शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जिल्ह्यात ठिकठिकाणी कोसळल्या पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:29 IST

चक्रीवादळाचे संकट निवळले : सरासरी ३१ मिमी पावसाची नोंद

ठाणे : समुद्रातील ‘महा’ चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्याला बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात करून सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, तीन दिवसांच्या कालावधीत कोणतेही संकट उद्भवले नाही. परंतु, गुरुवारी रात्रीपासून केवळ पावसाच्या सरी ठिकाठिकाणी पडल्याने सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले होते.

ठाणे शहरात पहाटे ५ वाजेपासून पाऊस पडला. यामुळे वाहतूकसेवेवरही परिणाम झाला. उपनगरीय वाहतुकीचे वेळापत्रक दुपारपर्यंत पूर्णपणे कोलमडले होते. हिरानंदानी इस्टेटमध्ये अभिषेक विश्वकर्मा (२५) युवक लिफ्टमध्ये अडकला असता त्यास अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. याशिवाय, उल्हासनगर येथील फर्निचर बाजारात आग लागल्यामुळे एक दुकान सकाळच्या वेळी जळाले. याव्यतिरिक्त अन्य कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण विभागाने सांगितले.जिल्ह्यात सर्वाधिक ठाणे शहरात २० मिमी पाऊस : जिल्हाभरात ३१ मिमी म्हणजे सरासरी ४.४३ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २० मिमी ठाणे शहरात पडला असून उल्हासनगरला चार, भिवंडीला पाच आणि मुरबाडमध्ये दोन मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे