शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जोर मंदावला, सावरणे सुरू, ठाणे जिल्हा पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 06:13 IST

जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून विस्कळीत झालेले जनजीवन रविवारी रुळांवर येताना दिसले.

ठाणे - जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून विस्कळीत झालेले जनजीवन रविवारी रुळांवर येताना दिसले. नदीनाल्यांच्या किनारी असणाऱ्या गावांतील काही घरांत पाणी शिरले होते, ते पाणी ओसरले. मात्र, त्यात अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकºयांनी पेरणी केलेली पिके लागवडीसाठी आलेली असताना जोरदार पावसात वाहून गेली.रविवारी दिवसभर जिल्ह्यात ठिकठिकाणी कमीअधिक पाऊस पडला असून मागील २४ तासांत सरासरी १७९.३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर ११ जुलैपर्यंत कायम राहणार असून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.ठाणे शहरात रविवारी भिंत कोसळल्याची माहिती असून वंदना टॉकीजसमोर व अन्य ठिकाणी १० झाडे उन्मळून पडलीत. जिल्ह्यातील नद्यांचा पूर ओसरला असून परिसरातील चिखलामुळे आजार वाढण्याचे भय वाढले आहे.अंबरनाथ पूर्वपदावरअंबरनाथ : पावसाचा जोर कमी झाल्याने रविवारी जनजीवन पूर्ववत झाले आहे. अंबरनाथमधील अनेक सखल भागांत पाणी शिरल्याने लोकांच्या घरांचे नुकसान झाले होते. नागरिकांनी आपापल्या घरांतील सामानाची आवराआवर सुरू केली असून संसारोपयोगी वस्तू नव्याने मांडण्याचे काम सुरू केले आहे. नाल्याचे पाणी रस्त्यांवर आल्याने चिखलाचा थर तयार झाला आहे.भिवंडीतील मार्केटमध्ये सफाईभिवंडी : शहरात मुसळधार पावसाने धुडगूस घातल्यानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे तीनबत्ती, शिवाजीनगर व ठाणगेआळी मार्केटच्या ठिकाणी साचलेल्या घाणीमुळे परिसरात रोगराई पसरू नये, म्हणून आरोग्य व स्वच्छता विभागाने मार्केटमध्ये स्वच्छतेस सुरुवात केली.अतिवृष्टीमुळे खाडीचे व नाल्याचे पाणी मार्केटमध्ये शिरले होते. भाजीपाला पाण्यात वाहून गेला. तो भाजीपाला जवळच असलेल्या पालिकेच्या जागेवर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. दुर्गंधीने हैराण झालेल्या नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य उपायुक्तांकडे तक्रार केल्यानंतर दुपारनंतर स्वच्छता सुरू करण्यात आली. कचरा उचलल्यानंतर रोगराई पसरू नये, म्हणून जंतुनाशके फवारण्याची मागणी नागरिकांना केली.उल्हास नदीकिनारी असणाºयांचा धोका टळलाबदलापूर : मुसळधार पावसाने उल्हास नदी भरून वाहत राहिल्याने नदीकिनारी असलेल्या गावांना धोका निर्माण झाला होता. मात्र, रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने हा धोका टळला आहे.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या