शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

फेरीवाल्यांकडून रेल्वेला दोन हजार कोटींचा हप्ता मिळतो - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 05:53 IST

गुजरातमध्ये भाजपाने 150 हून अधिक जागा जिंकल्यास ईव्हीएम मशीनचा वाटा सर्वात मोठा असेल असे राज म्हणाले. 

ठळक मुद्देफेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता मिळतो असा आरोपही त्यांनी केला. . देशाची अर्थव्यवस्था गर्भगळीत झालीय. जीएसटी, नोटाबंदीची काय गरज होती ?

डोंबिवली : फेरीवाल्यांना हटवा, असे मी सातत्याने सांगत होतो. पण माझ्या मनसेच्या मुलांनी ते करून दाखवल्यावर प्रशासनाला जाग आली आणि एका दिवसात स्टेशन परिसर मोकळे होऊ शकतात, हे दिसून आले. पण फेरीवाले हटवण्याची सत्ताधारी पक्षाची इच्छाच नाही. कारण त्यांच्याकडून वर्षाला दोन हजार कोटींचा हप्ता मिळतो. फेरीवाले हटवण्यासाठी ३० आॅक्टोबरची मुदत दिली आहे, ती पाळली नाही तर पुन्हा आमचा इंगा आम्ही दाखवू, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिला.कल्याण-डोेंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी, नागरिकांसोबतच्या संवादानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुम्ही हटवल्यानंतर पुन्हा फेरीवाले बसल्याचा मुद्दा लक्षात आणून दिल्यावर तुम्ही मुख्यमंत्र्यांना, सत्ताधा-यांना जाब विचारायला हवा. मनसेच्या आंदोलनानंतर फेरीवाले हटले. नागरिकांना मोकळे रस्ते मिळाले. गर्दी कमी झाली. असे असताना त्याचे श्रेय मनसेला न देता फेरीवाले पुन्हा येऊन बसल्याचे प्रश्न मला का विचारता, असा उलट सवाल त्यांनी केला. फेरीवाले हटविणे हे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. पण त्यांच्यात इच्छाशक्तीच नाही. सत्ताधाºयांची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला.सरकारच्या ‘अच्छे दिना’ची खिल्ली उडवून गुजरातमध्ये भाजपापेक्षा काँग्रेसला ‘अच्छे दिन’ असल्याचा दावा त्यांनी केला. मोदींच्या २०१४ मधील विजयात राहुल गांधींचा ५० टक्के, सोशल मीडिया व मीडियाचा २५ टक्के, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १० टक्के आणि उरलेला सहभाग मोदींचा आहे. पण आता त्यांच्या भाषणातून गर्दी उठून जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी आणि भाजपाच्या आहारी गेल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. परप्रांतीयांचे वाढलेले लोंढे, बांगलादेशींचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला, जेव्हा हे लोंढे अंगावर येतील तेव्हा तुम्हाला आमची आठवण येईल, असा दावा त्यांनी केला. सोशल मीडियावर निर्बंध घालण्याच्या भाजपाच्या पावित्र्यावर त्यांनी टीका केली, या मीडियाचा तुम्हाला फायदा होत होता, तेव्हा तुम्ही त्याला पाठिंबा दिला आता बंदीची भाषा करता? भाजपाला टीका सहन होत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.>‘वांद्रे येथील आग लावलेली’मुंबईत वांद्रे येथील आग ही कच्ची बांधकामे पक्की करण्यासाठी लावलेली होती, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. बांगलादेशी व मोहल्ले वाढवून हिंदुत्वाच्या पोकळ बाता करायच्या, अशी टीका त्यांनी भाजपा, शिवसेनेचे नाव न घेता केली. यांच्याच काळात हे मोहल्ले वाढले. पण प्रत्येक गोष्ट करताना मतदान म्हणून त्याकडे बघायचे आणि निवडणुकीत मते मागण्यासाठी हिंदुत्वाचा आधार घ्यायचा, ही लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे