शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पावसाचा जोर मंदावला, सावरणे सुरू, ठाणे जिल्हा पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 06:13 IST

जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून विस्कळीत झालेले जनजीवन रविवारी रुळांवर येताना दिसले.

ठाणे - जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून विस्कळीत झालेले जनजीवन रविवारी रुळांवर येताना दिसले. नदीनाल्यांच्या किनारी असणाऱ्या गावांतील काही घरांत पाणी शिरले होते, ते पाणी ओसरले. मात्र, त्यात अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकºयांनी पेरणी केलेली पिके लागवडीसाठी आलेली असताना जोरदार पावसात वाहून गेली.रविवारी दिवसभर जिल्ह्यात ठिकठिकाणी कमीअधिक पाऊस पडला असून मागील २४ तासांत सरासरी १७९.३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर ११ जुलैपर्यंत कायम राहणार असून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.ठाणे शहरात रविवारी भिंत कोसळल्याची माहिती असून वंदना टॉकीजसमोर व अन्य ठिकाणी १० झाडे उन्मळून पडलीत. जिल्ह्यातील नद्यांचा पूर ओसरला असून परिसरातील चिखलामुळे आजार वाढण्याचे भय वाढले आहे.अंबरनाथ पूर्वपदावरअंबरनाथ : पावसाचा जोर कमी झाल्याने रविवारी जनजीवन पूर्ववत झाले आहे. अंबरनाथमधील अनेक सखल भागांत पाणी शिरल्याने लोकांच्या घरांचे नुकसान झाले होते. नागरिकांनी आपापल्या घरांतील सामानाची आवराआवर सुरू केली असून संसारोपयोगी वस्तू नव्याने मांडण्याचे काम सुरू केले आहे. नाल्याचे पाणी रस्त्यांवर आल्याने चिखलाचा थर तयार झाला आहे.भिवंडीतील मार्केटमध्ये सफाईभिवंडी : शहरात मुसळधार पावसाने धुडगूस घातल्यानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे तीनबत्ती, शिवाजीनगर व ठाणगेआळी मार्केटच्या ठिकाणी साचलेल्या घाणीमुळे परिसरात रोगराई पसरू नये, म्हणून आरोग्य व स्वच्छता विभागाने मार्केटमध्ये स्वच्छतेस सुरुवात केली.अतिवृष्टीमुळे खाडीचे व नाल्याचे पाणी मार्केटमध्ये शिरले होते. भाजीपाला पाण्यात वाहून गेला. तो भाजीपाला जवळच असलेल्या पालिकेच्या जागेवर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. दुर्गंधीने हैराण झालेल्या नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य उपायुक्तांकडे तक्रार केल्यानंतर दुपारनंतर स्वच्छता सुरू करण्यात आली. कचरा उचलल्यानंतर रोगराई पसरू नये, म्हणून जंतुनाशके फवारण्याची मागणी नागरिकांना केली.उल्हास नदीकिनारी असणाºयांचा धोका टळलाबदलापूर : मुसळधार पावसाने उल्हास नदी भरून वाहत राहिल्याने नदीकिनारी असलेल्या गावांना धोका निर्माण झाला होता. मात्र, रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने हा धोका टळला आहे.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या