शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मनसेच्या आंदोलनावर रेल्वे प्रवासी संघटनांची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 19:39 IST

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास जीवघेणा झाला असून कोणालाही उलट्या दिशेने प्रवास करण्याची इच्छा नाही.

डोंबिवली: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास जीवघेणा झाला असून कोणालाही उलट्या दिशेने प्रवास करण्याची इच्छा नाही. त्यात वेळ जातो, पाससाठी पैसे जातात पण पर्यायाअभावी तसे करावे लागते, असे सांगत तेजस्वीनी महिला प्रवासी संघटनेने मनसेच्या आंदोलनाला विरोध केला. प्रवाशांना वेठीस धरून केल्या जाणा-या आंदोलनाला महिला प्रवासी संघटना कधीही समर्थन करणार नसून सामंजस्याने, चर्चेने समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.उलट दिशेने प्रवास करणा-या प्रवाशांचे समर्थन नाही, पण त्यांना असलेल्या अडचणी जाणून घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी आंदोलन केले त्यांनी आधी प्रवाशांशी चर्चा करावी, त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात. त्या सोडवण्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे, रेल्वे प्रशासनासह पोलीस यंत्रणेला कार्यवाहीसाठी भाग पाडणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया अध्यक्षा लता अरगडे यांनी व्यक्त केली. ज्यांच्या वयाची ३५/४० वर्षे झाली आहेत, अशा महिलांसह पुरुषांना गर्दीच्या स्थानकांमधून प्रवास करताना अनंत अडचणी आहेत. त्यामुळे त्यातील काही प्रमाणात प्रवासी डाऊन अप अशा उलट्या प्रवासाचा तोडगा स्वीकारतात. त्यामुळे आंदोलन करणे हा उपाय नाही, तर सामंजस्याने समस्या सोडवण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.केवळ अंबरनाथ स्थानकातील ही समस्या नसून ठाणे, कळवा, दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याणसह बदलापूर, टिटवाळा आदी स्थानकांमध्ये तसेच पश्चिम रेल्वेच्या लांबच्या गाड्यांमध्ये असा प्रवास केला जातो. डोंबिवली स्थानकातून सकाळच्या वेळेत प्रवास करताना प्रचंड हाल होतात. पण तरीही येथील प्रवासी कोपर, दिव्यापासून आलेल्या प्रवाशांसोबत बंधूभावानेच वागतात. त्यामुळे तो पर्याय नसून गाड्या वाढवणे, तसेच डब्यांमध्ये काही जागा या संबंधित स्थानकांमधील प्रवाशांना देणे असे विविध पर्याय असू शकतात. कल्याणच्या प्रवाशांनी असा तोडगा काढला असल्याचे त्यांनी सांगितले.

  •  यासंदर्भात प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, मनसेचे रेल्वे विषय प्रमुख जितू पाटील यांना संपर्क साधून पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनाही हे आंदोलन होणे अपेक्षित नसेलच, त्यामुळे संघटनांच्या भावना पोहोचवा असेही आवाहन केले.
  • प्रवाशांना वेठीस धरणे उचित नाहीच, सहप्रवासी म्हणुन सगळयांना सांभाळून घेणे आवश्यक आहे. सामंजस्याची भूमिका महत्वाची आहे. प्रवाशांनी ठिकठिकाणच्या संघटनांकडे यावे सगळे मिळून सुवर्णमध्य काढू - राजेश घनघाव, अध्यक्ष के३ संघटना
  • बदलापूरच्या प्रवाशांनाही अनेक समस्या आहेत, त्या स्थानकातून सुटणा-या लोकलमध्येही ठिकठिकाणाहून प्रवासी येतात, पण म्हणुन काही त्यांच्यावर कारवाई करावी असा पवित्रा योग्य नाहीच. त्यामुळे आंदोलनाचे समर्थन नाहीच - संजय मेस्त्री, बदलापूर
  • आंदोलनाचा विषय नसून प्रबोधनाचा विषय आहे, प्रवाशांच्या भावना समजून घेणे आहे. पास काढणा-यांना आपण रोखू शकत नाही. तिकिट नसणा-यांना रोखणे योग्य पण नाहक प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही - अ‍ॅड.आदेश भगत, सदस्य, डिआरयुसीसी, मध्य रेल्वे