शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

पक्ष संघटनेकडे झाले दुर्लक्ष, राज ठाकरे यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 06:37 IST

बदलापूरमधील पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

बदलापूर - बदलापूरमधील पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.या शहरात तब्बल नऊ वर्षांनंतर राज आले असता त्यांना यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मान्य केले. सध्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्याने पक्ष संघटनाबांधणीचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज कार्र्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत प्रश्नाला उत्तर देताना राज यांनी संघटनेकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत आपला कबुलीनामा दिला. बदलापूर शहर मराठी माणसांचे असतानाही तुम्हाला शहरात पुन्हा येण्यासाठी नऊ वर्षे का लागली, असा प्रश्न विचारल्यावर या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही, असे ते म्हणाले. तर, मनसेला विधानसभा निवडणुकीत ४६ हजार मते मिळाली होती. मनसेच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा ओघ का घसरला, असा प्रश्न विचारल्यावर त्याचेदेखील उत्तर माझ्याकडे नाही. संघटना सक्षम करणे, हा दौऱ्यामागील उद्देश असल्याचे राज यांनी नमूद केले.बदलापूरच्या परिस्थितीबाबत विचारले असता बदलापूरप्रमाणेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांचे लोंढे वास्तव्यासाठी येत आहेत. त्यामुळे शहरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात रिक्षांना परमिट देताना सरकारकडे प्रत्येक शहराची माहिती असणे आवश्यक होते. मात्र, माहिती नसतानाही सरसकट प्रत्येक शहरात परमिट देण्यात आले. त्यामुळे रिक्षा ठेवायची कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. देश आणि राज्यात बेकायदा कामे आणि प्रवृत्तींना संरक्षण देण्याचे काम होत असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सरकारने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.चर्चेविनाच परतावे लागले मान्यवरांनाराज ठाकरे हे बदलापूरमधील प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेणार होते. त्यासाठी सकाळी १० वाजता अनेक मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते. मात्र, राज यांनी पत्रकार परिषद झाल्यावर लागलीच निघण्याची भूमिका घेतली. त्यामुळे दोन तास राज ठाकरेंची वाट पाहणाºया प्रतिष्ठित नागरिकांना आणि डॉक्टरांना चर्चा न करताच परतावे लागले.भविष्यात परप्रांतीयांचे लोंढे वाढणार - राजअंबरनाथ : एकट्या ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आणि दोन नगरपालिका आहेत. सोबत जिल्हा परिषदेचा मोठा भागही समाविष्ट आहे. परप्रांतीयांचे सर्वाधिक लोंढे हे ठाणे जिल्ह्यात येत आहे. भविष्यातही त्यात वाढ होणार आहे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्तकेले.राज यांनी अंबरनाथ दौºयादरम्यान त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसह शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी शुक्रवारी चर्चा केली. यावेळी शहरातील समस्यांवर सर्वाधिक चर्चा झाली. या सर्व समस्यांवर उत्तर देताना राज यांनी ठाणे जिल्ह्याची अवस्था मुंबई सारखी झाली आहे, असेसांगितले.प्रत्येकजण हा मुंबई आणि ठाण्यातच स्थायिक होत आहे.परराज्यातील सर्व लोंढे हे ठाणे जिल्ह्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.हे रोखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सोबत औद्योगिक क्षेत्रात कारखानदारांना या पुढे ८० टक्के कामगार स्थानिक बेरोजगारांसाठीच राखीव ठेवण्यासाठी भाग पाडले जाईल असे मत त्यांनी व्यक्तकेले.दौºयाच्या दिवशीच गटबाजी उघडअंबरनाथ मनसेमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले शहरातील बॅनर शुक्रवारी पहाटे मनसेच्या कार्यकर्त्यांनीच उतरवले. एकमेकांना शह देण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.अंबरनाथ पालिका निवडणुकीतील वाद हा राज यांच्या दौºयाच्या दिवशी पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यांच्या स्वागताचे ६ ते ७ बॅनर काही माजी सभापतीने लावले होते. हे बॅनर पाहून मनसेच्या काही पदाधिकाºयांनी माजी सभापतींचे बॅनरच रात्रीच उतरवत दुसरे बॅनर लावले.मनसेतील अंतर्गत गटबाजी या दौ-याच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. माजी सभापती आणि एका पदाधिकाºयामधील वादामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मात्र दौरा असल्याने दोन्ही गटांनी शांततेची भूमिका घेतली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेbadlapurबदलापूर