शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष संघटनेकडे झाले दुर्लक्ष, राज ठाकरे यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 06:37 IST

बदलापूरमधील पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

बदलापूर - बदलापूरमधील पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.या शहरात तब्बल नऊ वर्षांनंतर राज आले असता त्यांना यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मान्य केले. सध्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्याने पक्ष संघटनाबांधणीचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज कार्र्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत प्रश्नाला उत्तर देताना राज यांनी संघटनेकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत आपला कबुलीनामा दिला. बदलापूर शहर मराठी माणसांचे असतानाही तुम्हाला शहरात पुन्हा येण्यासाठी नऊ वर्षे का लागली, असा प्रश्न विचारल्यावर या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही, असे ते म्हणाले. तर, मनसेला विधानसभा निवडणुकीत ४६ हजार मते मिळाली होती. मनसेच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा ओघ का घसरला, असा प्रश्न विचारल्यावर त्याचेदेखील उत्तर माझ्याकडे नाही. संघटना सक्षम करणे, हा दौऱ्यामागील उद्देश असल्याचे राज यांनी नमूद केले.बदलापूरच्या परिस्थितीबाबत विचारले असता बदलापूरप्रमाणेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांचे लोंढे वास्तव्यासाठी येत आहेत. त्यामुळे शहरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात रिक्षांना परमिट देताना सरकारकडे प्रत्येक शहराची माहिती असणे आवश्यक होते. मात्र, माहिती नसतानाही सरसकट प्रत्येक शहरात परमिट देण्यात आले. त्यामुळे रिक्षा ठेवायची कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. देश आणि राज्यात बेकायदा कामे आणि प्रवृत्तींना संरक्षण देण्याचे काम होत असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सरकारने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.चर्चेविनाच परतावे लागले मान्यवरांनाराज ठाकरे हे बदलापूरमधील प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेणार होते. त्यासाठी सकाळी १० वाजता अनेक मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते. मात्र, राज यांनी पत्रकार परिषद झाल्यावर लागलीच निघण्याची भूमिका घेतली. त्यामुळे दोन तास राज ठाकरेंची वाट पाहणाºया प्रतिष्ठित नागरिकांना आणि डॉक्टरांना चर्चा न करताच परतावे लागले.भविष्यात परप्रांतीयांचे लोंढे वाढणार - राजअंबरनाथ : एकट्या ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आणि दोन नगरपालिका आहेत. सोबत जिल्हा परिषदेचा मोठा भागही समाविष्ट आहे. परप्रांतीयांचे सर्वाधिक लोंढे हे ठाणे जिल्ह्यात येत आहे. भविष्यातही त्यात वाढ होणार आहे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्तकेले.राज यांनी अंबरनाथ दौºयादरम्यान त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसह शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी शुक्रवारी चर्चा केली. यावेळी शहरातील समस्यांवर सर्वाधिक चर्चा झाली. या सर्व समस्यांवर उत्तर देताना राज यांनी ठाणे जिल्ह्याची अवस्था मुंबई सारखी झाली आहे, असेसांगितले.प्रत्येकजण हा मुंबई आणि ठाण्यातच स्थायिक होत आहे.परराज्यातील सर्व लोंढे हे ठाणे जिल्ह्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.हे रोखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सोबत औद्योगिक क्षेत्रात कारखानदारांना या पुढे ८० टक्के कामगार स्थानिक बेरोजगारांसाठीच राखीव ठेवण्यासाठी भाग पाडले जाईल असे मत त्यांनी व्यक्तकेले.दौºयाच्या दिवशीच गटबाजी उघडअंबरनाथ मनसेमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले शहरातील बॅनर शुक्रवारी पहाटे मनसेच्या कार्यकर्त्यांनीच उतरवले. एकमेकांना शह देण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.अंबरनाथ पालिका निवडणुकीतील वाद हा राज यांच्या दौºयाच्या दिवशी पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यांच्या स्वागताचे ६ ते ७ बॅनर काही माजी सभापतीने लावले होते. हे बॅनर पाहून मनसेच्या काही पदाधिकाºयांनी माजी सभापतींचे बॅनरच रात्रीच उतरवत दुसरे बॅनर लावले.मनसेतील अंतर्गत गटबाजी या दौ-याच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. माजी सभापती आणि एका पदाधिकाºयामधील वादामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मात्र दौरा असल्याने दोन्ही गटांनी शांततेची भूमिका घेतली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेbadlapurबदलापूर