शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

By admin | Updated: July 3, 2016 03:25 IST

जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शनिवारी दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले असून उपनगरीय गाड्यांची वाहतूकही सुमारे अर्धा तास उशिराने

ठाणे : जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शनिवारी दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले असून उपनगरीय गाड्यांची वाहतूकही सुमारे अर्धा तास उशिराने धावत होती. यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. तर, दुपारी ऐन शाळा सुटण्याच्या वेळी पावसाचा जोर वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना घर गाठताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६६३ एमएम पाऊस पडला आहे. ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांमध्ये गटारांचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. खाडीला भरती आलेली असल्यामुळे ४.७२ मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. या परिसरातील काही झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. तर, अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर येथील पाण्यात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली. यातील लक्ष्मण भिवा पुरवार (२५) याचा बुडून मृत्यू झाला असून अनिकेत उत्तम काळे (२५) हा तरुण बचावला आहे. त्याच्यावर कल्याण येथील धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू आहे.आगामी २४ तासांत कोकणात या पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सातही तालुक्यांत मागील २४ तासांच्या कालावधीत ६६३ मिमी पाऊस पडला असून सरासरी ९४.७१ मिमी या पावसाची नोंद करण्यात आली आहे. संततधार सुरू असलेला हा पाऊस भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३७ मिमी पडला आहे. तर, याखालोखाल ठाणे येथे ११२ मिमी, कल्याण १०३, उल्हासनगर ९४, अंबरनाथ ८६.६०, शहापूरला ७१.४० मिमी पाऊस पडला असून मुरबाडला सर्वात कमी ५९ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.