शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

By admin | Updated: July 3, 2016 03:25 IST

जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शनिवारी दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले असून उपनगरीय गाड्यांची वाहतूकही सुमारे अर्धा तास उशिराने

ठाणे : जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शनिवारी दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले असून उपनगरीय गाड्यांची वाहतूकही सुमारे अर्धा तास उशिराने धावत होती. यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. तर, दुपारी ऐन शाळा सुटण्याच्या वेळी पावसाचा जोर वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना घर गाठताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६६३ एमएम पाऊस पडला आहे. ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांमध्ये गटारांचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. खाडीला भरती आलेली असल्यामुळे ४.७२ मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. या परिसरातील काही झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. तर, अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर येथील पाण्यात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली. यातील लक्ष्मण भिवा पुरवार (२५) याचा बुडून मृत्यू झाला असून अनिकेत उत्तम काळे (२५) हा तरुण बचावला आहे. त्याच्यावर कल्याण येथील धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू आहे.आगामी २४ तासांत कोकणात या पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सातही तालुक्यांत मागील २४ तासांच्या कालावधीत ६६३ मिमी पाऊस पडला असून सरासरी ९४.७१ मिमी या पावसाची नोंद करण्यात आली आहे. संततधार सुरू असलेला हा पाऊस भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३७ मिमी पडला आहे. तर, याखालोखाल ठाणे येथे ११२ मिमी, कल्याण १०३, उल्हासनगर ९४, अंबरनाथ ८६.६०, शहापूरला ७१.४० मिमी पाऊस पडला असून मुरबाडला सर्वात कमी ५९ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.