शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील २२ लाख चाकरमान्यांची रेल्वेकडून उपेक्षा; लॉकडाऊनच्या संधीचं सोनं केलं नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 02:28 IST

अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१२ पासून कागदावरच 

अनिकेत घमंडीडोंबिवली : मध्य रेल्वे प्रशासनाला २०१२ पासून सुरू असलेले अनेक प्रकल्प दशकअखेर पूर्ण करून २२ लाख चाकरमानी असलेल्या ठाणे जिल्ह्याला दिलासा देता आलेला नाही. त्यात प्रामुख्याने पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गासह कळवा-ऐरोली लिंक रोडच्या कामाचा समावेश आहे. रेल्वे सेवेवरील ताण हे काही प्रकल्प पूर्ण न होण्याचे कारण दिले जात होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा बंद असल्याचा लाभ घेऊन रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण करणे शक्य होते. मात्र ती संधी रेल्वे प्रशासनाने गमावली आहे.

‘नेमेची येतो मग पावसाळा’ यासारखेच आगामी वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या तोंडावर आतापर्यंतच्या प्रकल्पांचा आढावा घेता प्रवाशांच्या पदरी केवळ निराशाच येणार आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून भारतभर रेल्वे बंद झाली. सामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी उपनगरीय लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मुंबई परिसरात सुरू झाली असली तरीही गेले आठ महिने राज्य, केंद्र, रेल्वे प्रशासन यांच्यातील वैचारिक संघर्षात सामान्यांना मात्र २६ जानेवारीपर्यंत लोकल सेवा सुरू झालेली नाही. हजारो नागरिकांना वेळखाऊ रस्ते वाहतुकीच्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र तरीही रखडलेले प्रकल्प मार्गी लागलेले नाहीत. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन या संस्थेसह रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पण दोन्ही यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असल्याने संवादाच्या अभावी प्रवाशांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याचे वास्तव आहे.             

रेल्वेद्वारे ‘मालवाहतूक’ सुरू असल्याने २३ मार्च ते १७ डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने ७.७१ लाख वॅगन्समधून ४०.८५ दशलक्ष टन मालवाहतूक व १.७६ लाख टन पार्सल वस्तूंची वाहतूक केली. त्यामध्ये भिवंडी रोड येथील गुड्पार्सल या नव्या प्रकल्पाचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रवासी नसले तरी रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसलेला नाही.

गर्दी विभागण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल नाहीचसुमारे ४२५ कोटी रुपये खर्चाचा बदलापूर, टिटवाळा येथून मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या १५ डबा लोकलचा प्रस्ताव रेल्वे दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोपर, अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव स्थानकातील होम प्लॅटफॉर्मची कामे रेंगाळलेली आहेत. २०१२ मध्ये माजी खासदार आनंद परांजपेंच्या मागणीने सुरू झालेल्या लोकल फेरीत ८ वर्षात अवघा एक रेक वाढवण्यात आला.

पाचव्या-सहावा ट्रॅक कधी पूर्ण होणार?ठाणे-दिवा पाचवी-सहावी लाइन  २०१४ पासून खोळंबलेली असल्याने कल्याण-ठाणे भागात चाकरमान्यांच्या लोकलमधील गर्दीमुळे पडून अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच या पट्ट्यात रूळ ओलांडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही चिंताजनक आहे.

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या