शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-ठाण्याच्या धरणांमधील पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; गेल्या वर्षी आज भरलेल्या धरणांमध्ये निराशाजनक पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 16:13 IST

धरणांच्या पाणी साठ्याविषयी चिंता वाढली आहे. पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा यंदा पाणी कपात अटळ दिसून येत आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणारे जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा तयार झालेला नाही. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने आतापर्यंत हुलकावणी दिली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत भरलेल्या मोडक सागरसह, तानसा,  बारवी धरणात धरणांमध्ये 100 टक्के पाणी साठा होऊन ते भरले होते. मात्र या पावसाळ्यात धरणांमध्ये आजपर्यंत 50 टक्केही पाणी साठा झालेला नाही. त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्याविषयी चिंता वाढली आहे. पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा यंदा पाणी कपात अटळ दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरांना, उद्योग, कारखाने आणि कंपन्यांना पाणी पुरवठा करणार्‍या बारवी धरणात गेल्या वर्षी आजच्या दिवशी 102 टक्के पाणीसाठा होता. जुन्या पाणीपातळीनुसार हे धरण भरले होते. नव्याने वाढवलेल्या उंचीनुसारही ते पुढील तीन दिवसांत भरल्यामुळे दरवाजे उघडावे लागले होते. पण या पावसाळ्यात बारवीत 48.53 टक्के पाणी साठा झाला आहे. आज केवळ 4 मिमी पाऊस पडला आहे. या धरणात आतापर्यंत 165.43 दशलक्ष घनमीटर पाणी साठा तयार झालेला आहे. या आठवड्यात फक्त 7.96 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढला आहे. या प्रमाणेच ठाणे, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा - भाईंझरला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणातही 33.19 टक्के साठा तयार झाला. गेल्या वर्षी तो 72.42 टक्के होता. आज तर या धरणात पाऊस पडलाच नाही.

मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण गेल्या वर्षी आजच्या दिवशी 100 टक्के भरले होते. पण आज या धरणात फक्त 40 टक्के पाणी साठा आहे. आज 16 मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. आठवड्यात फक्त तीन दशलक्ष घन मीटर पाणी साठा वाढला आहे. भातसा धरणात 52.94 टक्के पाणी साठा तयार झाला. गेल्या वर्षी तो 88 टक्के होता. या धरणात आज फक्त 2 मिमी पाऊस पडला आहे.  भातसात या आठवड्यात 38 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढला आहे. तानसा धरणात आजपर्यंत फक्त 25 .47 टक्के पाणी साठा आहे. गेल्या वर्षी तो 99.38 टक्के होता. आठवड्यात दोन दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढला आहे. तर आज 2 मिमी पाऊस पडला. मध्यवैतरणा धरणात आतापर्यंत 33.86 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो 93.94 टक्के होता. आज या धरणात सर्वाधिक 32 मिमी पाऊस पडला आहे. धरणांतील या चिंता जनक पाणी साठ्यामुळे काळजी वाढली आहे. आगामी दिवसात धरणांच्या या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.