शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 23:41 IST

केडीएमसी हद्द । ठोस तोडगा काढण्यात यंत्रणांना अपयश

कल्याण : भिवंडीतील धोकादायक इमारत पडून ४० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ४७१ धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा इमारतींमधील रहिवासी धास्तावलेले आहेत. केडीएमसी हद्दीत १८७ अतिधोकादायक, तर २८४ इमारती धोकादायक आहेत. मनपाने अशा इमारतींचे मालक व रहिवाशांना स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या नोटिसा वारंवार बजावल्या आहेत. मात्र, त्यापुढे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. परंतु, मनपाच्या मते बहुसंख्य इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले असून, त्यानंतरच या इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे.

२०१५ मध्ये ठाकुर्लीत धोकादायक इमारत पडली होती. तेव्हापासून केडीएमसीत धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न चर्चिला जात आहे. मात्र, त्यावर अद्याप ठोस तोडगा मनपाने काढलेला नाही. धोकादायक इमारतींत जवळपास एक हजार ८८४ कुटुंबांमधील ५० हजारांपेक्षा जास्त रहिवासी राहत आहेत. मनपाने त्यांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अनेकांचे घरभाडे थकले आहे. सध्या आर्थिक विवंंचनेमुळे धोकादायक इमारतींमधील रहिवासी पर्यायी भाड्याचे घर घेऊ शकत नाहीत.अनेक ठिकाणी जास्तीचे भाडे सांगितले जात आहे. दुसरीकडे मनपाकडे संक्रमण शिबिरे नसल्याने इतक्या मोठ्या संख्येने रहिवाशांना स्थलांतरित करणे शक्य नाही.मनपाने क्लस्टर योजना राबवण्यासाठी सरकारकडे इरादा जाहीर केला आहे. मात्र, त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही.जोपर्यंत मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत सामायिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केली जात नाही, तोपर्यंत केडीएमसी हद्दीत क्लस्टर लागू होणार नाही, असे सरकारकडून सांगितले जात आहे. त्यामुळे क्लस्टर योजना रखडली आहे.बीएसयूपीची घरे देण्याची मागणीच्केडीएमसीने शहरी गरिबांसाठी बीएसयूपी योजनेंतर्गत सात हजार घरे उभारली आहेत. त्यापैकी तीन हजार घरे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हस्तांतरित करण्यात येणार आहेत. दीड हजार घरांचे वाटप लाभार्थ्यांना केले आहे.च्त्यानंतरही उरलेल्या दीड हजार घरांपैकी ८४० घरे केंद्र सरकारच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधील प्रकल्पबाधितांना देण्यात येणार आहेत. या घरांची रक्कम रेल्वे प्रशासनाने सरकारच्या माध्यमातून केडीएमसीकडे वर्ग केली आहे. ही घरे वगळूनही आता ६४० घरांचे वाटप बाकी आहे. मात्र, त्यासाठी लाभार्थी निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे ही घरे धोकादायक इमारतींत राहणाऱ्यांना द्यावीत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाthaneठाणे