शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा- आरिफ नसीम खान

By नितीन पंडित | Updated: March 13, 2024 19:55 IST

"भाजपाचे केंद्रातील सरकारने दहा वर्षात विकासाच्या नावाखाली विनाश केला आहे"

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: देशातील लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली असून निवडणुकीची वेळ असली तरी राहुल गांधी यांनी तीन वर्षांपासून देशात न्याय यात्रेचा प्रयोग केला आहे, तो या देशाला एकजूट ठेवण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी आहे.देशातील लोकांसमोर प्रश्न आहे देशाची लोकशाही वाचणार की नाही. देशात बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.तरुण महिला शेतकरी उद्योजक या सर्व वर्गासमोर प्रश्न उभा आहे.भाजपाचे केंद्रातील सरकारने दहा वर्षात विकासाच्या नावाखाली विनाश केला आहे. खोटे बोलतात रेटून बोलतात वस्तुस्थिती कोणी समोर ठेवत नाही ,खरी माहिती जनतेसमोर ठेऊन जनतेने त्यावर विचार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान यांनी दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १५ मार्च रोजी दुपारी दोन वाजता भिवंडी तालुक्यात दाखल होणार असून १५ मार्च रोजी शहरातील स्वर्गीय आनंद दिघे चौक येथे सायंकाळी ५ वाजता राहुल गांधी यांची सभा होणार असून तेथून त्यांचा मुक्काम सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगण या ठिकाणी होणार असून याठिकाणची व्यवस्था व पाहणी करण्यासाठी खान बुधवारी भिवंडीत आले होते.या प्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे,शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन माजी खासदार सुरेश टावरे,तालुकाध्यक्ष विजय पाटील यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महविकास आघाडीतील शरद पवार,उद्धव ठाकरे हे देशातील लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहेत.भिवंडीत न्याय यात्रा येत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेच पण सर्वसामान्य जनतेला सुध्दा या यात्रेची उत्सुकता आहे.ऐतिहासिक अशी गर्दी यानिमित्ताने होणार असल्याची माहिती देत खोटी आश्वासन देऊ भावनात्मक आव्हान करून भाजपाने देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे.त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार गावागावां मध्ये पोहोचणार आहे.त्याचा फायदा नक्कीच काँग्रेसला होईल असा विश्वास आरिफ नसीम खान यांनी शेवटी व्यक्त केला.

 

टॅग्स :bhiwandiभिवंडीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी