शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा- आरिफ नसीम खान

By नितीन पंडित | Updated: March 13, 2024 19:55 IST

"भाजपाचे केंद्रातील सरकारने दहा वर्षात विकासाच्या नावाखाली विनाश केला आहे"

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: देशातील लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली असून निवडणुकीची वेळ असली तरी राहुल गांधी यांनी तीन वर्षांपासून देशात न्याय यात्रेचा प्रयोग केला आहे, तो या देशाला एकजूट ठेवण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी आहे.देशातील लोकांसमोर प्रश्न आहे देशाची लोकशाही वाचणार की नाही. देशात बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.तरुण महिला शेतकरी उद्योजक या सर्व वर्गासमोर प्रश्न उभा आहे.भाजपाचे केंद्रातील सरकारने दहा वर्षात विकासाच्या नावाखाली विनाश केला आहे. खोटे बोलतात रेटून बोलतात वस्तुस्थिती कोणी समोर ठेवत नाही ,खरी माहिती जनतेसमोर ठेऊन जनतेने त्यावर विचार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान यांनी दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १५ मार्च रोजी दुपारी दोन वाजता भिवंडी तालुक्यात दाखल होणार असून १५ मार्च रोजी शहरातील स्वर्गीय आनंद दिघे चौक येथे सायंकाळी ५ वाजता राहुल गांधी यांची सभा होणार असून तेथून त्यांचा मुक्काम सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगण या ठिकाणी होणार असून याठिकाणची व्यवस्था व पाहणी करण्यासाठी खान बुधवारी भिवंडीत आले होते.या प्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे,शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन माजी खासदार सुरेश टावरे,तालुकाध्यक्ष विजय पाटील यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महविकास आघाडीतील शरद पवार,उद्धव ठाकरे हे देशातील लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहेत.भिवंडीत न्याय यात्रा येत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेच पण सर्वसामान्य जनतेला सुध्दा या यात्रेची उत्सुकता आहे.ऐतिहासिक अशी गर्दी यानिमित्ताने होणार असल्याची माहिती देत खोटी आश्वासन देऊ भावनात्मक आव्हान करून भाजपाने देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे.त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार गावागावां मध्ये पोहोचणार आहे.त्याचा फायदा नक्कीच काँग्रेसला होईल असा विश्वास आरिफ नसीम खान यांनी शेवटी व्यक्त केला.

 

टॅग्स :bhiwandiभिवंडीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी