शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे आले अन् अविनाश जाधवांचं उपोषण सुटले; टोल दरवाढीवरून सरकारला इशारा

By जितेंद्र कालेकर | Updated: October 8, 2023 14:08 IST

युतीने दिलेल्या टोलमुक्तीच्या आश्वासनाचे काय झाले?: टोलवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट

ठाणे - टोल बंद करण्यासाठी मनसेने आतापर्यंत अनेक आंदोलने करून अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास ६७ टोल नाके बंद केले. शिवसेना भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते,  त्याचे काय झाले, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. टोलवाढी संदर्भात येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाहीतर मात्र गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल. त्याबाबतची  भूमिका लवकरच जाहीर करणार आल्याचे राज ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.

टोलदरवाढी विरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे गेल्या चार दिवसांपासून ठाण्याच्या वेशीवरील मुलूंड टोलनाका येथे आमरण उपोषणाला बसले होते. रविवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन अविनाश जाधव यांच्यासह आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ठाण्यातील उपोषणाची माहिती घेतल्यानंतर उपोषण हे आपले काम नसल्याचे अविनाश जाधव यांना सांगितल्याचे  राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, मनसेने आंदोलने करुन ६५ ते ६७ टोल नाके बंद केली. 

शिवसेना भाजपच्या जाहीरनाम्यात टोल नाके बंद करू, असे आश्वासन दिले होते. २०१४ आणि २०१७ ला सुद्धा त्यांनी हे सांगितले होते. पण आम्हाला टोल नाक्याचे काय झाले? हे विचारले जाते.  मात्र टोलमुक्तीची घोषणा करणाºयांना कोणी प्रश्न विचारत नाही.मोपलवारांशी बोलणे झाले, २००२ ला अ‍ॅग्रीमेंट झाले. त्यावर पैसे उचलल्याचे ते म्हणाले. जो पेडर रोड  झाला नाही त्याचेही पैसे घेतले जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. रस्ते व्यवस्थित बांधले जात नसतील तर टोल कशाला? म्हैसकर हे कोणाचे लाडके आहेत. एकनाथ शिंदे यांनी टोल संदर्भात याचिका  का मागे घेतली? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. जे पिळवणूक करतात, लोकं त्यांनाच मतदान करतात, असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपोषण मागे घ्यायला लावलेयेत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास सांगितल्याचेही त्यांनी  स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतरच आता आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. मुख्यमंत्री ठाण्याचेच असल्यामुळे सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.  तसा झाला नाही तर पुढचे आंदोलन गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलने असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. निवडणूका येतायेत, मुख्यमंत्र्यांनाही पुन्हा उभे रहायचे आहे. त्यांनाही याचा त्रास होऊ शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी दोस्ती, लोढा, हिरानंदानी कॉम्पलेक्समधील रहिवाशांनीही टोल मुक्तीसाठी राज ठाकरे यांची भेट ष्घेतली. 

उपोषणाची सांगता..राज ठाकरे यांनी व्यासपीठावर जाऊन अविनाश जाधव यांना उपोषणाची सांगता करण्यास सांगितले. त्यानंतर जाधव यांच्यासह ओवळा माजीवडा उपशहर प्रमुख पुष्कर विचारे यांनीही या उपोषणाची सांगता केली. यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे, आमदार राजू पाटील, रवीद्र मोरे आणि बहुसंख्येने मनसैनिक उपस्ति होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAvinash Jadhavअविनाश जाधव