शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राज ठाकरे आले अन् अविनाश जाधवांचं उपोषण सुटले; टोल दरवाढीवरून सरकारला इशारा

By जितेंद्र कालेकर | Updated: October 8, 2023 14:08 IST

युतीने दिलेल्या टोलमुक्तीच्या आश्वासनाचे काय झाले?: टोलवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट

ठाणे - टोल बंद करण्यासाठी मनसेने आतापर्यंत अनेक आंदोलने करून अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास ६७ टोल नाके बंद केले. शिवसेना भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते,  त्याचे काय झाले, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. टोलवाढी संदर्भात येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाहीतर मात्र गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल. त्याबाबतची  भूमिका लवकरच जाहीर करणार आल्याचे राज ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.

टोलदरवाढी विरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे गेल्या चार दिवसांपासून ठाण्याच्या वेशीवरील मुलूंड टोलनाका येथे आमरण उपोषणाला बसले होते. रविवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन अविनाश जाधव यांच्यासह आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ठाण्यातील उपोषणाची माहिती घेतल्यानंतर उपोषण हे आपले काम नसल्याचे अविनाश जाधव यांना सांगितल्याचे  राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, मनसेने आंदोलने करुन ६५ ते ६७ टोल नाके बंद केली. 

शिवसेना भाजपच्या जाहीरनाम्यात टोल नाके बंद करू, असे आश्वासन दिले होते. २०१४ आणि २०१७ ला सुद्धा त्यांनी हे सांगितले होते. पण आम्हाला टोल नाक्याचे काय झाले? हे विचारले जाते.  मात्र टोलमुक्तीची घोषणा करणाºयांना कोणी प्रश्न विचारत नाही.मोपलवारांशी बोलणे झाले, २००२ ला अ‍ॅग्रीमेंट झाले. त्यावर पैसे उचलल्याचे ते म्हणाले. जो पेडर रोड  झाला नाही त्याचेही पैसे घेतले जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. रस्ते व्यवस्थित बांधले जात नसतील तर टोल कशाला? म्हैसकर हे कोणाचे लाडके आहेत. एकनाथ शिंदे यांनी टोल संदर्भात याचिका  का मागे घेतली? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. जे पिळवणूक करतात, लोकं त्यांनाच मतदान करतात, असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपोषण मागे घ्यायला लावलेयेत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास सांगितल्याचेही त्यांनी  स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतरच आता आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. मुख्यमंत्री ठाण्याचेच असल्यामुळे सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.  तसा झाला नाही तर पुढचे आंदोलन गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलने असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. निवडणूका येतायेत, मुख्यमंत्र्यांनाही पुन्हा उभे रहायचे आहे. त्यांनाही याचा त्रास होऊ शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी दोस्ती, लोढा, हिरानंदानी कॉम्पलेक्समधील रहिवाशांनीही टोल मुक्तीसाठी राज ठाकरे यांची भेट ष्घेतली. 

उपोषणाची सांगता..राज ठाकरे यांनी व्यासपीठावर जाऊन अविनाश जाधव यांना उपोषणाची सांगता करण्यास सांगितले. त्यानंतर जाधव यांच्यासह ओवळा माजीवडा उपशहर प्रमुख पुष्कर विचारे यांनीही या उपोषणाची सांगता केली. यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे, आमदार राजू पाटील, रवीद्र मोरे आणि बहुसंख्येने मनसैनिक उपस्ति होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAvinash Jadhavअविनाश जाधव