शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांकडून रेल्वेला दोन हजार कोटींचा हप्ता मिळतो - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 05:53 IST

गुजरातमध्ये भाजपाने 150 हून अधिक जागा जिंकल्यास ईव्हीएम मशीनचा वाटा सर्वात मोठा असेल असे राज म्हणाले. 

ठळक मुद्देफेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता मिळतो असा आरोपही त्यांनी केला. . देशाची अर्थव्यवस्था गर्भगळीत झालीय. जीएसटी, नोटाबंदीची काय गरज होती ?

डोंबिवली : फेरीवाल्यांना हटवा, असे मी सातत्याने सांगत होतो. पण माझ्या मनसेच्या मुलांनी ते करून दाखवल्यावर प्रशासनाला जाग आली आणि एका दिवसात स्टेशन परिसर मोकळे होऊ शकतात, हे दिसून आले. पण फेरीवाले हटवण्याची सत्ताधारी पक्षाची इच्छाच नाही. कारण त्यांच्याकडून वर्षाला दोन हजार कोटींचा हप्ता मिळतो. फेरीवाले हटवण्यासाठी ३० आॅक्टोबरची मुदत दिली आहे, ती पाळली नाही तर पुन्हा आमचा इंगा आम्ही दाखवू, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिला.कल्याण-डोेंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी, नागरिकांसोबतच्या संवादानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुम्ही हटवल्यानंतर पुन्हा फेरीवाले बसल्याचा मुद्दा लक्षात आणून दिल्यावर तुम्ही मुख्यमंत्र्यांना, सत्ताधा-यांना जाब विचारायला हवा. मनसेच्या आंदोलनानंतर फेरीवाले हटले. नागरिकांना मोकळे रस्ते मिळाले. गर्दी कमी झाली. असे असताना त्याचे श्रेय मनसेला न देता फेरीवाले पुन्हा येऊन बसल्याचे प्रश्न मला का विचारता, असा उलट सवाल त्यांनी केला. फेरीवाले हटविणे हे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. पण त्यांच्यात इच्छाशक्तीच नाही. सत्ताधाºयांची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला.सरकारच्या ‘अच्छे दिना’ची खिल्ली उडवून गुजरातमध्ये भाजपापेक्षा काँग्रेसला ‘अच्छे दिन’ असल्याचा दावा त्यांनी केला. मोदींच्या २०१४ मधील विजयात राहुल गांधींचा ५० टक्के, सोशल मीडिया व मीडियाचा २५ टक्के, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १० टक्के आणि उरलेला सहभाग मोदींचा आहे. पण आता त्यांच्या भाषणातून गर्दी उठून जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी आणि भाजपाच्या आहारी गेल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. परप्रांतीयांचे वाढलेले लोंढे, बांगलादेशींचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला, जेव्हा हे लोंढे अंगावर येतील तेव्हा तुम्हाला आमची आठवण येईल, असा दावा त्यांनी केला. सोशल मीडियावर निर्बंध घालण्याच्या भाजपाच्या पावित्र्यावर त्यांनी टीका केली, या मीडियाचा तुम्हाला फायदा होत होता, तेव्हा तुम्ही त्याला पाठिंबा दिला आता बंदीची भाषा करता? भाजपाला टीका सहन होत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.>‘वांद्रे येथील आग लावलेली’मुंबईत वांद्रे येथील आग ही कच्ची बांधकामे पक्की करण्यासाठी लावलेली होती, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. बांगलादेशी व मोहल्ले वाढवून हिंदुत्वाच्या पोकळ बाता करायच्या, अशी टीका त्यांनी भाजपा, शिवसेनेचे नाव न घेता केली. यांच्याच काळात हे मोहल्ले वाढले. पण प्रत्येक गोष्ट करताना मतदान म्हणून त्याकडे बघायचे आणि निवडणुकीत मते मागण्यासाठी हिंदुत्वाचा आधार घ्यायचा, ही लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे