शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Rain Effect: सहा हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान; परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:44 IST

पंचनामे लवकर करण्याची मागणी

सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यात सध्या सायंकाळी पडणाऱ्या  परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कमीतकमी सध्यातरी पाच ते सहा हजार हेक्टरवरील हाती आलेल्या भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने कापलेला भात त्यात सडून  १५ टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. या पंचनामे वेळीच करून भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत. 

यंदा भातचे उत्तम व दर्जेदार पीक शेतकऱ्यांच्या हाती आले होते. परंतु, अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेल्या भाताला कोंब येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी २९.८ मिमी पाऊस पडला आहे. सहा तालुक्यांमध्ये सर्वाधिक ६४ मिमी पाऊस उल्हासनगर परिसरात नोंदवला असला, तरी कृषी विभागाच्या सर्कलमधील कल्याण अप्परमध्ये ९४ मिमी, मुरबाडच्या देहारीत ७३, अंबरनाथच्या कुंभार्लीच्या माळरानावर ६४, शहापूरच्या खर्डी भागात ४५ मिमी हा अवकाळी पाऊस पडला आहे. यात शेंद्रुण, खर्डी, डोळखांब भागात कापलेला भात वाहून गेल्याचे शेतकरी प्रकाश भांगरथ यांनी सांगितले. यंदा हेक्टरी सरासरी २४ क्विंटल भात  खराब झाला आहे.यंदा ५४,५०० हेक्टरवर हळवे चार टक्के, निमगरवे चार टक्के, गरवे भाताचे पीक १०५ टक्के सर्वसाधारण क्षेत्रावर आहे. त्यात जया, रतना, मसुरी, कर्जत - ७, ३, २, ५, रत्नागिरी ७, ५, २४ व एमटीयू १०१० या भाताच्या जाती महाबीजच्या आहेत. तर कंपन्यांच्या कोमल, सोनम, रुपाली, वायएसआर, मोहिनी, पूनम आदी जातींनी भातशेती बहरली आहे. 

सर्व तालुक्यांत १५ ते २० टक्के भातशेतीचे नुकसानजिल्ह्यात सध्या परतीच्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. कल्याण, मुरबाड तालुक्यांतील भातशेतीच्या नुकसानीची गुरुवारीच पाहणी केली आहे. कापून पडलेला भात साचलेल्या पाण्यात बुडाला आहे. उभा असलेला भात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खाली पडला आहे. सर्व तालुक्यांतील भातशेतीच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेता १५ ते २० टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. यापैकी अंदाजे पाच ते सहा हजार हेक्टरवर लागवड केलेल्या भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व नुकसानीची पाहणी सुरू केलेली आहे. - अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

भरपाई त्वरित मिळावीयावर्षी चांगलं पीक आलं होतं. भात कापून करपे शेतात सुकण्यासाठी टाकले असता झालेल्या जोरदार पावसाने पूर्ण पीक गेले तीन-चार दिवस शेतातच भिजत आहे. आता दाण्यांना कोंब आले आहेत. या नुकसानीची भरपाई मिळाली तरच माझा उदरनिर्वाह होईल. - संतोष लुटे, अघई, ता. शहापूर

पाण्यात भात सडलायंदा भात चांगला आला होता. दाणा ही चांगला टणक भरला होता. त्यामुळे संपूर्ण शेतातील भात कापून ठेवले होते. काही दिवसांत या भाताचा पेंढा बांधणार होताे. मात्र, दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने हा भात सडत आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने वेळीच पंचनामा करून भरपाई द्यावी. तरच  कृषिकर्ज भरता येईल.- नामदेव भोईर, घोराळे, ता. मुरबाड

टॅग्स :Rainपाऊस