शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

ठाणे जिल्ह्यातील २२ लाख चाकरमान्यांची रेल्वेकडून उपेक्षा; लॉकडाऊनच्या संधीचं सोनं केलं नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 02:28 IST

अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१२ पासून कागदावरच 

अनिकेत घमंडीडोंबिवली : मध्य रेल्वे प्रशासनाला २०१२ पासून सुरू असलेले अनेक प्रकल्प दशकअखेर पूर्ण करून २२ लाख चाकरमानी असलेल्या ठाणे जिल्ह्याला दिलासा देता आलेला नाही. त्यात प्रामुख्याने पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गासह कळवा-ऐरोली लिंक रोडच्या कामाचा समावेश आहे. रेल्वे सेवेवरील ताण हे काही प्रकल्प पूर्ण न होण्याचे कारण दिले जात होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा बंद असल्याचा लाभ घेऊन रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण करणे शक्य होते. मात्र ती संधी रेल्वे प्रशासनाने गमावली आहे.

‘नेमेची येतो मग पावसाळा’ यासारखेच आगामी वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या तोंडावर आतापर्यंतच्या प्रकल्पांचा आढावा घेता प्रवाशांच्या पदरी केवळ निराशाच येणार आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून भारतभर रेल्वे बंद झाली. सामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी उपनगरीय लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मुंबई परिसरात सुरू झाली असली तरीही गेले आठ महिने राज्य, केंद्र, रेल्वे प्रशासन यांच्यातील वैचारिक संघर्षात सामान्यांना मात्र २६ जानेवारीपर्यंत लोकल सेवा सुरू झालेली नाही. हजारो नागरिकांना वेळखाऊ रस्ते वाहतुकीच्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र तरीही रखडलेले प्रकल्प मार्गी लागलेले नाहीत. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन या संस्थेसह रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पण दोन्ही यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असल्याने संवादाच्या अभावी प्रवाशांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याचे वास्तव आहे.             

रेल्वेद्वारे ‘मालवाहतूक’ सुरू असल्याने २३ मार्च ते १७ डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने ७.७१ लाख वॅगन्समधून ४०.८५ दशलक्ष टन मालवाहतूक व १.७६ लाख टन पार्सल वस्तूंची वाहतूक केली. त्यामध्ये भिवंडी रोड येथील गुड्पार्सल या नव्या प्रकल्पाचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रवासी नसले तरी रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसलेला नाही.

गर्दी विभागण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल नाहीचसुमारे ४२५ कोटी रुपये खर्चाचा बदलापूर, टिटवाळा येथून मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या १५ डबा लोकलचा प्रस्ताव रेल्वे दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोपर, अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव स्थानकातील होम प्लॅटफॉर्मची कामे रेंगाळलेली आहेत. २०१२ मध्ये माजी खासदार आनंद परांजपेंच्या मागणीने सुरू झालेल्या लोकल फेरीत ८ वर्षात अवघा एक रेक वाढवण्यात आला.

पाचव्या-सहावा ट्रॅक कधी पूर्ण होणार?ठाणे-दिवा पाचवी-सहावी लाइन  २०१४ पासून खोळंबलेली असल्याने कल्याण-ठाणे भागात चाकरमान्यांच्या लोकलमधील गर्दीमुळे पडून अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच या पट्ट्यात रूळ ओलांडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही चिंताजनक आहे.

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या