शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 23:41 IST

केडीएमसी हद्द । ठोस तोडगा काढण्यात यंत्रणांना अपयश

कल्याण : भिवंडीतील धोकादायक इमारत पडून ४० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ४७१ धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा इमारतींमधील रहिवासी धास्तावलेले आहेत. केडीएमसी हद्दीत १८७ अतिधोकादायक, तर २८४ इमारती धोकादायक आहेत. मनपाने अशा इमारतींचे मालक व रहिवाशांना स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या नोटिसा वारंवार बजावल्या आहेत. मात्र, त्यापुढे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. परंतु, मनपाच्या मते बहुसंख्य इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले असून, त्यानंतरच या इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे.

२०१५ मध्ये ठाकुर्लीत धोकादायक इमारत पडली होती. तेव्हापासून केडीएमसीत धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न चर्चिला जात आहे. मात्र, त्यावर अद्याप ठोस तोडगा मनपाने काढलेला नाही. धोकादायक इमारतींत जवळपास एक हजार ८८४ कुटुंबांमधील ५० हजारांपेक्षा जास्त रहिवासी राहत आहेत. मनपाने त्यांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अनेकांचे घरभाडे थकले आहे. सध्या आर्थिक विवंंचनेमुळे धोकादायक इमारतींमधील रहिवासी पर्यायी भाड्याचे घर घेऊ शकत नाहीत.अनेक ठिकाणी जास्तीचे भाडे सांगितले जात आहे. दुसरीकडे मनपाकडे संक्रमण शिबिरे नसल्याने इतक्या मोठ्या संख्येने रहिवाशांना स्थलांतरित करणे शक्य नाही.मनपाने क्लस्टर योजना राबवण्यासाठी सरकारकडे इरादा जाहीर केला आहे. मात्र, त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही.जोपर्यंत मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत सामायिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केली जात नाही, तोपर्यंत केडीएमसी हद्दीत क्लस्टर लागू होणार नाही, असे सरकारकडून सांगितले जात आहे. त्यामुळे क्लस्टर योजना रखडली आहे.बीएसयूपीची घरे देण्याची मागणीच्केडीएमसीने शहरी गरिबांसाठी बीएसयूपी योजनेंतर्गत सात हजार घरे उभारली आहेत. त्यापैकी तीन हजार घरे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हस्तांतरित करण्यात येणार आहेत. दीड हजार घरांचे वाटप लाभार्थ्यांना केले आहे.च्त्यानंतरही उरलेल्या दीड हजार घरांपैकी ८४० घरे केंद्र सरकारच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधील प्रकल्पबाधितांना देण्यात येणार आहेत. या घरांची रक्कम रेल्वे प्रशासनाने सरकारच्या माध्यमातून केडीएमसीकडे वर्ग केली आहे. ही घरे वगळूनही आता ६४० घरांचे वाटप बाकी आहे. मात्र, त्यासाठी लाभार्थी निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे ही घरे धोकादायक इमारतींत राहणाऱ्यांना द्यावीत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाthaneठाणे