शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस, रामभक्तीला आले उधाण, लक्षणीय ठरला बुधवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 01:41 IST

बुधवारचा दिवस जसा पावसाने गाजवला, तसाच तो अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीकरिता झालेल्या भूमिपूजनामुळे तमाम रामभक्तांमधील उत्साह, जल्लोष यामुळेही लक्षणीय ठरला.

गेले काही दिवस दडी मारुन बसलेल्या पावसाला सोमवारपासून सुरुवात झाली. मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून बुधवारी दिवसभर मुसळधार सरींनी ठाणे जिल्ह्याला झोपडून काढले. बुधवारी सायंकाळपासून सोसाट्याचे वारे व कोसळधारांनी तुफान धुमाकूळ घातला. पावसामुळे अनेक झाडे कोसळली, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले. ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी सायंकाळी झालेल्या तुफान वृष्टीने रेल्वे वाहतूक कोलमडल्याने अत्यावश्यक सेवेकरिता मुंबईत गेलेल्या चाकरमान्यांच्या कुटुंबांचा जीव टांगणीला लागला होता.

बुधवारचा दिवस जसा पावसाने गाजवला, तसाच तो अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीकरिता झालेल्या भूमिपूजनामुळे तमाम रामभक्तांमधील उत्साह, जल्लोष यामुळेही लक्षणीय ठरला. अनेक मंदिरांमध्ये सकाळपासून रामरक्षा, हनुमानचालिसा पठण करण्यात आले. चौकाचौकांत श्रीरामाच्या तसबिरीचे पूजन करुन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काही ठिकाणी बाइकरॅली काढण्यात आल्या. अनेकांनी कोरोनाच्या संकटामुळे घरातच पूजाअर्चा करुन राम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त केला.ठाण्यात मोठी पडझडलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्याला मंगळवारी रात्रभर झोडपले. पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड होऊन जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ६६.८ मिमी पाऊस पडला. यादरम्यान ठाणे शहरात १६ झाडे उन्मळून पडली. एका इमारतीची गॅलरी कोसळली, तर कसारा घाटात दरड कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.टोकावडेपासून दोन किलोमीटर अंतरावरील हेदवली गावच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे. माळशेज घाटातील वळणावर मोटारसायकलची ट्रकला धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. कसारा घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने रस्त्यावर मातीचे ढिगारे असून, झाडेही कोसळली आहेत. यातून वाट काढत वाहने पुढे जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.ठाणे शहरात घोडबंदर रोडवरील ओवळा येथे श्रीराम हॉस्पिटलच्या कम्पाऊंडची भिंत एका घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. शहरात १६ पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. घोडबंदर रोडवरील पाटोनपाडा येथील सोसायटीतील आठ दुचाकींवर एक झाड पडले. कळवा येथील मनिषानगरसह शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे शहर व तालुक्यात सर्वाधिक ९३ मिमी पाऊस पडला. या खालोखाल भिवंडीला ९0 मिमी, कल्याणला ३५, मुरबाडला ७0, शहापूरला ३४, उल्हासनगर ४४ आणि अंबरनाथला ७0 मिमी पाऊस पडला. ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात अवघा ८८ मिमी आणि बारवी धरण क्षेत्रात ९३ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.नाल्यात बुडून एकाचा मृत्यूमीरा रोड : मीरा गावठाणमधील गायत्री सोसायटीत राहणारे राकेश हरसोरा (४७) यांचा बुधवारी नाल्यात बुडून मृत्यू झाला. तर वाहून जाणाºया एकाला स्थानिकांनी वाचवले.मीरा गावठाण - महाजनवाडीत डोंगरावरून पाण्याचा मोठा लोंढा येतो. गेले दोन दिवस पडणाºया मुसळधार पावसामुळे मोठ्या नाल्याची भिंत कोसळली व रस्ता खचला. येथील बैठ्या चाळींमध्ये पाणी शिरले आहे. सकाळी दोन रिक्षा आणि दुचाकी नाल्यात वाहून गेल्या. गाडी पकडण्याच्या प्रयत्नात राकेश नाल्यात वाहून गेले. त्यांचा मृतदेह पुढच्या भागात आढळला. वाहून जाणाºया एकास रहिवाशांनी वाचवले.रामनामाचा जल्लोष, दीपोत्सव, फटाक्यांची आतषबाजीकल्याण-डोंबिवलीत घरोघरी उत्साह : बाइक रॅली, प्रतिमा पूजनडोंबिवली : अयोध्येत रामजन्मभूमीच्या भूूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. त्यास कोरोनामुळे अनेकांना हजर राहता न आल्याने शहरातील कारसेवकांनी तसेच रामभक्तांनी रामनामाचा जयघोष करीत घरोघरी रामाच्या प्रतिमेचे पूजन केले. युवकांनी बाइक रॅली काढली, तर भाजपच्या वतीने चौकामध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. ठाकुर्लीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.बुधवारी सकाळी पावसाचा जोर अधिक असल्याने रामभक्तांनी घरी राहून प्रतिमा पूजन केले. संध्याकाळी दीपोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. शहरातील श्री गणेश मंदिर संस्थान, श्री गोविंदानंद श्रीराम मंदिर आदी ठिकाणी राम दरबाराच्या मूर्तींना फुलांनी सजवण्यात आले होते. नागरिकांनी मंगलवेश परिधान करून या सोहळ्याचा आनंद लुटला. गणेश मंदिराला आकर्षक सजावट केली होती. त्या ठिकाणी तीन दिवसांपासून वाल्मिकी रामायणाचे पठण करण्यात आले. सव्वा कोटी रामनाम जपाचा संकल्पही सोडण्यात आला होता.संध्याकाळी दीपोत्सवाचे नियोजन केले होते. रामनामजप, पठणासाठी काही जोडप्यांना बोलावून त्यांना फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करुन हा उपक्रम पार पडल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष राहुल दामले यांनी दिली. एकतानगर येथे भाजपचे पदाधिकारी बाळा पवार यांच्या घरापासून बजरंग दल, संघ स्वयंसेवकांनी बाइक रॅली काढली होती. त्यावेळी रामाचा, हनुमानाचा जयघोष करण्यात आला. ठाकुर्लीतही काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त केला. अनेक कारसेवकांनी घरी रांगोळी काढली, काहींनी कारसेवेला गेले असताना सोबत आणलेल्या जन्मस्थानाच्या ठिकाणच्या दगडाची श्रद्धेने पूजा केली. संघ स्वयंसेवक आणि डोंबिवली इतिहास संकलन समितीचे चंद्रकांत जोशी यांच्या तुकारामनगर, आयरे गाव येथील घरामध्ये त्यांनी पाषाण पूजन केले. सोसायटीसह अन्य स्वयंसवेकांनी जाऊन त्याचे दर्शन घेतले. कल्याणमध्येही साठे बंधू यांच्या घरी राममंदिर सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तेथे २८ सप्टेंबर १९९० रोजी श्रीराम रथयात्रेच्या निमित्ताने लालकृष्ण अडवाणी कल्याणमध्ये आले असता, त्यांना देण्यात आलेली तलवार अजूनही जपून ठेवण्यात आली आहे. त्याचे पूजन करण्यात आले.रामनगरच्या श्रीराम मंदिरामध्ये रामदरबाराचे पूजन करून अभिषेक संपन्न झाला. कोरोनापासून देशाच्या संकटाचे रक्षण करावे, असा संकल्प सोडण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने रामभक्तांनी घरोघरी जप केला आणि विश्वशांतीची प्रार्थना केली. 

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरारRainपाऊस