शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

मुंबई-ठाण्याच्या धरणांमधील पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; गेल्या वर्षी आज भरलेल्या धरणांमध्ये निराशाजनक पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 16:13 IST

धरणांच्या पाणी साठ्याविषयी चिंता वाढली आहे. पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा यंदा पाणी कपात अटळ दिसून येत आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणारे जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा तयार झालेला नाही. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने आतापर्यंत हुलकावणी दिली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत भरलेल्या मोडक सागरसह, तानसा,  बारवी धरणात धरणांमध्ये 100 टक्के पाणी साठा होऊन ते भरले होते. मात्र या पावसाळ्यात धरणांमध्ये आजपर्यंत 50 टक्केही पाणी साठा झालेला नाही. त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्याविषयी चिंता वाढली आहे. पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा यंदा पाणी कपात अटळ दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरांना, उद्योग, कारखाने आणि कंपन्यांना पाणी पुरवठा करणार्‍या बारवी धरणात गेल्या वर्षी आजच्या दिवशी 102 टक्के पाणीसाठा होता. जुन्या पाणीपातळीनुसार हे धरण भरले होते. नव्याने वाढवलेल्या उंचीनुसारही ते पुढील तीन दिवसांत भरल्यामुळे दरवाजे उघडावे लागले होते. पण या पावसाळ्यात बारवीत 48.53 टक्के पाणी साठा झाला आहे. आज केवळ 4 मिमी पाऊस पडला आहे. या धरणात आतापर्यंत 165.43 दशलक्ष घनमीटर पाणी साठा तयार झालेला आहे. या आठवड्यात फक्त 7.96 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढला आहे. या प्रमाणेच ठाणे, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा - भाईंझरला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणातही 33.19 टक्के साठा तयार झाला. गेल्या वर्षी तो 72.42 टक्के होता. आज तर या धरणात पाऊस पडलाच नाही.

मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण गेल्या वर्षी आजच्या दिवशी 100 टक्के भरले होते. पण आज या धरणात फक्त 40 टक्के पाणी साठा आहे. आज 16 मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. आठवड्यात फक्त तीन दशलक्ष घन मीटर पाणी साठा वाढला आहे. भातसा धरणात 52.94 टक्के पाणी साठा तयार झाला. गेल्या वर्षी तो 88 टक्के होता. या धरणात आज फक्त 2 मिमी पाऊस पडला आहे.  भातसात या आठवड्यात 38 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढला आहे. तानसा धरणात आजपर्यंत फक्त 25 .47 टक्के पाणी साठा आहे. गेल्या वर्षी तो 99.38 टक्के होता. आठवड्यात दोन दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढला आहे. तर आज 2 मिमी पाऊस पडला. मध्यवैतरणा धरणात आतापर्यंत 33.86 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो 93.94 टक्के होता. आज या धरणात सर्वाधिक 32 मिमी पाऊस पडला आहे. धरणांतील या चिंता जनक पाणी साठ्यामुळे काळजी वाढली आहे. आगामी दिवसात धरणांच्या या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.