शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

पावसाचा जोर मंदावला, सावरणे सुरू, ठाणे जिल्हा पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 06:13 IST

जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून विस्कळीत झालेले जनजीवन रविवारी रुळांवर येताना दिसले.

ठाणे - जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून विस्कळीत झालेले जनजीवन रविवारी रुळांवर येताना दिसले. नदीनाल्यांच्या किनारी असणाऱ्या गावांतील काही घरांत पाणी शिरले होते, ते पाणी ओसरले. मात्र, त्यात अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकºयांनी पेरणी केलेली पिके लागवडीसाठी आलेली असताना जोरदार पावसात वाहून गेली.रविवारी दिवसभर जिल्ह्यात ठिकठिकाणी कमीअधिक पाऊस पडला असून मागील २४ तासांत सरासरी १७९.३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर ११ जुलैपर्यंत कायम राहणार असून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.ठाणे शहरात रविवारी भिंत कोसळल्याची माहिती असून वंदना टॉकीजसमोर व अन्य ठिकाणी १० झाडे उन्मळून पडलीत. जिल्ह्यातील नद्यांचा पूर ओसरला असून परिसरातील चिखलामुळे आजार वाढण्याचे भय वाढले आहे.अंबरनाथ पूर्वपदावरअंबरनाथ : पावसाचा जोर कमी झाल्याने रविवारी जनजीवन पूर्ववत झाले आहे. अंबरनाथमधील अनेक सखल भागांत पाणी शिरल्याने लोकांच्या घरांचे नुकसान झाले होते. नागरिकांनी आपापल्या घरांतील सामानाची आवराआवर सुरू केली असून संसारोपयोगी वस्तू नव्याने मांडण्याचे काम सुरू केले आहे. नाल्याचे पाणी रस्त्यांवर आल्याने चिखलाचा थर तयार झाला आहे.भिवंडीतील मार्केटमध्ये सफाईभिवंडी : शहरात मुसळधार पावसाने धुडगूस घातल्यानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे तीनबत्ती, शिवाजीनगर व ठाणगेआळी मार्केटच्या ठिकाणी साचलेल्या घाणीमुळे परिसरात रोगराई पसरू नये, म्हणून आरोग्य व स्वच्छता विभागाने मार्केटमध्ये स्वच्छतेस सुरुवात केली.अतिवृष्टीमुळे खाडीचे व नाल्याचे पाणी मार्केटमध्ये शिरले होते. भाजीपाला पाण्यात वाहून गेला. तो भाजीपाला जवळच असलेल्या पालिकेच्या जागेवर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. दुर्गंधीने हैराण झालेल्या नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य उपायुक्तांकडे तक्रार केल्यानंतर दुपारनंतर स्वच्छता सुरू करण्यात आली. कचरा उचलल्यानंतर रोगराई पसरू नये, म्हणून जंतुनाशके फवारण्याची मागणी नागरिकांना केली.उल्हास नदीकिनारी असणाºयांचा धोका टळलाबदलापूर : मुसळधार पावसाने उल्हास नदी भरून वाहत राहिल्याने नदीकिनारी असलेल्या गावांना धोका निर्माण झाला होता. मात्र, रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने हा धोका टळला आहे.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या