कम वाढवा. त्यामुळे त्यांना जरब बसेल. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर दंड वाढवून कारवाई करा, अशी सूचना केली. फेरीवाल्यांविरोधात वारंवार कारवाई केली जाते, असे आयुक्तांनी सांगितले. फेरीवाल्यांविरोधात तक्रार तसेच त्यांचे फोटो काढून नागरिकांना पाठवता यावेत, यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाहीर करा, त्याची मोक्याच्या ठिकाणी जाहिरात करा, अशी सूचना ठाकरे यांनी केली. ही सूचना वेलरासू यांनी मान्य करून तातडीने अंमलबजावणीचे आश्वासन दिले.केडीएमसीतील २७ गावांच्या समावेशामुळे पालिकेची हद्द वाढली. मात्र, हद्दवाढीचे अनुदान सरकारने अजूनही दिलेले नाही. त्याविषयी काय केले, असा सवाल ठाकरे यांनी करताच सरकारदरबारी त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे वेलरासू म्हणाले. त्याबाबतचे पत्र ठाकरे यांना देण्याचे त्यांनी मान्य केले. २७ गावांत राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. त्यात ५० टक्के रक्कम सरकार व ५० टक्के रक्कम महापालिकेची आहे. या हिश्श्यानुसार महापालिकेस ९० कोटी निधी मिळणार नाही. त्यामध्ये देखभाल-दुरुस्तीचा अंतर्भाव आहे. महापालिकेस ५० कोटींचा निधी मिळणार आहे. ही योजना हद्दवाढ अनुदानात दिली गेली असती, तर महापालिकेस ९० कोटींचा निधी मिळाला असता. हा मुद्दा विरोधी पक्षनेते हळबे यांनी उपस्थित केला. या प्रकरणीही लक्ष घालण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे.नगरसेविका देसाई यांनी त्यांच्या प्रभागातील सफाई कामगार कामावर न येताच हजेरी लावतात, अशी तक्रार केली. त्यावर वेलरासू यांनी संबंधित कर्मचाºयांची नावे मागितली आहेत. नगरसेविका भोईर यांनी त्यांच्या प्रभागात स्वच्छता होत नाही. पायवाटा, गटारे यांची कामे झालेली नाही, असा मुद्दा उपस्थित केला. प्रत्येक प्रभागातील मनसे नगरसेवकांसोबत आयुक्तांनी पाहणी दौरा करावा, अशी सूचना केली. त्याला आयुक्तांनी होकार दिला.डोंबिवलीतील बालभवनातील वाचनालय बंद आहे. ते चालवण्यासाठी डोंबिवलीतील पै फ्रेण्ड्स लायब्ररी इच्छुक आहे. त्याबाबत, लवकरच निर्णय घेऊन त्यांना वाचनालय चालवण्यास द्यावे, असे ठाकरे यांनी सांगितले. त्याबरोबर महापालिकेचा कला-क्रीडा हा विभाग २००५ पासून बंद आहे. त्याविषयी १२ बैठका होऊनही तो सुरू झालेला नाही. तो का सुरू करता येत नाही, याची माहिती दिली जात नाही. हा विभाग सुरू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे