शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

रेल्वे समांतर रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींना प्रवासी संघटनेचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 14:35 IST

ठाणे-कल्याण रेल्वे समांतर रस्त्याची मागणी रेल्वेच्या प्रत्येक खोळंब्यानंतर समोर येत असून तो मार्ग तातडीने तयार करावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली

डोंबिवली - मध्य रेल्वे प्रशासनाचे रडगाणे हे प्रवाशांसाठी नवे नाही. कधी रुळाला तडा, कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड, कधी ओव्हरहेड वायर तुटणे, कधी रुळावर पाणी, कधी अपघात तर कधी संप या अशा अनेक कारणांमुळे रेल्वेचा खोळंबा होत असतो. या सर्वाचा सर्वाधिक फटका ठाण्याच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांना अधिक बसतो. मुंब्रा स्थानक सोडल्यास पुढे दिवा स्थानक आणि त्या पुढे जाण्यास अन्य सोईस्कर मार्गच उपलब्ध नाही. जे अन्य मार्ग आहेत ते अधिक वेळ काढू आणि खर्चिक असल्याने प्रवाशांकडून त्याचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. 

ठाणे-कल्याण रेल्वे समांतर रस्त्याची मागणी रेल्वेच्या प्रत्येक खोळंब्यानंतर समोर येत असून तो मार्ग तातडीने तयार करावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. 

मध्य रेल्वे रखडल्यानंतर दिवा, डोंबिवली आणि त्या पुढील प्रवाशांना अन्य मार्ग उपल्बध नसल्याने त्यांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी वेळेत पोहचणे शक्य होत नाही. अशातच रेल्वेची उद्घोषणा व इंडिकेटर सुविधा वेळेवर होत नसल्याने खोळंबलेल्या प्रवाशांचा अधिक उद्रेक होतो. दिवा स्थानकात झालेले प्रवासी आंदोलन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या आंदोलनामुळे मध्य रेल्वे सेवा संपूर्ण एक दिवस बंद पडली होती. दिवा स्थानकात झालेल्या आंदोलनानंतर टिटवाळा, आसनगाव अशा इतर स्थानकात देखील आंदोलने झाली. या सर्व आंदोलनामागे सातत्याने रेल्वेचा होणारा खोळंबा आणि अन्य पर्यायांची नसलेली उपलब्धता, हेच प्रमुख कारण होते.

ठाणे कल्याण समांतर रस्ता या बहुचर्चित विषयाला खरी बगल ही जलवाहतूक सेवा या नवीन विषयामुळे. ही जलवाहतूक सेवा जरी लोकउपयोगी असली तरी रेल्वे प्रवाशांच्या या समस्येवर तोडगा काढणारी निश्चितच नाही. त्यामुळे समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.

आज देशाच्या दुर्गम भागात रस्ते वा दळणवळणाच्या अन्य सुविधा पोहचवण्याचे काम आपण यशस्वीपणे पार पाडत आहात. पण हातावर पोट घेऊन जगणारे चाकरमानी आणि पगार कापला जाईल या भितीने जीवाची पर्वा न करता लटकत जाणारे रेल्वे प्रवासी यांच्या करिता आता अन्य मार्ग शोधणे गरजेचे आहे. ठाणे कल्याण रेल्वे समांतर रस्ता हा मोठा पर्याय आहे असे आम्हाला वाटते. या विषयातील आपली सकारात्मक भूमिका आम्हा लाखो प्रवाशांसाठी नवसंजीवनी ठरेल यात तीळ मात्र शंका नाही. कृपया सहकार्य करावे असेही भगत यांनी पत्रात नमूद केलं आहे.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेNitin Gadkariनितीन गडकरीlocalलोकलthaneठाणे