शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Rain Effect: सहा हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान; परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:44 IST

पंचनामे लवकर करण्याची मागणी

सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यात सध्या सायंकाळी पडणाऱ्या  परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कमीतकमी सध्यातरी पाच ते सहा हजार हेक्टरवरील हाती आलेल्या भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने कापलेला भात त्यात सडून  १५ टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. या पंचनामे वेळीच करून भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत. 

यंदा भातचे उत्तम व दर्जेदार पीक शेतकऱ्यांच्या हाती आले होते. परंतु, अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेल्या भाताला कोंब येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी २९.८ मिमी पाऊस पडला आहे. सहा तालुक्यांमध्ये सर्वाधिक ६४ मिमी पाऊस उल्हासनगर परिसरात नोंदवला असला, तरी कृषी विभागाच्या सर्कलमधील कल्याण अप्परमध्ये ९४ मिमी, मुरबाडच्या देहारीत ७३, अंबरनाथच्या कुंभार्लीच्या माळरानावर ६४, शहापूरच्या खर्डी भागात ४५ मिमी हा अवकाळी पाऊस पडला आहे. यात शेंद्रुण, खर्डी, डोळखांब भागात कापलेला भात वाहून गेल्याचे शेतकरी प्रकाश भांगरथ यांनी सांगितले. यंदा हेक्टरी सरासरी २४ क्विंटल भात  खराब झाला आहे.यंदा ५४,५०० हेक्टरवर हळवे चार टक्के, निमगरवे चार टक्के, गरवे भाताचे पीक १०५ टक्के सर्वसाधारण क्षेत्रावर आहे. त्यात जया, रतना, मसुरी, कर्जत - ७, ३, २, ५, रत्नागिरी ७, ५, २४ व एमटीयू १०१० या भाताच्या जाती महाबीजच्या आहेत. तर कंपन्यांच्या कोमल, सोनम, रुपाली, वायएसआर, मोहिनी, पूनम आदी जातींनी भातशेती बहरली आहे. 

सर्व तालुक्यांत १५ ते २० टक्के भातशेतीचे नुकसानजिल्ह्यात सध्या परतीच्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. कल्याण, मुरबाड तालुक्यांतील भातशेतीच्या नुकसानीची गुरुवारीच पाहणी केली आहे. कापून पडलेला भात साचलेल्या पाण्यात बुडाला आहे. उभा असलेला भात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खाली पडला आहे. सर्व तालुक्यांतील भातशेतीच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेता १५ ते २० टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. यापैकी अंदाजे पाच ते सहा हजार हेक्टरवर लागवड केलेल्या भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व नुकसानीची पाहणी सुरू केलेली आहे. - अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

भरपाई त्वरित मिळावीयावर्षी चांगलं पीक आलं होतं. भात कापून करपे शेतात सुकण्यासाठी टाकले असता झालेल्या जोरदार पावसाने पूर्ण पीक गेले तीन-चार दिवस शेतातच भिजत आहे. आता दाण्यांना कोंब आले आहेत. या नुकसानीची भरपाई मिळाली तरच माझा उदरनिर्वाह होईल. - संतोष लुटे, अघई, ता. शहापूर

पाण्यात भात सडलायंदा भात चांगला आला होता. दाणा ही चांगला टणक भरला होता. त्यामुळे संपूर्ण शेतातील भात कापून ठेवले होते. काही दिवसांत या भाताचा पेंढा बांधणार होताे. मात्र, दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने हा भात सडत आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने वेळीच पंचनामा करून भरपाई द्यावी. तरच  कृषिकर्ज भरता येईल.- नामदेव भोईर, घोराळे, ता. मुरबाड

टॅग्स :Rainपाऊस