शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील २२ लाख चाकरमान्यांची रेल्वेकडून उपेक्षा; लॉकडाऊनच्या संधीचं सोनं केलं नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 02:28 IST

अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१२ पासून कागदावरच 

अनिकेत घमंडीडोंबिवली : मध्य रेल्वे प्रशासनाला २०१२ पासून सुरू असलेले अनेक प्रकल्प दशकअखेर पूर्ण करून २२ लाख चाकरमानी असलेल्या ठाणे जिल्ह्याला दिलासा देता आलेला नाही. त्यात प्रामुख्याने पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गासह कळवा-ऐरोली लिंक रोडच्या कामाचा समावेश आहे. रेल्वे सेवेवरील ताण हे काही प्रकल्प पूर्ण न होण्याचे कारण दिले जात होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा बंद असल्याचा लाभ घेऊन रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण करणे शक्य होते. मात्र ती संधी रेल्वे प्रशासनाने गमावली आहे.

‘नेमेची येतो मग पावसाळा’ यासारखेच आगामी वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या तोंडावर आतापर्यंतच्या प्रकल्पांचा आढावा घेता प्रवाशांच्या पदरी केवळ निराशाच येणार आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून भारतभर रेल्वे बंद झाली. सामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी उपनगरीय लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मुंबई परिसरात सुरू झाली असली तरीही गेले आठ महिने राज्य, केंद्र, रेल्वे प्रशासन यांच्यातील वैचारिक संघर्षात सामान्यांना मात्र २६ जानेवारीपर्यंत लोकल सेवा सुरू झालेली नाही. हजारो नागरिकांना वेळखाऊ रस्ते वाहतुकीच्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र तरीही रखडलेले प्रकल्प मार्गी लागलेले नाहीत. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन या संस्थेसह रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पण दोन्ही यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असल्याने संवादाच्या अभावी प्रवाशांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याचे वास्तव आहे.             

रेल्वेद्वारे ‘मालवाहतूक’ सुरू असल्याने २३ मार्च ते १७ डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने ७.७१ लाख वॅगन्समधून ४०.८५ दशलक्ष टन मालवाहतूक व १.७६ लाख टन पार्सल वस्तूंची वाहतूक केली. त्यामध्ये भिवंडी रोड येथील गुड्पार्सल या नव्या प्रकल्पाचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रवासी नसले तरी रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसलेला नाही.

गर्दी विभागण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल नाहीचसुमारे ४२५ कोटी रुपये खर्चाचा बदलापूर, टिटवाळा येथून मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या १५ डबा लोकलचा प्रस्ताव रेल्वे दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोपर, अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव स्थानकातील होम प्लॅटफॉर्मची कामे रेंगाळलेली आहेत. २०१२ मध्ये माजी खासदार आनंद परांजपेंच्या मागणीने सुरू झालेल्या लोकल फेरीत ८ वर्षात अवघा एक रेक वाढवण्यात आला.

पाचव्या-सहावा ट्रॅक कधी पूर्ण होणार?ठाणे-दिवा पाचवी-सहावी लाइन  २०१४ पासून खोळंबलेली असल्याने कल्याण-ठाणे भागात चाकरमान्यांच्या लोकलमधील गर्दीमुळे पडून अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच या पट्ट्यात रूळ ओलांडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही चिंताजनक आहे.

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या