शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा धडकणार ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 07:48 IST

ठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा मार्च महिन्यात ठाण्यात धडकणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, त्याचे नियोजन केले जात आहे. ठाण्यातील विविध भागांतून ही न्याय यात्रा जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने प्रथमच ठाण्यात येत आहेत.  ठाणे जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथून खासदार, आमदार, महापौर काँग्रेसचे झाले आहेत. परंतु, मागील काही वर्षांत ठाण्यासह जिल्ह्यात काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. ठाणे पालिकेतही काँग्रेसचे तीनच नगरसेवक आहेत. तर जिल्ह्यातही काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. परंतु, आता राहुल गांधी यांच्या यात्रेनिमित्ताने ठाणे काँग्रेसला उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.  राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १२ मार्च रोजी ठाण्यात धडकणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार यासंदर्भात बुधवारी यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा मार्च महिन्यात ठाण्यात धडकणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, त्याचे नियोजन केले जात आहे. ठाण्यातील विविध भागांतून ही न्याय यात्रा जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने प्रथमच ठाण्यात येत आहेत. 

ठाणे जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथून खासदार, आमदार, महापौर काँग्रेसचे झाले आहेत. परंतु, मागील काही वर्षांत ठाण्यासह जिल्ह्यात काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. ठाणे पालिकेतही काँग्रेसचे तीनच नगरसेवक आहेत. तर जिल्ह्यातही काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. परंतु, आता राहुल गांधी यांच्या यात्रेनिमित्ताने ठाणे काँग्रेसला उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १२ मार्च रोजी ठाण्यात धडकणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार यासंदर्भात बुधवारी यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक झाली. 

ही यात्रा ठाण्यातील कोणकोणत्या भागातून नेणे अपेक्षित आहे, त्याचेही नियोजन आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार ठाण्यातील कळवा, खारेगाव, शहरी भाग, कॅडबरी, रेमंड आदी भागांतून ही यात्रा घोडबंदर मार्गे पुढे जाणार असल्याचेही सांगितले जाते.इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे दौरेयापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी साधारणपणे १९७६ - ७७ च्या आसपास ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर १९८० च्या सुमारास राजीव गांधी यांनीही आमदारकीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर गांधी घराण्यातील एकही व्यक्ती ठाण्यात आलेली नाही. राहुल गांधी हे कोर्ट केसनिमित्ताने भिवंडीला येऊन गेले आहेत. परंतु, ठाण्यात ते प्रथमच येत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस