शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पाऊस, रामभक्तीला आले उधाण, लक्षणीय ठरला बुधवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 01:41 IST

बुधवारचा दिवस जसा पावसाने गाजवला, तसाच तो अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीकरिता झालेल्या भूमिपूजनामुळे तमाम रामभक्तांमधील उत्साह, जल्लोष यामुळेही लक्षणीय ठरला.

गेले काही दिवस दडी मारुन बसलेल्या पावसाला सोमवारपासून सुरुवात झाली. मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून बुधवारी दिवसभर मुसळधार सरींनी ठाणे जिल्ह्याला झोपडून काढले. बुधवारी सायंकाळपासून सोसाट्याचे वारे व कोसळधारांनी तुफान धुमाकूळ घातला. पावसामुळे अनेक झाडे कोसळली, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले. ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी सायंकाळी झालेल्या तुफान वृष्टीने रेल्वे वाहतूक कोलमडल्याने अत्यावश्यक सेवेकरिता मुंबईत गेलेल्या चाकरमान्यांच्या कुटुंबांचा जीव टांगणीला लागला होता.

बुधवारचा दिवस जसा पावसाने गाजवला, तसाच तो अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीकरिता झालेल्या भूमिपूजनामुळे तमाम रामभक्तांमधील उत्साह, जल्लोष यामुळेही लक्षणीय ठरला. अनेक मंदिरांमध्ये सकाळपासून रामरक्षा, हनुमानचालिसा पठण करण्यात आले. चौकाचौकांत श्रीरामाच्या तसबिरीचे पूजन करुन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काही ठिकाणी बाइकरॅली काढण्यात आल्या. अनेकांनी कोरोनाच्या संकटामुळे घरातच पूजाअर्चा करुन राम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त केला.ठाण्यात मोठी पडझडलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्याला मंगळवारी रात्रभर झोडपले. पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड होऊन जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ६६.८ मिमी पाऊस पडला. यादरम्यान ठाणे शहरात १६ झाडे उन्मळून पडली. एका इमारतीची गॅलरी कोसळली, तर कसारा घाटात दरड कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.टोकावडेपासून दोन किलोमीटर अंतरावरील हेदवली गावच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे. माळशेज घाटातील वळणावर मोटारसायकलची ट्रकला धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. कसारा घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने रस्त्यावर मातीचे ढिगारे असून, झाडेही कोसळली आहेत. यातून वाट काढत वाहने पुढे जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.ठाणे शहरात घोडबंदर रोडवरील ओवळा येथे श्रीराम हॉस्पिटलच्या कम्पाऊंडची भिंत एका घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. शहरात १६ पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. घोडबंदर रोडवरील पाटोनपाडा येथील सोसायटीतील आठ दुचाकींवर एक झाड पडले. कळवा येथील मनिषानगरसह शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे शहर व तालुक्यात सर्वाधिक ९३ मिमी पाऊस पडला. या खालोखाल भिवंडीला ९0 मिमी, कल्याणला ३५, मुरबाडला ७0, शहापूरला ३४, उल्हासनगर ४४ आणि अंबरनाथला ७0 मिमी पाऊस पडला. ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात अवघा ८८ मिमी आणि बारवी धरण क्षेत्रात ९३ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.नाल्यात बुडून एकाचा मृत्यूमीरा रोड : मीरा गावठाणमधील गायत्री सोसायटीत राहणारे राकेश हरसोरा (४७) यांचा बुधवारी नाल्यात बुडून मृत्यू झाला. तर वाहून जाणाºया एकाला स्थानिकांनी वाचवले.मीरा गावठाण - महाजनवाडीत डोंगरावरून पाण्याचा मोठा लोंढा येतो. गेले दोन दिवस पडणाºया मुसळधार पावसामुळे मोठ्या नाल्याची भिंत कोसळली व रस्ता खचला. येथील बैठ्या चाळींमध्ये पाणी शिरले आहे. सकाळी दोन रिक्षा आणि दुचाकी नाल्यात वाहून गेल्या. गाडी पकडण्याच्या प्रयत्नात राकेश नाल्यात वाहून गेले. त्यांचा मृतदेह पुढच्या भागात आढळला. वाहून जाणाºया एकास रहिवाशांनी वाचवले.रामनामाचा जल्लोष, दीपोत्सव, फटाक्यांची आतषबाजीकल्याण-डोंबिवलीत घरोघरी उत्साह : बाइक रॅली, प्रतिमा पूजनडोंबिवली : अयोध्येत रामजन्मभूमीच्या भूूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. त्यास कोरोनामुळे अनेकांना हजर राहता न आल्याने शहरातील कारसेवकांनी तसेच रामभक्तांनी रामनामाचा जयघोष करीत घरोघरी रामाच्या प्रतिमेचे पूजन केले. युवकांनी बाइक रॅली काढली, तर भाजपच्या वतीने चौकामध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. ठाकुर्लीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.बुधवारी सकाळी पावसाचा जोर अधिक असल्याने रामभक्तांनी घरी राहून प्रतिमा पूजन केले. संध्याकाळी दीपोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. शहरातील श्री गणेश मंदिर संस्थान, श्री गोविंदानंद श्रीराम मंदिर आदी ठिकाणी राम दरबाराच्या मूर्तींना फुलांनी सजवण्यात आले होते. नागरिकांनी मंगलवेश परिधान करून या सोहळ्याचा आनंद लुटला. गणेश मंदिराला आकर्षक सजावट केली होती. त्या ठिकाणी तीन दिवसांपासून वाल्मिकी रामायणाचे पठण करण्यात आले. सव्वा कोटी रामनाम जपाचा संकल्पही सोडण्यात आला होता.संध्याकाळी दीपोत्सवाचे नियोजन केले होते. रामनामजप, पठणासाठी काही जोडप्यांना बोलावून त्यांना फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करुन हा उपक्रम पार पडल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष राहुल दामले यांनी दिली. एकतानगर येथे भाजपचे पदाधिकारी बाळा पवार यांच्या घरापासून बजरंग दल, संघ स्वयंसेवकांनी बाइक रॅली काढली होती. त्यावेळी रामाचा, हनुमानाचा जयघोष करण्यात आला. ठाकुर्लीतही काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त केला. अनेक कारसेवकांनी घरी रांगोळी काढली, काहींनी कारसेवेला गेले असताना सोबत आणलेल्या जन्मस्थानाच्या ठिकाणच्या दगडाची श्रद्धेने पूजा केली. संघ स्वयंसेवक आणि डोंबिवली इतिहास संकलन समितीचे चंद्रकांत जोशी यांच्या तुकारामनगर, आयरे गाव येथील घरामध्ये त्यांनी पाषाण पूजन केले. सोसायटीसह अन्य स्वयंसवेकांनी जाऊन त्याचे दर्शन घेतले. कल्याणमध्येही साठे बंधू यांच्या घरी राममंदिर सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तेथे २८ सप्टेंबर १९९० रोजी श्रीराम रथयात्रेच्या निमित्ताने लालकृष्ण अडवाणी कल्याणमध्ये आले असता, त्यांना देण्यात आलेली तलवार अजूनही जपून ठेवण्यात आली आहे. त्याचे पूजन करण्यात आले.रामनगरच्या श्रीराम मंदिरामध्ये रामदरबाराचे पूजन करून अभिषेक संपन्न झाला. कोरोनापासून देशाच्या संकटाचे रक्षण करावे, असा संकल्प सोडण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने रामभक्तांनी घरोघरी जप केला आणि विश्वशांतीची प्रार्थना केली. 

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरारRainपाऊस