शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा धडकणार ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 07:48 IST

ठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा मार्च महिन्यात ठाण्यात धडकणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, त्याचे नियोजन केले जात आहे. ठाण्यातील विविध भागांतून ही न्याय यात्रा जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने प्रथमच ठाण्यात येत आहेत.  ठाणे जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथून खासदार, आमदार, महापौर काँग्रेसचे झाले आहेत. परंतु, मागील काही वर्षांत ठाण्यासह जिल्ह्यात काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. ठाणे पालिकेतही काँग्रेसचे तीनच नगरसेवक आहेत. तर जिल्ह्यातही काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. परंतु, आता राहुल गांधी यांच्या यात्रेनिमित्ताने ठाणे काँग्रेसला उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.  राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १२ मार्च रोजी ठाण्यात धडकणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार यासंदर्भात बुधवारी यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा मार्च महिन्यात ठाण्यात धडकणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, त्याचे नियोजन केले जात आहे. ठाण्यातील विविध भागांतून ही न्याय यात्रा जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने प्रथमच ठाण्यात येत आहेत. 

ठाणे जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथून खासदार, आमदार, महापौर काँग्रेसचे झाले आहेत. परंतु, मागील काही वर्षांत ठाण्यासह जिल्ह्यात काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. ठाणे पालिकेतही काँग्रेसचे तीनच नगरसेवक आहेत. तर जिल्ह्यातही काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. परंतु, आता राहुल गांधी यांच्या यात्रेनिमित्ताने ठाणे काँग्रेसला उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १२ मार्च रोजी ठाण्यात धडकणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार यासंदर्भात बुधवारी यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक झाली. 

ही यात्रा ठाण्यातील कोणकोणत्या भागातून नेणे अपेक्षित आहे, त्याचेही नियोजन आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार ठाण्यातील कळवा, खारेगाव, शहरी भाग, कॅडबरी, रेमंड आदी भागांतून ही यात्रा घोडबंदर मार्गे पुढे जाणार असल्याचेही सांगितले जाते.इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे दौरेयापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी साधारणपणे १९७६ - ७७ च्या आसपास ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर १९८० च्या सुमारास राजीव गांधी यांनीही आमदारकीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर गांधी घराण्यातील एकही व्यक्ती ठाण्यात आलेली नाही. राहुल गांधी हे कोर्ट केसनिमित्ताने भिवंडीला येऊन गेले आहेत. परंतु, ठाण्यात ते प्रथमच येत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस