शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

स्टेशन परिसरात रिक्षांचा गराडा; कल्याणमध्ये चालकांची मुजोरी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:10 IST

स्टेशन परिसरातील पश्चिमेला कर्जत दिशेला असलेल्या पादचारी पुलावरून उतरले की, सरकत्या जिन्याला लागून एक चारचाकी वाहनांसाठी मोकळी जागा आहे.

कल्याण : पश्चिमेकडील रेल्वेस्थानक परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांची मुजोरी कायम आहे. सहायक पोलीस आयुक्तांनी महिनाभरात रात्री दोनवेळा कोम्बिंग ऑपरेशन करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे कारवाईलाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून शुक्रवारी सकाळी तर रिक्षाचालकांनी स्टेशन परिसराला अक्षरश: वेढा घातला होता. रिक्षांच्या दाटीवाटीमुळे चालण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रिक्षाचालक आणि नागरिकांमध्ये खटकेही उडाले. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

स्टेशन परिसरातील पश्चिमेला कर्जत दिशेला असलेल्या पादचारी पुलावरून उतरले की, सरकत्या जिन्याला लागून एक चारचाकी वाहनांसाठी मोकळी जागा आहे. त्याला लागूनच कल्याण ते उल्हासनगरकडे जाणाऱ्या रिक्षांसाठी मोठे रिक्षास्टॅण्ड आहे. रिक्षास्टॅण्ड असतानाही रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली साइडभाडे भरणाºया रिक्षाचालकांची रांग लागलेली असते. ही रांग रिक्षा-चालक-मालक संघटनेच्या कार्यालयासमोर लागते. संघटनेकडूनही या रिक्षांबाबत काहीच हरकत घेतली जात नाही. या रांगेच्या विरुद्ध दिशेला कल्याण शहरातील साइडभाडे भरणारे रिक्षाचालक रस्त्यावरच रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे तिकीटघराच्या अगदी समोर पादचाऱ्यांसाठी मोकळी जागा आहे. त्याला लागूनच टांगास्टॅण्ड असून पुढे लालचौकी, खडकपाडा या ठिकाणी जाणाºया रिक्षा उभ्या राहतात. या रिक्षांची रांग बाहेरचा रस्ताच अडवून ठेवतात. तसेच त्याला लागून थेट भाडे भरणाºया रिक्षाचालकांची रांग असते. एसटी डेपोच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोरच्या रस्त्यादरम्यान साइडभाडे भरणाºया रिक्षांची रांग असते. टाटानाका, नेतिवली, मेट्रो मॉलचे भाडे भरले जाते. त्यांच्यासाठी अधिकृत रिक्षास्टॅण्ड रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रासमोर दिले आहे. मात्र, बेशिस्तपणे रस्त्यावर रिक्षा उभ्या करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच, पादचारी रस्त्याच्या बाजूने चालूही शकत नाहीत. सकाळ-संध्याकाळ स्टेशन परिसराला रिक्षांचा गराडा असतो. महापालिका व एमएमआरडीएने पादचाºयांना स्थानकाच्या गर्दीतून बाहेर पडता यावे, यासाठी स्कायवॉक तयार केला. या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे बस्तान असल्याने पादचारी धड स्कायवॉकचा वापर करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे.

वाहतूक पोलीस फारशी कारवाई करत नाहीत. गस्तीसाठी असलेले स्टेशन परिसरातील दोन पोलीस तेथे उपस्थित नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे रिक्षाचालकांना मोकळे रान मिळते. बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नियमाने रिक्षा व्यवसाय करणारे बदनाम होतात आणि त्यांनाही फटका बसतो. एकीकडे बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात ओरड केली जात आहे, तर दुसरीकडे सरकारने मुक्त रिक्षा परवाना धोरण अवलंबल्याने रिक्षांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे रिक्षाचालकांसाठी असलेले रिक्षास्टॅण्ड कमी पडू लागले, असा दावा केला जात आहे. दरम्यान, स्टेशन परिसरात काल रात्रीच्या सुमारास कारवाई करण्यात आली. २५ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई करून चार रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित रिक्षाचालकांकडून दंड वसूल केला आहे. कारवाईत सातत्य ठेवले जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.

कारवाईत सातत्य नाहीमहिनाभरात स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दोनवेळा कारवाई केली. एक वेळेस कोम्बिंग ऑपरेशन केले. तर, दुसऱ्या वेळेस ऑलआउट ऑपरेशन केले. या दोन्ही कारवाईनंतर परिस्थिती फारशी बदललेली नाही. रिक्षाचालकांना या कारवाईमुळे जरब बसलेली नाही. पोलीस कारवाईसाठी येतात, तेव्हा रिक्षाचालकांची पळापळ होते. तासाभरासाठी रिक्षास्टॅण्डचा परिसर मोकळा होतो. पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती असते. पोलिसांच्या कारवाईत सातत्य असेल, तर बेशिस्त रिक्षाचालकांना जरब बसून नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाauto rickshawऑटो रिक्षा