शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

पक्ष संघटनेकडे झाले दुर्लक्ष, राज ठाकरे यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 06:37 IST

बदलापूरमधील पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

बदलापूर - बदलापूरमधील पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.या शहरात तब्बल नऊ वर्षांनंतर राज आले असता त्यांना यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मान्य केले. सध्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्याने पक्ष संघटनाबांधणीचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज कार्र्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत प्रश्नाला उत्तर देताना राज यांनी संघटनेकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत आपला कबुलीनामा दिला. बदलापूर शहर मराठी माणसांचे असतानाही तुम्हाला शहरात पुन्हा येण्यासाठी नऊ वर्षे का लागली, असा प्रश्न विचारल्यावर या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही, असे ते म्हणाले. तर, मनसेला विधानसभा निवडणुकीत ४६ हजार मते मिळाली होती. मनसेच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा ओघ का घसरला, असा प्रश्न विचारल्यावर त्याचेदेखील उत्तर माझ्याकडे नाही. संघटना सक्षम करणे, हा दौऱ्यामागील उद्देश असल्याचे राज यांनी नमूद केले.बदलापूरच्या परिस्थितीबाबत विचारले असता बदलापूरप्रमाणेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांचे लोंढे वास्तव्यासाठी येत आहेत. त्यामुळे शहरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात रिक्षांना परमिट देताना सरकारकडे प्रत्येक शहराची माहिती असणे आवश्यक होते. मात्र, माहिती नसतानाही सरसकट प्रत्येक शहरात परमिट देण्यात आले. त्यामुळे रिक्षा ठेवायची कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. देश आणि राज्यात बेकायदा कामे आणि प्रवृत्तींना संरक्षण देण्याचे काम होत असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सरकारने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.चर्चेविनाच परतावे लागले मान्यवरांनाराज ठाकरे हे बदलापूरमधील प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेणार होते. त्यासाठी सकाळी १० वाजता अनेक मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते. मात्र, राज यांनी पत्रकार परिषद झाल्यावर लागलीच निघण्याची भूमिका घेतली. त्यामुळे दोन तास राज ठाकरेंची वाट पाहणाºया प्रतिष्ठित नागरिकांना आणि डॉक्टरांना चर्चा न करताच परतावे लागले.भविष्यात परप्रांतीयांचे लोंढे वाढणार - राजअंबरनाथ : एकट्या ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आणि दोन नगरपालिका आहेत. सोबत जिल्हा परिषदेचा मोठा भागही समाविष्ट आहे. परप्रांतीयांचे सर्वाधिक लोंढे हे ठाणे जिल्ह्यात येत आहे. भविष्यातही त्यात वाढ होणार आहे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्तकेले.राज यांनी अंबरनाथ दौºयादरम्यान त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसह शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी शुक्रवारी चर्चा केली. यावेळी शहरातील समस्यांवर सर्वाधिक चर्चा झाली. या सर्व समस्यांवर उत्तर देताना राज यांनी ठाणे जिल्ह्याची अवस्था मुंबई सारखी झाली आहे, असेसांगितले.प्रत्येकजण हा मुंबई आणि ठाण्यातच स्थायिक होत आहे.परराज्यातील सर्व लोंढे हे ठाणे जिल्ह्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.हे रोखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सोबत औद्योगिक क्षेत्रात कारखानदारांना या पुढे ८० टक्के कामगार स्थानिक बेरोजगारांसाठीच राखीव ठेवण्यासाठी भाग पाडले जाईल असे मत त्यांनी व्यक्तकेले.दौºयाच्या दिवशीच गटबाजी उघडअंबरनाथ मनसेमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले शहरातील बॅनर शुक्रवारी पहाटे मनसेच्या कार्यकर्त्यांनीच उतरवले. एकमेकांना शह देण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.अंबरनाथ पालिका निवडणुकीतील वाद हा राज यांच्या दौºयाच्या दिवशी पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यांच्या स्वागताचे ६ ते ७ बॅनर काही माजी सभापतीने लावले होते. हे बॅनर पाहून मनसेच्या काही पदाधिकाºयांनी माजी सभापतींचे बॅनरच रात्रीच उतरवत दुसरे बॅनर लावले.मनसेतील अंतर्गत गटबाजी या दौ-याच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. माजी सभापती आणि एका पदाधिकाºयामधील वादामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मात्र दौरा असल्याने दोन्ही गटांनी शांततेची भूमिका घेतली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेbadlapurबदलापूर