शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांकडून रेल्वेला दोन हजार कोटींचा हप्ता मिळतो - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 05:53 IST

गुजरातमध्ये भाजपाने 150 हून अधिक जागा जिंकल्यास ईव्हीएम मशीनचा वाटा सर्वात मोठा असेल असे राज म्हणाले. 

ठळक मुद्देफेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता मिळतो असा आरोपही त्यांनी केला. . देशाची अर्थव्यवस्था गर्भगळीत झालीय. जीएसटी, नोटाबंदीची काय गरज होती ?

डोंबिवली : फेरीवाल्यांना हटवा, असे मी सातत्याने सांगत होतो. पण माझ्या मनसेच्या मुलांनी ते करून दाखवल्यावर प्रशासनाला जाग आली आणि एका दिवसात स्टेशन परिसर मोकळे होऊ शकतात, हे दिसून आले. पण फेरीवाले हटवण्याची सत्ताधारी पक्षाची इच्छाच नाही. कारण त्यांच्याकडून वर्षाला दोन हजार कोटींचा हप्ता मिळतो. फेरीवाले हटवण्यासाठी ३० आॅक्टोबरची मुदत दिली आहे, ती पाळली नाही तर पुन्हा आमचा इंगा आम्ही दाखवू, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिला.कल्याण-डोेंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी, नागरिकांसोबतच्या संवादानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुम्ही हटवल्यानंतर पुन्हा फेरीवाले बसल्याचा मुद्दा लक्षात आणून दिल्यावर तुम्ही मुख्यमंत्र्यांना, सत्ताधा-यांना जाब विचारायला हवा. मनसेच्या आंदोलनानंतर फेरीवाले हटले. नागरिकांना मोकळे रस्ते मिळाले. गर्दी कमी झाली. असे असताना त्याचे श्रेय मनसेला न देता फेरीवाले पुन्हा येऊन बसल्याचे प्रश्न मला का विचारता, असा उलट सवाल त्यांनी केला. फेरीवाले हटविणे हे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. पण त्यांच्यात इच्छाशक्तीच नाही. सत्ताधाºयांची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला.सरकारच्या ‘अच्छे दिना’ची खिल्ली उडवून गुजरातमध्ये भाजपापेक्षा काँग्रेसला ‘अच्छे दिन’ असल्याचा दावा त्यांनी केला. मोदींच्या २०१४ मधील विजयात राहुल गांधींचा ५० टक्के, सोशल मीडिया व मीडियाचा २५ टक्के, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १० टक्के आणि उरलेला सहभाग मोदींचा आहे. पण आता त्यांच्या भाषणातून गर्दी उठून जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी आणि भाजपाच्या आहारी गेल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. परप्रांतीयांचे वाढलेले लोंढे, बांगलादेशींचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला, जेव्हा हे लोंढे अंगावर येतील तेव्हा तुम्हाला आमची आठवण येईल, असा दावा त्यांनी केला. सोशल मीडियावर निर्बंध घालण्याच्या भाजपाच्या पावित्र्यावर त्यांनी टीका केली, या मीडियाचा तुम्हाला फायदा होत होता, तेव्हा तुम्ही त्याला पाठिंबा दिला आता बंदीची भाषा करता? भाजपाला टीका सहन होत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.>‘वांद्रे येथील आग लावलेली’मुंबईत वांद्रे येथील आग ही कच्ची बांधकामे पक्की करण्यासाठी लावलेली होती, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. बांगलादेशी व मोहल्ले वाढवून हिंदुत्वाच्या पोकळ बाता करायच्या, अशी टीका त्यांनी भाजपा, शिवसेनेचे नाव न घेता केली. यांच्याच काळात हे मोहल्ले वाढले. पण प्रत्येक गोष्ट करताना मतदान म्हणून त्याकडे बघायचे आणि निवडणुकीत मते मागण्यासाठी हिंदुत्वाचा आधार घ्यायचा, ही लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे