शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

रेल्वे समांतर रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींना प्रवासी संघटनेचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 14:35 IST

ठाणे-कल्याण रेल्वे समांतर रस्त्याची मागणी रेल्वेच्या प्रत्येक खोळंब्यानंतर समोर येत असून तो मार्ग तातडीने तयार करावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली

डोंबिवली - मध्य रेल्वे प्रशासनाचे रडगाणे हे प्रवाशांसाठी नवे नाही. कधी रुळाला तडा, कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड, कधी ओव्हरहेड वायर तुटणे, कधी रुळावर पाणी, कधी अपघात तर कधी संप या अशा अनेक कारणांमुळे रेल्वेचा खोळंबा होत असतो. या सर्वाचा सर्वाधिक फटका ठाण्याच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांना अधिक बसतो. मुंब्रा स्थानक सोडल्यास पुढे दिवा स्थानक आणि त्या पुढे जाण्यास अन्य सोईस्कर मार्गच उपलब्ध नाही. जे अन्य मार्ग आहेत ते अधिक वेळ काढू आणि खर्चिक असल्याने प्रवाशांकडून त्याचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. 

ठाणे-कल्याण रेल्वे समांतर रस्त्याची मागणी रेल्वेच्या प्रत्येक खोळंब्यानंतर समोर येत असून तो मार्ग तातडीने तयार करावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. 

मध्य रेल्वे रखडल्यानंतर दिवा, डोंबिवली आणि त्या पुढील प्रवाशांना अन्य मार्ग उपल्बध नसल्याने त्यांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी वेळेत पोहचणे शक्य होत नाही. अशातच रेल्वेची उद्घोषणा व इंडिकेटर सुविधा वेळेवर होत नसल्याने खोळंबलेल्या प्रवाशांचा अधिक उद्रेक होतो. दिवा स्थानकात झालेले प्रवासी आंदोलन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या आंदोलनामुळे मध्य रेल्वे सेवा संपूर्ण एक दिवस बंद पडली होती. दिवा स्थानकात झालेल्या आंदोलनानंतर टिटवाळा, आसनगाव अशा इतर स्थानकात देखील आंदोलने झाली. या सर्व आंदोलनामागे सातत्याने रेल्वेचा होणारा खोळंबा आणि अन्य पर्यायांची नसलेली उपलब्धता, हेच प्रमुख कारण होते.

ठाणे कल्याण समांतर रस्ता या बहुचर्चित विषयाला खरी बगल ही जलवाहतूक सेवा या नवीन विषयामुळे. ही जलवाहतूक सेवा जरी लोकउपयोगी असली तरी रेल्वे प्रवाशांच्या या समस्येवर तोडगा काढणारी निश्चितच नाही. त्यामुळे समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.

आज देशाच्या दुर्गम भागात रस्ते वा दळणवळणाच्या अन्य सुविधा पोहचवण्याचे काम आपण यशस्वीपणे पार पाडत आहात. पण हातावर पोट घेऊन जगणारे चाकरमानी आणि पगार कापला जाईल या भितीने जीवाची पर्वा न करता लटकत जाणारे रेल्वे प्रवासी यांच्या करिता आता अन्य मार्ग शोधणे गरजेचे आहे. ठाणे कल्याण रेल्वे समांतर रस्ता हा मोठा पर्याय आहे असे आम्हाला वाटते. या विषयातील आपली सकारात्मक भूमिका आम्हा लाखो प्रवाशांसाठी नवसंजीवनी ठरेल यात तीळ मात्र शंका नाही. कृपया सहकार्य करावे असेही भगत यांनी पत्रात नमूद केलं आहे.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेNitin Gadkariनितीन गडकरीlocalलोकलthaneठाणे