शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

तिन्ही गावांतून सेना, राष्ट्रवादीला धक्का

By admin | Updated: October 13, 2015 01:54 IST

ऐन ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावर म्हारळ, वरप, कांबा या कल्याण तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींतून गावातील मंडळींनी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत

बिर्लागेट : ऐन ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावर म्हारळ, वरप, कांबा या कल्याण तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींतून गावातील मंडळींनी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना मोठा धक्का मानला जातो. म्हारळ, वरप, कांबा ही तीन गावे शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जात होती. मात्र, त्याला सुरुंग लावण्याचे काम भाजपाने ऐन निवडणुकीत केले. म्हारळ येथील शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सुमन खरात, सदस्य नाथा गायकवाड, महेश खोत याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हारळचे माजी सरपंच प्रमोद देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, जितू देशमुख, सुनील देशमुख, बंजारा समाजाचे अध्यक्ष उत्तम म्हस्के, तर वरप गावातून राजेश भोईर, अजित पाटील, वासुदेव भोईर, उमेश म्हसकर आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी भाजपाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष महेश सुखरामाणी, सुनील पाटील, मधुकर मोहके, डॉ. भगवान भोईर, सरपंच महेश बनकरी, लक्ष्मण कोंगिरे आदी मंडळी उपस्थित होती. (वार्ताहर)